शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

"देश बहुसंख्यांच्या इच्छेनुसार चालणार"; न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या वक्तव्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:23 IST

मुस्लिमांबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वादग्रस्त विधानाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले

Justice Shekhar Kumar Yadav : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शेखर यादव यांच्या वादग्रस्त विधानाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. कॅम्पेन फॉर ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी अँड रिफॉर्म्सने सरन्यायाधिश संजीव खन्ना यांच्याकडे पत्र लिहीत याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शेखर कुमार यादव यांच्या वक्तव्याविरोधात अंतर्गत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. ८ डिसेंबर रोजी अलाहाबाद येथील उच्च न्यायालयाच्या संकुलात झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमादरम्यान न्यायमूर्ती यादव यांनी केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांमुळे उद्भवलेल्या न्यायालयीन अनियमितता आणि न्यायाधीशांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोप पत्रात करण्यात आला आहे.

न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमादरम्यान एका भाषणात मुस्लिम समाजाविरोधात वादग्रस्त विधान केले होते. हा हिंदुस्थान आहे आणि तो बहुसंख्यांच्या इच्छेनुसार चालेल असं म्हणण्यास मला अजिबात संकोच वाटत नाही, असे यादव म्हणाले होते. आता या वक्तव्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवर सर्वोच्च न्यायालय काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सीजेआरने पत्रात न्यायमूर्ती यादव यांच्यावर राजकीय आणि धार्मिक आरोप असलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून न्यायाधीश म्हणून त्यांच्या शपथेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रानुसार, त्यांची विधाने १९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेल्या न्यायिक जीवनाच्या मूल्यांची पुनर्स्थापनांचे उल्लंघन करतात. न्यायाधीशांनी निःपक्षपातीपणा राखला पाहिजे आणि राजकीय किंवा संवेदनशील प्रकरणांवर सार्वजनिक वादविवाद टाळले पाहिजे, असं या पत्रात म्हटलं आहे. 

बहुपत्नीत्व, हलाला आणि तिहेरी तलाकचा संदर्भ देत आणि त्यांची हिंदू परंपरांशी तुलना करत मुस्लीम समाजातील प्रथांवरही न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी टीका केली होती. सीजेआरपूर्वी ऑल इंडिया लॉयर्स असोसिएशनने या वादग्रस्त वक्तव्यावर कारवाई करण्याबाबत राष्ट्रपती आणि देशाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिले होते. ऑल इंडिया लॉयर्स असोसिएशनने शेखर यादव यांचे वक्तव्य देशातील अल्पसंख्याक मुस्लिमांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण मानले आहे. न्यायमूर्ती यादव यांनी समान नागरी संहितेवर भर दिला होता. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसच्या कार्याचेही कौतुक केले होते.

काय म्हणाले होते न्यायमूर्ती यादव?

"मला हे बोलायला अजिबात संकोच वाटत नाही की, हा हिंदुस्थान आहे आणि या देशात हिंदुस्थानात राहणाऱ्या बहुसंख्यांच्या इच्छेनुसार काम चालेल. हा कायदा आहे. तुम्ही हे म्हणू शकत नाही की, मी हायकोर्टाचा न्यायाधिश आहे म्हणून हे विधान करत आहे. खरंतर कायदा बहुमतानुसार काम करतो. त्याकडे कुटुंब किंवा समाजाच्या संदर्भात पहा. ज्यात बहुसंख्य लोकांचे कल्याण आणि आनंद आहे तेच स्वीकारले जाईल," असं न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय