शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

SC/ST Act: 'चिमुकल्यांच्या हातातील चॉकलेट बळजबरी काढून घेता येत नाही'; सुमित्रा महाजन यांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 11:46 IST

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अॅट्रॉसिटी अॅक्टवरुन सुरू असलेल्या आंदोलनावर आपले मत व्यक्त केले आहे. तसेच कायदा बदलावरुन राजकारण करणे चुकीचे आहे.

मुंबई - लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अॅट्रॉसिटी अॅक्टवरुन सुरू असलेल्या आंदोलनावर आपले मत व्यक्त केले आहे. तसेच कायदा बदलावरुन राजकारण करणे चुकीचे आहे. कारण, हा कायदा बनविण्यासाठी संसदेत सर्वच राजकीय पक्षांचे मतदान घेण्यात आले होते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी याबाबत विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच लहान मुलांच्या हातात दिलेले चॉकलेट परत घेता येत नाही, असेही त्या म्हणाल्या. 

अॅट्रॉसिटी अॅक्टमधील संशोधनाविरुद्ध सवर्ण समाजातील नागरिकांनी गुरुवारी भारत बंदचा नारा दिला होता. तसेच दिल्ली राजस्थान, बिहार आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात आंदोलनही केले होते. त्यामुळे सुमित्रा महाजन यांनी अॅट्रॉसिटी अॅक्टच्या बदलावरुन राजकारण करु नये, असे म्हटले आहे. तसेच याबाबत एक उदाहरणही त्यांनी दिले. समजा, जर मी माझ्या मुलाच्या हातात एक चॉकलेट दिले, पण काही वेळानंतर मला लक्षात आले की, एकाच वेळेस त्याने एवढे मोठे चॉकलेट खाणे योग्य नाही. त्यामुळे, जर तुम्ही त्या मुलाच्या हातातून चॉकलेट वापस घेण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्ही ते वापस घेऊ शकत नाहीत. तुम्ही ते चॉकलेट वापस घेतल्यास, तो मुलगा रागाला येईल आणि रडेल, असे उदाहरण सुमित्रा महाजन यांनी दिले. तर, दोन-तीन समजूतदार लोकांनी सांगितल्यास तो मुलगा चॉकलेट परत देईल, असेही महाजन यांनी म्हटले आहे. दरम्यान, अॅट्रॉसिटी अॅक्टसंदर्भातील कायदा हा संसदेतच बनविण्यात येतो. मात्र, सर्वच खासदारांनी मिळून अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये केलेल्या बदलांबाबत विचार करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजनAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाagitationआंदोलन