शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

चीनचे सैन्य पूर्ण माघारी हटले पाहिजे, भारताने ठणकावले; संरक्षण मंत्री आज लडाखला भेट देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 06:33 IST

भारत व चीन यांच्यात चौथ्या टप्प्यातील गुरुवारची चर्चा पार पडल्यानंतर भारताचे हे वक्तव्य आले आहे.

नवी दिल्ली : एलएसीवरून चीनचे सैन्य पूर्णपणे माघारी हटले पाहिजे, असे भारताने पुन्हा एकदा ठणकावले आहे. दरम्यान, पूर्व लडाखमध्ये सैन्य मागे हटविण्याची प्रक्रिया जटिल आहे व सतत त्याची सत्यासत्यता पटवण्याची गरज आहे, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे. भारत व चीन यांच्यात चौथ्या टप्प्यातील गुरुवारची चर्चा पार पडल्यानंतर भारताचे हे वक्तव्य आले आहे.लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, भारत व चीन लष्कराच्या वरिष्ठ कमांडरनी पूर्व लडाखमध्ये सैनिक मागे हटविण्याच्या पहिल्या टप्प्यातील क्रियान्वयनाच्या प्रगतीचा आढावा घेतला व या भागातून सैनिक पूर्णपणे मागे घेण्याच्या पुढील उपायांवर चर्चा केली.कोर कमांडरमध्ये चौथ्या टप्प्यातील चर्चा वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय सीमेत चुशुलमध्ये एका नियोजित ठिकाणी मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरू झाली होती. ती बुधवारी रात्री उशिरा २ वाजेपर्यंत चालली.लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सैन्य मागे घेण्यावर दोन्ही बाजूंनी वचनबद्धता व्यक्त केली. ही प्रक्रिया जटिल व निरंतर सत्यासत्यता पटविण्याची गरज आहे. राजनैतिक व सैन्य स्तरावर नियमित रूपाने बैठकांद्वारे ही प्रक्रिया पुढे नेली जात आहे.सैन्य मागे घेण्याची औपचारिक प्रक्रिया ६ जुलै रोजी सुरू झाली होती. त्यापूर्वी एक दिवस आधी राष्टÑीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चिनी विदेशमंत्री वांग यी यांच्यात सुमारे दोन तास दूरध्वनीवरून चर्चा झाली होती.राजनाथ सिंह आज लडाखला भेट देणारसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे शुक्रवारी लडाखला भेट देणार आहेत. एकूणच परिस्थितीची समीक्षा करणे आणि सैन्य तयारीची पाहणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा असणार आहे. चीन आणि भारताने टप्प्याटप्प्याने सैन्य मागे घेण्याचे ठरविल्यानंतर राजनाथ सिंह यांचा हा दौरा होत आहे.यावेळी सैन्य दलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे हे सोबत असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलै रोजी लडाखला अचानक भेट दिली होती. यावेळी त्यांनी सैनिकांशी संवाद साधला होता. आजच्या दौऱ्यात राजनाथ सिंह हे जनरल नरवणे, कमांडर ले. जनरल योगेश कुमार जोशी, ले. जनरल हरिंदर सिंग आणि अन्य सैन्य अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.गलवान खोºयात झालेल्या संघर्षानंतर भारताचे २० जवान शहीद झाले होते. या संघर्षात चीनच्या सैन्याचेही मोठे नुकसान झाले. तथापि, तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. आता या भागातील सैन्य मागे जात आहे.

टॅग्स :ladakhलडाखindia china faceoffभारत-चीन तणाव