शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

LAC बॉर्डरवर चीनचं भारताविरोधात षडयंत्र; अमेरिकन खासदाराचा दावा, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:46 IST

बीजिंगच्या वाढत्या आक्रमणाचे हे चिंताजनक संकेत आहेत असं अमेरिकन खासदाराने म्हटलं आहे.

नवी दिल्ली - गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर गेल्या वर्षभरापासून चीन आणि भारत यांच्यातील सीमा संघर्ष वाढला आहे. चीन आणि भारताचे सैन्य सीमा भागात शांतात राहावी यासाठी प्रयत्न करत असले तरी चीनचं भारताविरुद्धचं षडयंत्र सुरू आहे. त्यात आता अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी केलेल्या विधानानंतर जगासमोर चीनचा खरा चेहरा समोर आला आहे. 

राजा कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, भारत आणि चीन यांच्या वास्तविक नियंत्रण रेषेजवळ पीपुल्स लिबरेशन आर्मीने नवीन चौकी बांधली आहे. बीजिंगच्या वाढत्या आक्रमणाचे हे चिंताजनक संकेत आहेत. त्यामुळे अमेरिकेकडून भारतासोबत सुरक्ष संबंध आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे. चीनने भारतासोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर विवादित जागेवर सैन्याची छावणी बांधली आहे असं त्यांनी म्हटलं. 

सेंटर फॉर स्ट्रेटेजिक एंड इंटरनॅशनल स्टडीज चायना पॉवर प्रोजेक्टकडून मिळालेल्या आणि नेटसेक डेलीनं शेअर केलेल्या फोटोवरून दिसून येते की, पीपुल्स लिबरेशन आर्मीने पेंगोंग तलावाजवळ सैनिकांना थांबण्यासाठी एक मुख्यालय आणि छावणी निर्माण केली आहे. चीनी कम्युनिस्ट पार्टीने त्यांच्या मूळ विचारधारेवर चालणं अजून सोडलं नाही. देशात आजही अशांतता, मुस्लीम समुदायाचा छळ, आणि चुकीची माहिती पसरवली जात आहे असंही राजा कृष्णमूर्ती यांनी सांगितले. 

चीनच्या आक्रमक महत्त्वकांक्षांसमोर संयुक्त राज्य अमेरिकेने त्यांच्या सहकारी देशांसोबत सुरक्षा आणि गुप्ततर सहकार्य वाढवलं पाहिजे आणि त्याचा विस्तार केला पाहिजे. संयुक्त राज्य अमेरिका, भारत, तैवान आणि संपूर्ण क्षेत्रात लोकशाहीसोबत उभे आहोत असा स्पष्ट संदेश जगासमोर येईल. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीची वाढत्या आक्रमकतेचा चेहरा जगासमोर आणायला हवा असंही खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, चीन आपले लष्करी सामर्थ्य प्रचंड वेगाने वाढवीत असून, हीच गती कायम राहिल्यास या देशाकडे २०३५ पर्यंत १५०० अण्वस्त्रे असतील हे चिंताजनक आहे असा दावा अमेरिकेच्या पेंटॅगानने केला आहे. सध्या चीनकडे ३५०हून अधिक अण्वस्त्रे आहेत. २०२१मध्ये चीनने जगातील सर्वाधिक १३५ क्षेपणास्त्र चाचण्याही केल्या. सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला चीन आपल्या लष्कराला सामर्थ्यशाली करण्यासाठी अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ करण्याच्या प्रयत्नात आहे. चीनची धोरणे जगासाठी अतिशय घातक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

  

टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिका