शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

ख्रिस्ती मिशनरींचा धर्मप्रसार बेकायदेशीर नाही, तामिळनाडू सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 12:51 IST

Supreme Court: तामिळना़डू सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करत ख्रिस्ती मिशनरींकडून होणाऱ्या धर्मांतरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

तामिळना़डू सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करत ख्रिस्ती मिशनरींकडून होणाऱ्या धर्मांतरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तामिळनाडू सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात बळजबरीने धर्मांतरण केल्याची कुठलीही घटना घडलेली नाही. राज्य सरकारने कोर्टात दाखल केलेल्या शपथपत्रात सांगितले की, ख्रिस्ती मिशनरींच्या धर्मप्रसारामध्ये काहीही बेकायदेशीर नाही आहे. जोपर्यंत ते असे करण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करत नाहीत. तसेच लोक ज्या धर्मांचं पालक करू इच्छितात, तो निवडण्याचा त्यांना अधिकार आहे. 

तामिळनाडू सरकारने अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेला प्रत्युत्तर देताना सांगितले की, धर्मांतरविरोधी कायद्याचा अल्पसंख्याकांविरोधात चुकीचा वापर होण्याची भीती आहे. गेल्या काही वर्षांपासून तामिळनाडूमध्ये बळजबरीने धर्मांतरणाची कुठलीही घटना घडलेली नाही, असेही तामिळनाडू सरकारने सांगितले.

तामिळनाडू सरकारने याचिकाकर्त्याने कथितपणे बळजबरीने धर्मांतरण केल्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी आणि विधी आयोगाला धर्मांतरणविरोधी कायद्याचा ड्राफ्ट बनवण्याच्या याचिकेला विरोध केला आहे. उपाध्याय यांनी दाखल केलेली याचिका ही ख्रिश्चन धर्माविरोधात एका धर्मविशेषच्या विचारधारेविरोधात असल्याचा दावा तामिळनाडू सरकारने केला आहे. कलम २५ चा हवाला देत तामिळनाडू सरकारने सांगितले की, भारताची घटना ही प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार देतो.

राज्य सरकारने आपल्या शपथपत्रात सांगितले की, भारताच्या घटनेतील कलम २५ हे प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचा प्रचाराच्या अधिकाराची हमी देते. त्यामुळे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणाऱ्या मिशनरींच्या कामांना कायद्यांविरोधात पाहता येत नाही.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयTamilnaduतामिळनाडू