शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

चीनचे सैन्य पूर्ण माघारी हटले पाहिजे, भारताने ठणकावले; संरक्षण मंत्री आज लडाखला भेट देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 06:33 IST

भारत व चीन यांच्यात चौथ्या टप्प्यातील गुरुवारची चर्चा पार पडल्यानंतर भारताचे हे वक्तव्य आले आहे.

नवी दिल्ली : एलएसीवरून चीनचे सैन्य पूर्णपणे माघारी हटले पाहिजे, असे भारताने पुन्हा एकदा ठणकावले आहे. दरम्यान, पूर्व लडाखमध्ये सैन्य मागे हटविण्याची प्रक्रिया जटिल आहे व सतत त्याची सत्यासत्यता पटवण्याची गरज आहे, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे. भारत व चीन यांच्यात चौथ्या टप्प्यातील गुरुवारची चर्चा पार पडल्यानंतर भारताचे हे वक्तव्य आले आहे.लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, भारत व चीन लष्कराच्या वरिष्ठ कमांडरनी पूर्व लडाखमध्ये सैनिक मागे हटविण्याच्या पहिल्या टप्प्यातील क्रियान्वयनाच्या प्रगतीचा आढावा घेतला व या भागातून सैनिक पूर्णपणे मागे घेण्याच्या पुढील उपायांवर चर्चा केली.कोर कमांडरमध्ये चौथ्या टप्प्यातील चर्चा वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय सीमेत चुशुलमध्ये एका नियोजित ठिकाणी मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरू झाली होती. ती बुधवारी रात्री उशिरा २ वाजेपर्यंत चालली.लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सैन्य मागे घेण्यावर दोन्ही बाजूंनी वचनबद्धता व्यक्त केली. ही प्रक्रिया जटिल व निरंतर सत्यासत्यता पटविण्याची गरज आहे. राजनैतिक व सैन्य स्तरावर नियमित रूपाने बैठकांद्वारे ही प्रक्रिया पुढे नेली जात आहे.सैन्य मागे घेण्याची औपचारिक प्रक्रिया ६ जुलै रोजी सुरू झाली होती. त्यापूर्वी एक दिवस आधी राष्टÑीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चिनी विदेशमंत्री वांग यी यांच्यात सुमारे दोन तास दूरध्वनीवरून चर्चा झाली होती.राजनाथ सिंह आज लडाखला भेट देणारसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे शुक्रवारी लडाखला भेट देणार आहेत. एकूणच परिस्थितीची समीक्षा करणे आणि सैन्य तयारीची पाहणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा असणार आहे. चीन आणि भारताने टप्प्याटप्प्याने सैन्य मागे घेण्याचे ठरविल्यानंतर राजनाथ सिंह यांचा हा दौरा होत आहे.यावेळी सैन्य दलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे हे सोबत असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलै रोजी लडाखला अचानक भेट दिली होती. यावेळी त्यांनी सैनिकांशी संवाद साधला होता. आजच्या दौऱ्यात राजनाथ सिंह हे जनरल नरवणे, कमांडर ले. जनरल योगेश कुमार जोशी, ले. जनरल हरिंदर सिंग आणि अन्य सैन्य अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.गलवान खोºयात झालेल्या संघर्षानंतर भारताचे २० जवान शहीद झाले होते. या संघर्षात चीनच्या सैन्याचेही मोठे नुकसान झाले. तथापि, तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. आता या भागातील सैन्य मागे जात आहे.

टॅग्स :ladakhलडाखindia china faceoffभारत-चीन तणाव