शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

'सुनावणी लवकर करा अन्यथा...', केजरीवालांच्या वकिलांचा युक्तिवाद, CJI चंद्रचूड म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 12:34 IST

Arvind Kejriwal : सुनावणीवेळी CJI चंद्रचुड म्हणाले की, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे विशेष खंडपीठ आजच तुमच्या प्रकरणावर सुनावणी करेल.

Arvind Kejriwal  ( Marathi News ) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल ईडीने अटक केली, या विरोधात सीएम केजरीवाल यांनी आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. यावर आज सुनावणी झाली. CJI डीवाय चंद्रचुड यांनी केजरीवाल यांना विशेष खंडपीठाकडे जाण्यास सांगितले आहे. केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी न्यायालयात हजर झाले. केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना CJI डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने त्यांना न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या विशेष खंडपीठाकडे जाण्याचे निर्देश दिले. 

Sharad Pawar: 'दिसतंय त्यापेक्षा अधिक लोक आमच्यासोबत...', नेत्यांच्या घरवापसीबाबत शरद पवारांनी दिले संकेत

सुनावणीवेळी CJI चंद्रचुड म्हणाले की, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे विशेष खंडपीठ आजच तुमच्या प्रकरणावर सुनावणी करेल. यापूर्वी अभिषेक मनु सिंघवी यांनी CJI यांच्यासमोर याचिकेचा उल्लेख केला होता आणि या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली होती. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर तुम्ही तुमचे म्हणणे मांडावे, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.

सरन्यायाधीशांच्या निर्देशानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांचे वकील न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठात जाऊन अर्ज दाखल करतील. आता न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ ईडीच्या अटकेला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठात न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांचाही समावेश आहे. आता केजरीवाल यांना तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर याचिकेचा उल्लेख करावा लागणार आहे.

ईडीने गुरुवारी संध्याकाळी सीएम केजरीवाल यांची चौकशी केली होती. चौकशीनंतर ईडीने मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केली. या काळात सीएम केजरीवाल यांचे दिल्लीतील निवासस्थान आणि इतर ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली होती.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप