शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

लडाखमध्ये चिनी सैनिकांची रोखली घुसखोरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 07:53 IST

डोकलामनंतर आता चिनी सैनिकांनी लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरुन भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

लेह, दि. 16 - डोकलामनंतर आता चिनी सैनिकांनी लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरुन भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. मंगळवारी ही घटना समोर आली आहे. भारतीय जवानांनी अटकाव केल्यानंतर चिनी सैनिकांनी दगडफेक केली, यालादेखील भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र या घटनेत काही सैनिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळाने चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतले.  

भारताच्या स्वातंत्र्यदिनीच चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) सैनिकांनी सकाळी 6 आणि त्यानंतर 9 वाजता भारतीय सीमाभागातील ‘फिंगर फोर’ आणि ‘फिंगर फाइव्ह’ भागात घुसण्याचा प्रयत्न केला. यापैकी ‘फिंगर फोर’ भागात प्रवेश करण्यात त्यांना यश आले. मात्र भारतीय जवानांनी अटकाव करत तत्काळ त्यांना माघारी घालवले. सतर्क भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा प्रतिकार केला.  अटकावापुढे काही होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हतबल चिनी सैनिकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. भारतीय जवानांनीसुद्धा या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, दिल्लीतील लष्कराच्या प्रवक्त्यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

आणखी बातम्या वाचा(सैनिकांनो बंदुकी मोडा अन् काश्मिरींना मिठ्या मारा, सामनातून मोदींवर टीका)(नायजेरियात बोको हरामच्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू, 82 जखमी)(आस्थेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही- मोदी) 

डोकलाम आणि सिक्कीममध्ये दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आल्यानंतर आता लडाखमध्येही अशीच काहीशी परिस्थिती उद्भवली आहे. ‘फिंगर फोर’ हा भाग आपला असल्याचं चीन दावा करत आहे. 1990च्या अखेरीस चर्चेदरम्यान भारताने या भागावर दावा केला होता. मात्र चीनने ‘फिंगर फोर’पर्यंत रस्ता बनवून हा अक्साई चीनचा भाग असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीला चिनी सैनिक तलावाच्या उत्तर आणि दक्षिण काठाकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करायचे. मात्र आता भारताने या भागात सशस्त्र पाहारा ठेवला आहे. अमेरिकेकडून निर्यात केलेली अत्याधुनिक यंत्रणा असलेली व 15 सैनिकांना वाहून नेणारी स्पीडबोटही इथे तैनात करण्यात आली आहे. यापूर्वी 2013 साली लडाखमधील देपसांग व दौलतबेग ओलडी या ठिकाणी चीनने केलेल्या घुसखोरीवेळीही या भागात तणाव निर्माण झाला होता. 

टॅग्स :Indiaभारत