शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

आंतरराष्ट्रीय विमाने सुरू करण्यावर चीनचा भर; ड्रॅगनकडून प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 06:42 IST

भारताची मात्र सावध भूमिका

नवी दिल्ली : भारत-चीन संबंध हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी दोन्ही देशांमधील राजनैतिक अधिकारी सातत्याने चर्चा करीत आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात चीनच्या तीन शहरांसाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याची चाचपणी सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचेही मत विचारात घेतले जाईल.

गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर भारताने चीनची कोंडी करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. भारतातील गुंतवणूक व व्यापारी संबंध पाहता आता चीनकडूनच विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयात बैठकांचे सत्र सुरू आहे.मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण बंद आहे. व्हिजादेखील दिले जात नाहीत. सलग पाच महिने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने जागतिक अर्थकारणही थांबले आहे. भारत पहिल्या टप्प्यात काही देशांसाठी विमाने सुरू करेल. त्यात चीनचाही समावेश असू शकतो.

गलवान झटापटीनंतर चीन व भारतादरम्यान त्रिस्तरीय चर्चा सुरू आहे. दोन्ही देश स्वहद्दीत मागे हटले. अत्याधुनिक शस्त्रात्रे हटवण्यावरही चर्चेत भर होता. व्यापारवृद्धी, सांस्कृतिक-शैक्षणिक आदान-प्रदान (एक्स्चेंज) करण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांचे दूतावास त्या-त्या देशात तसे अनेक कार्यक्रम आयोजित करीत आहेत.

व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी...

परदेशी अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयाने अभियान सुरू केले. व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी चीन व भारतादरम्यान विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये चीनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होईल. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चीनमध्ये येतील. त्यांच्यासह सर्व श्रेणीतील व्हिजा निवडक देशांना देण्यास चीनने सुरुवात केली आहे.

भारतीयांनादेखील मर्यादित संख्येत; परंतु सर्व श्रेणीत व्हिजा दिले जातील. विमानसेवा सुरू करताना चीनमधील तीन शहरांना जोडण्याचा प्रस्ताव चिनी परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. भारतामध्ये कोरोनाचा कहर वाढला असला तरी फिजिकल डिस्टसिंग, पुरेशी काळजी घेऊन प्रवास सुरू केला जाईल.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतairplaneविमानcorona virusकोरोना वायरस बातम्या