शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे ‘आयडिया ऑफ इंडिया’ला धोका: शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 01:18 IST

देश विभाजनाचा विचार मुस्लिम लीग-हिंदू महासभेचा

- टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : हिंदू महासभा व मुस्लिम लीग यांनीच पहिल्यांदा स्वातंत्र्यपूर्व भारतात धर्मावर आधारित विभाजनाची मागणी केली. काँग्रेसने सदैव देशाच्या अखंडतेचा विचार केला. केंद्र सरकार मात्र नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या आड पुन्हा देशाचे विभाजन करू पाहत आहे. संख्याबळाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी देशाच्या प्रजासत्ताक असण्यावर घाला घातला आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भाजपवर केला. ‘लोकमत संसदीय पुरस्कारा’च्या तिसºया पर्वानिमित्त आयोजित परिसंवादात थरूर यांनी रोखठोक मते मांडली.लोकमत मीडिया ग्रुपचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांनी शशी थरूर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. सीएनएन न्यूज १८ चे संपादक (आऊटपूट) जाका जेकब यांनी थरूर यांच्याशी संवाद साधला.

'राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका'या विषयावर बोलताना थरूर यांनी विद्यमान राजकीय स्थितीवर भाष्य केले. प्रादेशिक पक्षांचा विस्तार स्थानिक मुद्यांवर झाला. राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या विस्ताराला त्यामुळे नेहमीच मर्यादा राहील, असे नमूद करून थरूर म्हणाले की, भाजपने हिंदू, हिंदुत्व व हिंदुस्थान या त्रिसूत्रीला महत्त्व दिले. काही प्रादेशिक पक्षांनी सर्वसमावेशक भूमिका मांडली. त्यामुळे अनेक राज्यांत एनआरसीला विरोध होईल.

प्रादेशिक पक्ष व केंद्रामध्ये संघर्ष होईल, कारण चार राज्यांचा अपवाद वगळता देशातील सर्व राज्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर अथवा सागरी किनारपट्टी आहेत. एनआरसी धर्मनिरपेक्ष 'आयडिया आॅफ इंडिया'च्या विरोधात आहे. काँग्रेसने देशाचे विभाजन केल्यानेच एनआरसीची गरज पडली, असा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता.

शहा यांनी कदाचित शाळेत इतिहासाच्या तासाला लक्ष दिले नाही, अशा शेलक्या शब्दात थरूर यांनी समाचार घेतला. हिंदू महासभा व मुस्लीम लीग या संघटनांनीच धर्मावर आधारित विभाजनाचा प्रस्ताव मांडला होता. महात्मा गांधी, पंडीत नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्माधिष्ठित विभाजन मान्य नव्हते, असे थरूर म्हणाले.

घुसखोरीच्या मुद्द्याद्वारे भाजपने महागाई, अर्थव्यवस्थेतील अपयशावरून देशवासीयांचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न चालविला आहे. एनआरसीचा फटका मुस्लिम समुदायालाच बसणार असल्याने भाजपने योजनापूर्वक हे विधेयक आणले. मात्र काँग्रेस प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊ न भाजपचा विचार निष्प्रभ करेल, असा विश्वास थरूर यांनी व्यक्त केला.

कलम ३७० मुळे काय झाले हे सर्वांनी पाहिले. जम्मू-काश्मीरमध्ये लोकांचा आवाज दाबण्यात आला. एकीकडे संचारबंदी तर दुसरीकडे दहशतवाद्यांची भीती या दुहेरी अस्वस्थतेत काश्मिरी आहेत. एनआरसीमुळेही एका समुदायाच्या मनात हीच भावना वाढली असल्याचे थरूर म्हणाले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसLokmatलोकमत