शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कठीण आहे 'महाराजा'... एअर इंडियाचं टॉयलेट ओव्हर फ्लो, विमानात शिरलं घाण पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 12:06 IST

एअर इंडियाच्या लंडनहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानातील प्रवाशांना टॉयलेटमुळे मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देएअर इंडियाच्या लंडनहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानातील प्रवाशांना टॉयलेटमुळे मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे.व्हीटी-एएनएन या विमानाने आकाशात झेप घेतल्यावर टॉयलेटमधील घाण पाणी अचानक इकॉनोमी क्लासच्या लॉबीमध्ये शिरल्याची घटना घडली.घाण पाण्यामुळे विमात सर्वत्र दुर्गंधी पसरली. काही प्रवाशांनी याबाबत तातडीने तक्रार केली.

नवी दिल्ली - एअर इंडियाच्या लंडनहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानातील प्रवाशांना टॉयलेटमुळे मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे. व्हीटी-एएनएन या विमानाने आकाशात झेप घेतल्यावर टॉयलेटमधील घाण पाणी अचानक इकॉनोमी क्लासच्या लॉबीमध्ये शिरल्याची घटना घडली. या घटनेनंतर विमान व्यवस्थापनाने तातडीने प्रवाशांना विमानाच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये शिफ्ट केलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील टॉयलेटमधील एका पाईपमध्ये एक छोटा टॉवेल अडकल्यामुळे तो पाईप बंद झाला होता. यामुळे पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा झाला नाही. टॉयलेट ओव्हरफ्लो झाले आणि घाण पाणी लॉबीमध्ये शिरण्यास सुरुवात झाली. घाण पाण्यामुळे विमात सर्वत्र दुर्गंधी पसरली. काही प्रवाशांनी याबाबत तातडीने तक्रार केली. त्यानंतर इकॉनॉमी क्लासच्या लॉबीतील प्रवाशांना इतर ठिकाणी हलवण्यात आले. 

विमानात दुर्गंध पसरू नये म्हणून सर्वत्र सुगंधी अत्तर मारण्यात आले. विमानातील प्रवाशांना टॉयलेटमधील पाईपमध्ये पेपर अथवा टॉवेल टाकू नये याचा सल्ला दिला जातो. मात्र टॉयलेटचा नीट वापर न झाल्यायामुळे ही समस्या निर्माण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एअर इंडियाचं टॉयलेट ओव्हर फ्लो झाल्यामुळे दिल्लीपर्यंत प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागलं. 

काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या भोपाळ-मुंबई या विमानातील एका प्रवाशाच्या नाश्त्यामध्ये  झुरळ आढळल्याची घटना समोर आली होती. या घटनेची दखल एअर इंडियाने घेतली असून जाहीर माफी मागितली होती. प्रवाशाला खाद्यपदार्थामध्ये झुरळ सापडल्यामुळे एअर इंडियाने याबाबत जाहीर माफी मागणार एक ट्वीट केलं होतं. 'भोपाळ- मुंबई विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना आलेल्या वाईट अनुभवाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. प्रवाशांना प्रवासाचा आनंद मिळावा हाच आमचा सर्वतोपरी हेतू असतो', असं एअर इंडियाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाdelhiदिल्ली