शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आंतरराष्ट्रीय विमाने सुरू करण्यावर चीनचा भर; ड्रॅगनकडून प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 06:42 IST

भारताची मात्र सावध भूमिका

नवी दिल्ली : भारत-चीन संबंध हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी दोन्ही देशांमधील राजनैतिक अधिकारी सातत्याने चर्चा करीत आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात चीनच्या तीन शहरांसाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याची चाचपणी सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचेही मत विचारात घेतले जाईल.

गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर भारताने चीनची कोंडी करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. भारतातील गुंतवणूक व व्यापारी संबंध पाहता आता चीनकडूनच विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयात बैठकांचे सत्र सुरू आहे.मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण बंद आहे. व्हिजादेखील दिले जात नाहीत. सलग पाच महिने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने जागतिक अर्थकारणही थांबले आहे. भारत पहिल्या टप्प्यात काही देशांसाठी विमाने सुरू करेल. त्यात चीनचाही समावेश असू शकतो.

गलवान झटापटीनंतर चीन व भारतादरम्यान त्रिस्तरीय चर्चा सुरू आहे. दोन्ही देश स्वहद्दीत मागे हटले. अत्याधुनिक शस्त्रात्रे हटवण्यावरही चर्चेत भर होता. व्यापारवृद्धी, सांस्कृतिक-शैक्षणिक आदान-प्रदान (एक्स्चेंज) करण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांचे दूतावास त्या-त्या देशात तसे अनेक कार्यक्रम आयोजित करीत आहेत.

व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी...

परदेशी अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयाने अभियान सुरू केले. व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी चीन व भारतादरम्यान विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये चीनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होईल. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चीनमध्ये येतील. त्यांच्यासह सर्व श्रेणीतील व्हिजा निवडक देशांना देण्यास चीनने सुरुवात केली आहे.

भारतीयांनादेखील मर्यादित संख्येत; परंतु सर्व श्रेणीत व्हिजा दिले जातील. विमानसेवा सुरू करताना चीनमधील तीन शहरांना जोडण्याचा प्रस्ताव चिनी परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. भारतामध्ये कोरोनाचा कहर वाढला असला तरी फिजिकल डिस्टसिंग, पुरेशी काळजी घेऊन प्रवास सुरू केला जाईल.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतairplaneविमानcorona virusकोरोना वायरस बातम्या