शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

युनिफॉर्म हब निर्माण झाल्यास चीनला फटका; बसणार मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:09 IST

बांगलादेशच्या कामगारांचीही पिळवणूक; जनमानसात जनजागृती होण्याची गरज

मुंबई : चीनमधून काही वस्तू थेट भारतात येतात, तर काही अन्य देशांच्या मार्गे भारतात पाठविल्या जातात. भारतात येणारे चिनी बनावटीचे कपडे बांगलादेशमार्गे भारतात येतात. चीनपेक्षा बांगलादेशात कमी वेतनात मजूर उपलब्ध होत असल्याने चीन आपल्याकडील कापड बांगलादेशात पाठविते आणि तिथे ते शिवले जातात. नंतर तेथून तो माल ड्यूटी फ्री होऊ न भारतात येतो, याकडे क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे मुख्य मार्गदर्शक राहुल मेहता यांनी लक्ष वेधले.या सर्व प्रकारांत बांगलादेशच्या लोकांना रोजगार मिळत असला तरी फारसे वेतन मात्र मिळत नाही. म्हणजे त्यांची पिळवणूकच होते आणि भारतात मात्र चिनी कपडे म्हणून काही जण मिरवतात. वास्तविक भारतातील कापड उद्योेग खूप मोठा आहे आणि तो वाढवायला मोठ्या संधीही आहेत. त्यामुळे चिनी कापड वा तयार कपड्यांऐवजी भारतीय कपडे विकत घेतल्यास भारतात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. शाळा, रुग्णालये यासाठी लागणाऱ्या युनिफॉर्मचे कापड चीनहून बांगलादेशात जाणार आणि तिथे ते शिवून झाल्यावर भारतात विकणार, असे करण्याऐवजी भारतातच ठिकठिकाणी युनिफॉर्म हब करणे शक्य आहे. त्याची सुरुवात सोलापूरमध्ये झाली आहे. मात्र, त्याबाबत अधिक जनजागृती होण्याची गरज आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात परदेशी कपड्यांची होळी केली होती. आता मात्र अशी होळी न करता स्वदेशी कपडे वापरण्यासाठी जनमत तयार केले पाहिजे, असा मतप्रवाह आहे. मेडिकल प्रॉडक्टचे व्यापारी असलेल्या मनीष ठक्कर यांच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची महाराष्ट्रातील ७० टक्के बाजारपेठ चीनच्या ताब्यात आहे. यात स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रोत्साहन द्यायला हवे.कोरोना संसर्गाच्या काळात भारताते संशोधनापासून मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीटस्साठी मोठी आघाडी घेतली आहे. ती कायम ठेवल्यास वैद्यकीय उपकरणे आणि औषध उद्योग यासाठी भारताला चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही, असे या क्षेत्रातील मंडळींचे म्हणणे आहे.बहुतांश चिनी मोबाईल कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करून पाच वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यांचे उत्पादन भारतातच होऊ लागल्याने, भारतीयांना रोजगार दिल्याने लवकरच यातील अनेक कंपन्यांचा माल हा ‘मेड इन इंडिया’ म्हणूनही मिळू लागेल. मात्र, यामधील गुंतवणूक चीनची असल्यामुळे फायदा मात्र चीनलाच होणार आहे. त्याऐवजी भारतीय तरुण आणि उद्योजक यांनी पुढाकार घेतल्यास आणि त्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन व साह्य मिळाल्यास जगातील मोबाईलची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारतातून चीन हद्दपार होऊ शकेल. शिवाय चिनी कंपन्यांच्या उत्पादनांची जाहिरात आपण करणार नाही आणि त्यांचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनणार नाही, अशी शपथ सेलिब्रिटींनी घ्यायला हवी.ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडरपद सोडण्याची मागणीभारतामधील मोबाईलची बाजारपेठ चीनने काबीज केल्याचे दिसत आहे. ओप्पो, वनप्लस, विवो, रिअलमी आणि लिनोवो-मोटोरोला हे लोकप्रिय असलेले ब्रॅण्डस् हे चिनी कंपन्यांच्या मालकीचे आहेत. या ब्रॅण्डस्चे मोबाईल हे चीनमध्ये बनविलेले असून, त्यांचे सर्व पार्टस्ही चिनी बनावटीचे आहेत. त्यामुळे या फोन्सच्या विक्रीचा सर्व लाभ हा चीनला मिळत आहे.अनेक चित्रपट कलावंत व खेळाडू या ब्रॅण्डस्चे अ‍ॅम्बेसिडर आहेत. त्यामध्ये रणबीर कपूर (ओप्पो), रॉबर्ट डाउनी (ज्युनि) (वनप्लस), विराट कोहली (विवो) आणि सलमान खान (रिअल मी) यांचा समावेश आहे. या खेळाडू आणि कलावंतांनी चिनी कंपन्यांचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून काम करणे बंद करावे, अशी मागणीही केली जात आहे.उद्योजक म्हणतात...सध्या कोरोनामुळे चीनला तीन महिने फटका बसला आहे; पण तेवढ्याने भागणार नाही.चिनी माल चीनमधूनच नव्हे, तर तो नेपाळ, बांगलादेश, तैवानमार्गेही येतो. त्या देशांना चीनकडून होणारा आर्थिक फायदा वळवून तो भारताकडून होईल, अशी व्यवस्था उभी करायला हवी.सध्या चीन व तैवानमधून येथून यंत्रे आणून त्यांच्याकडून भारतात थेट गुंतवणूक होत आहे. त्याद्वारे भारतातच ५० टक्के माल तयार होतो. उरलेला अन्य देशांमार्फत येतो.चिनी आक्रमणाला तोंड देऊ न आपल्या धोरणात बदल करणारे व्यापारी टिकले. मात्र, छोटे व्यापारी भरडले जात आहेत. त्यासाठी उत्पादन, आयात आणि व्यापारविषयक धोरणामध्ये बदल करायला हवेत, अशी मागणी व्यापारी आणि त्यांच्या संघटना करीत आहेत.

टॅग्स :chinaचीन