शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

लडाख सीमेवरील चीनची सैन्य जमवाजमव चिंताजनक, लष्करप्रमुख जनरल नरवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 07:23 IST

India-China News: पूर्व लडाख भागात चीनने सैन्यात केलेली वाढ तसेच मोठ्या सैन्य तैनातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी चिंताजनक आहे, असे प्रतिपादन भारताचे लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी शनिवारी केले.

नवी दिल्ली : पूर्व लडाख भागात चीनने सैन्यात केलेली वाढ तसेच मोठ्या सैन्य तैनातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी चिंताजनक आहे, असे प्रतिपादन भारताचे लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी शनिवारी केले. चिनी लष्कराच्या (पीएलए) कारवायांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. नरवणे यांनी म्हटले की, चीनकडून सलग दुसऱ्या हिवाळ्यात येथील लष्करी जमवाजमव कायम ठेवली गेली; तर येथील स्थिती एलओसीसारखी (पाकसोबतची नियंत्रण रेषा) होईल. चिनी लष्कर सीमेवर कायम राहिले, तर भारतीय लष्करही तैनात राहील. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर मागील १७ महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात तणावपूर्ण स्थिती आहे. द्विपक्षीय चर्चेनंतर काही चौक्यांहून दोन्ही देशांनी माघार घेतली असली, तरी अनेक ठिकाणी अजूनही सैन्याच्या तुकड्या तैनात आहेत. 

अफगाणी अतिरेकी काश्मिरात घुसण्याचा धोका -लष्करप्रमुख- अफगाणिस्तानातील स्थिती स्थिर झाल्यानंतर तेथील अतिरेकी जम्मू-काश्मिरात घुसू शकतात, अशी भीती लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी व्यक्त केली आहे.-  नरवणे यांनी सांगितले की, दोन दशकांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती, तेव्हा अफगाणी अतिरेक्यांनी जम्मू-काश्मिरात घुसखोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकते. मात्र, आपली घुसखोरी विरोधी व्यवस्था मजबूत आहे तसेच आपली संरक्षण दले कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास समर्थआहेत.-  काश्मिरात वाढलेल्या नागरिकांच्या हत्या आणि अफगाणमधील तालिबान राजवट यांच्यात काही संबंध आहे का, असा प्रश्न जनरल नरवणे यांना विचारण्यात आला होता. - त्यावर त्यांनी म्हटले की, याबाबत काही सांगणे अवघड आहे. मात्र, याआधीच्या तालिबानी राजवटीचे वेळी घुसखोरी वाढली होती. आताही ती वाढण्याचा धोका आहे.

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख