शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

CAA : भाजपकडून मुस्लिमांचा बदला घेण्याचा प्रयत्न; मायावतींची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 15:41 IST

CAA : आमचा पक्ष उत्तर प्रदेश विधानसभेतही नागरिकत्व कायद्याविरोधात आवाज उठवणार असल्याचे मायावती म्हणाल्या.

नवी दिल्ली: नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. तर आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जाळपोळ करण्यास सुरुवात केली. त्यांनतर आता याच मुद्द्यावरून राजकीय पडसाद सुद्धा उमटत असून विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. तर बसपा प्रमुख मायावती यांनी सुद्धा नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. देशातील मुस्लिमांचा भाजप बदला घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

भाजपकडून नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात याला विरोध होत आहे. तर दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया युनिवर्सिटीतर मोठा राडा पाहायला मिळाला. त्यांनतर अनेक ठिकाणी हिंसक घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर बऱ्याच ठिकाणी जाळपोळच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत.

तर त्यानंतर आता याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. नागरिकत्व सुधारणा विधेयक विभाजनशील असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. तसेच आमचा पक्ष उत्तर प्रदेश विधानसभेतही नागरिकत्व कायद्याविरोधात आवाज उठवणार असल्याचे मायावती म्हणाल्या. तसेच भाजप हे देशातील मुस्लिमांचा बदला घेत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, नागरिकत्व कायदा मानवतेच्या विरोधात आहे. कायद्याच्या अडून कोणत्याही समाजाला लक्ष करू नयेत. तसेच जामियाच्या विद्यार्थ्यांविरोधात पोलिस बळ वापरण्यात येत असल्याने सर्वच स्तरावरून याचे विरोध होत असल्याचे मायावती म्हणाल्या. तर काँग्रेसप्रमाणे भाजपने सुद्धा आणीबाणीची परिस्थिती निर्माण करू नयेत असा टोला सुद्धा त्यांनी भाजपला लगावला.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकmayawatiमायावतीBJPभाजपाMuslimमुस्लीमPoliticsराजकारण