शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

आंतरराष्ट्रीय विमाने सुरू करण्यावर चीनचा भर; ड्रॅगनकडून प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 06:42 IST

भारताची मात्र सावध भूमिका

नवी दिल्ली : भारत-चीन संबंध हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी दोन्ही देशांमधील राजनैतिक अधिकारी सातत्याने चर्चा करीत आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात चीनच्या तीन शहरांसाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याची चाचपणी सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचेही मत विचारात घेतले जाईल.

गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर भारताने चीनची कोंडी करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. भारतातील गुंतवणूक व व्यापारी संबंध पाहता आता चीनकडूनच विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयात बैठकांचे सत्र सुरू आहे.मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण बंद आहे. व्हिजादेखील दिले जात नाहीत. सलग पाच महिने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने जागतिक अर्थकारणही थांबले आहे. भारत पहिल्या टप्प्यात काही देशांसाठी विमाने सुरू करेल. त्यात चीनचाही समावेश असू शकतो.

गलवान झटापटीनंतर चीन व भारतादरम्यान त्रिस्तरीय चर्चा सुरू आहे. दोन्ही देश स्वहद्दीत मागे हटले. अत्याधुनिक शस्त्रात्रे हटवण्यावरही चर्चेत भर होता. व्यापारवृद्धी, सांस्कृतिक-शैक्षणिक आदान-प्रदान (एक्स्चेंज) करण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांचे दूतावास त्या-त्या देशात तसे अनेक कार्यक्रम आयोजित करीत आहेत.

व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी...

परदेशी अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयाने अभियान सुरू केले. व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी चीन व भारतादरम्यान विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये चीनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होईल. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चीनमध्ये येतील. त्यांच्यासह सर्व श्रेणीतील व्हिजा निवडक देशांना देण्यास चीनने सुरुवात केली आहे.

भारतीयांनादेखील मर्यादित संख्येत; परंतु सर्व श्रेणीत व्हिजा दिले जातील. विमानसेवा सुरू करताना चीनमधील तीन शहरांना जोडण्याचा प्रस्ताव चिनी परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. भारतामध्ये कोरोनाचा कहर वाढला असला तरी फिजिकल डिस्टसिंग, पुरेशी काळजी घेऊन प्रवास सुरू केला जाईल.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतairplaneविमानcorona virusकोरोना वायरस बातम्या