शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या कुरापती सुरूच; अरुणाचल प्रदेशवरही दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 02:14 IST

नवी दिल्ली : जगभरात कोरोनामुळे नाचक्की होत असतानाही चीनचा उर्मटपणा सुरूच आहे. आता चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशावरच दावा सांगितला ...

नवी दिल्ली : जगभरात कोरोनामुळे नाचक्की होत असतानाही चीनचा उर्मटपणा सुरूच आहे. आता चीननेभारताच्याअरुणाचल प्रदेशावरच दावा सांगितला आहे. अरुणाचल प्रदेश असा काही प्रदेश नसून, तो तिबेटचाच भाग असल्याची बतावणी चीनने केली आहे.

चीनच्या हद्दीत चुकून प्रवेश केलेल्या अरुणाचलच्या पाच जणांविषयी कोणतीही माहिती नसल्याचेही चीनने म्हटले आहे. या भारतीयांचे चीनच्या लष्कराने अपहरण केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात भारताने लष्करी स्तरावर चीनकडे विचारणाही केली आहे. हे पाचही जण सुबनसिरी जिल्ह्यातील राहणारे असून, त्यांची नावेही प्रसिद्ध झाली आहेत.

भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी उधळल्यानंतरही चीनचे डोळे उघडले नाहीत. आता त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने अरुणाचल आमचाच भाग असल्याचे म्हटले आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. चीनला भारताने वारंवार दणका दिला. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियानेही चीनच्या सीमा विस्तारवादी भूमिकेवर अनेकदा चिंता व्यक्त केली.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीनIndiaभारत