शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

Citizenship Amendment Bill: ईशान्य भारत पेटला! आसाममध्ये २ आंदोलकांचा मृत्यू; मेघालयात इंटरनेट ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 8:47 PM

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला वाढता विरोध; ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये आंदोलनं

गुवाहाटी/शिलाँग: लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होताच ईशान्य भारताच्या बहुतांश भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आसामची राजधानी गुवाहाटीत विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. त्यात जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. स्थानिकांच्या अधिकारांना कोणताही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत राज्यातील जनतेला संबोधित केलं. नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे स्थानिकांच्या परंपरा, संस्कृती, भाषा आणि जमिनीच्या अधिकारांना धक्का लागणार नाही. त्यामुळे स्थानिकांनी चिंता करू नये. आसाम कराराच्या ६ व्या कलमांतर्गत स्थानिकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यात येईल, असा विश्वास सोनोवाल यांनी व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला दिला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होताच ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये आंदोलनं सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर मेघालयातील इंटरनेट आणि मेसेजिंग सेवा खंडित करण्यात आल्या आहेत. पुढील ४८ तासांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली. पीटीआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ईशान्य भारताच्या अनेक भागांमधील इंटरनेट आणि मेसेजिंग सेवा बंद करण्यात आल्या आहेत. गुवाहाटी पाठोपाठ मेघालयाची राजधानी शिलाँगमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मेघालयातील परिस्थिती अतिशय गंभीर स्वरुप धारण करत असल्यानं मुख्यमंत्री कोनराड संगमा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. संगमा यांनी आधीपासूनच नागरिकत्व सुधारणा विधेयकाला जोरदार विरोध केला आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAssamआसाम