शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

'नागरिकत्व सुधारणा कायदा' मुस्लीमविरोधी नाही, आठवलेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 13:47 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

गोरखपूर - नागरिकत्व सुधारणा कायद्याला काँग्रेससह देशातील आणखी काही पक्षांनी विरोध केला आहे. तर, आसाममधील विद्यार्थ्यांनीही या कायद्याला विरोध करत हा धार्मिक भेदभाव निर्माण करणारा कायदा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या कायद्यावरुन देशात संभ्रमाचे वातावरण विरोधकांकडून पसरवलं जात आहे, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनीही या कायद्याचं समर्थन केलं आहे.  नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर, सर्वोच्च न्यायालयानं नागरिकत्व सुधारणा कायद्यावर प्रतिबंध घालण्यास नकार दिला आहे. पण, हा कायदा संविधानानुसार लागू करता होऊ शकतो की नाही, यावर सर्वोच्च न्यायालय 22 जानेवारीला सुनावणी घेणार आहे. सध्या, या कायद्याला विरोध करत देशातील वातावरण गंभीर झालं आहे. दिल्लीसह अनेक राज्यांत जोरदार विरोध प्रदर्शन सुरू झालं आहे. मंगळवारी दिल्लीतील जामिया, सराया जुलैना भागात आंदोलन केलं आहे. आंदोलकांनी दोन बससह अनेक वाहनांची तोडफो केली आहे. या घटनेत 12 पोलीस कर्मचाऱ्यासंह 22 जण जखमी झाले आहेत. नव्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आसामसह ईशान्य भारतातील इतर राज्यांत पेटलेल्या आंदोलनाची धग कायम आहे. गुवाहाटीमध्ये संचारबंदीला न जुमानता लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. मात्र, हा कायदा मुस्लीमविरोधी नसल्याचे रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.देशातील नागरिकांनी या कायद्यामुळे भयभीत होण्याचं कारण नाही. नागरिकत्व सुधारणा कायदा हा मुस्लिमांविरुद्ध नाही, असे आठवलेंनी म्हटले. भारतात राहणाऱ्या मुस्लीम नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, हा कायदा शेजारील देशांमधून शरणार्थी म्हणून भारतात आलेल्या हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारसी आणि ईसाई लोकांना नागरिकता देण्यासंदर्भात आहे. कुणावरही अन्याय होईल, असा हा कायदा नाही. घुसकोरी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार हा कायदा आहे, असेही आठवेंनी स्पष्ट केलंय. गोरखपूरच्या कुशीनगर येथील एका कार्यक्रमात बोलताना आठवलेंनी या कायद्यासंदर्भात भाष्य केलं. 

दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या या दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे कायद्यात रूपांतर झालेल्या कायद्याविरोधात आंदोलनाने सर्वात रौद्र रूप आसाममध्ये धारण केले होते. तिथे निदर्शनांमुळे सर्व रस्ते बंद करण्यात आल्यानं काही रेल्वे स्थानके व विमानतळावर अनेक प्रवासी अडकून पडले होते. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकdelhiदिल्लीBJPभाजपाMuslimमुस्लीम