शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

‘चिनी स्प्रेवर बंदी घालणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 4:35 AM

कापसावरील किटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे विदर्भातील शेतक-यांना जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालण्यात येणार

मुंबई : कापसावरील किटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे विदर्भातील शेतक-यांना जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी दिली. विषबाधाप्रकरणात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्याचेही त्यांनी मान्य केले.विदर्भात विशेषत: यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे १८ शेतक-यांचा मृत्यू झाला, तर ५४६ शेतकरी अत्यवस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत फुंडकर म्हणाले की, विषबाधेची घटना दुर्दैवी आहे. विदर्भातील कडक उन्हामुळे पिकांवरील फवारणी करताना शेतकरी अनेकदा मास्क किंवा कोट न घालताच फवारणी करतात. त्यातच चिनी बनावटीचे स्प्रेने फवारणी करताना शेतक-यांच्या अंगावरच किटकनाशकाचा फवारा येतो आणि विषबाधा होते, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून विषबाधेमुळे अनैसर्गिक मृत्यू होत असल्याची बाब पोलिसांना किंवा जिल्हा प्रशासनाला माहिती नव्हती. यवतमाळ जिल्ह्यात व्यवस्था असतानाही रुग्णांना उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले. नागपूरातील सरकारी रूग्णालयातील उपचारादरम्यान रूग्णांना बाहेरून औषधे आणि रक्त तपासणीचे अहवाल आणण्यास सांगण्यात आले. त्याची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.चौकशीसाठी निवेदनशेतक-यांच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसे निवेदन सोपवले. कृषी आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना तातडीने निलंबीत करावे. संबंधित औषध कंपन्यांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, अशीही मागणी त्यांनी केली.महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने अंगणवाडी सेविकांना फक्त साडेसहा हजार रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव ठेवावा, हे अयोग्य असून त्यांनाही १० हजार रुपये मानधन द्यावे, असे विखे म्हणाले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार