शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

“लडाखमध्ये भारतीय हद्दीत चीनने कब्जा केला का? केंद्र सरकार गप्प का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 15:10 IST

लडाखमध्ये चीनी सैन्यांनी भारतीय हद्दीत कब्जा केला का? हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे असं खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

हैदराबाद – भारत आणि चीन यांच्यात गेल्या महिनाभरापासून लडाख सीमेवर तणाव सुरु आहे. अलीकडेच चीन आणि भारतीय सैन्यामध्ये चर्चा झाली. मात्र त्यात काही तोडगा निघाला नाही. यावरुन आता एआयएमआयचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारशी चीनसोबत काय चर्चा झाली? सरकार गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, सीमा विवादात भारत आणि चीनी सैन्य यांच्यात चर्चा झाली. चीनींसोबत काय चर्चा झाली हे केंद्र सरकारने देशाला सांगावे. त्यांनी लाजिरवाणं वाटत आहे का? ते गप्प का? लडाखमध्ये चीनी सैन्यांनी भारतीय हद्दीत कब्जा केला का? हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे असं ते म्हणाले.

पूर्व लडाखमध्ये जवळपास महिन्याभरापासून सीमेवर चीनच्या कारवाया संपत नाही, भारत आणि चीन सैन्य अधिकाऱ्यांमध्ये शनिवारी एक बैठक झाली, त्यातही काही निष्पन्न झालं नाही. दोन्ही सैन्यांनी काही दिवसांपूर्वी सैन्य मागे घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली.  पण दोन्ही देशांनी सध्याच्या परिस्थितीत समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुटनीती आणि सैन्यस्तरावर हालचाली सुरु ठेवल्या आहेत.

 

चीनच्या अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने चायनीज आर्मी (पीएलए) च्या टाक्यांसह युद्ध अभ्यास करत असल्याचा व्हिडीओ जारी केला. ग्लोबल टाईम्सने सांगितले की, पीएलएचे चिनी सैनिक त्यांच्या सामान्य वाहनाची चाचणी घेत आहेत. पीएलएच्या या व्हिडिओमध्ये, चिनी सैनिक आपल्या टँकसह डोंगराळ भागात सराव करत आहेत. यापूर्वी सोमवारी लडाख सीमेवर सुरु असलेल्या तणावानंतर शनिवारी झालेल्या चर्चेनंतर चीनने दुटप्पी भूमिका घेतल्याचं दिसून आलं.

भारत आणि चीन यांच्यात सीमेवरुन सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान चीनेने भारताच्या सीमेजवळ हजारो सैनिक तैनात केले आहे. चीनने हजारो सैनिकांसह अनेक टँक, बख्तबंद गाडी यांना लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC)जवळ तैनात केले आहे. लष्करी व डिप्‍लोमेटिक लेवलवर चीनशी चर्चा यापुढे देखील सुरूच राहील असं परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. मात्र लडाखमधील सीमेवर दोन्ही देशांतील मोठ्या संख्येने सैन्य जमले आहे. त्यांना परत बोलावण्याबाबत काही निर्णय झाला की नाही हे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलेलं नाही. परंतु सीमावादवरुन भारत आणि चीनधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दोन्ही देशांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारतchinaचीन