शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

चीनवर भरवसा नाय! डोकलाममध्ये अजूनही चीनचे एक हजार सैनिक तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 12:38 IST

डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला संघर्ष संपला असला तरी, अजूनही भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे.

ठळक मुद्देसिक्कीम सीमेजवळच्या डोकलाम भागात चीनने रस्ता बांधणीचे काम हाती घेतल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारत आणि चीनने परस्पर सहमतीने सैन्य मागे घेतल्याने या वादावर तोडगा निघाला.

नवी दिल्ली - डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला संघर्ष संपला असला तरी, अजूनही भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे. डोकलामचा वाद मिटल्याचे चित्र दिसत असले तरी, चीनने अजूनही या भागातून आपले सैन्य पूर्णपणे मागे घेतलेले नाही. त्यामुळे भारतीय सैन्य पूर्णपणे सर्तक आणि सज्ज आहे. डोकलामच्या ज्या भागात भारत आणि चीनचे सैनिक परस्परासमोर उभे ठाकले होते. त्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर चीनचे एकहजार सैनिक तैनात आहेत. 

इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे. सिक्कीम सीमेजवळच्या डोकलाम भागात चीनने रस्ता बांधणीचे काम हाती घेतल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अडीच महिने हा संघर्ष सुरु होता. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारत आणि चीनने परस्पर सहमतीने सैन्य मागे घेतल्याने या वादावर तोडगा निघाला. पण चीननं पुन्हा एकदा डोकलाम परिसरात रस्ता बनवण्यास सुरुवात केली आहे. तिथे चिनी सैनिकांच्या सुरक्षेमध्ये काम सुरु आहे. 

चुंबी खो-यात अजूनही चिनी सैनिक तैनात आहेत. हवाई दल प्रमुख बी.एस.धानोआ यांनी काल गुरुवारी वार्षिक पत्रकारपरिषदेत चुंबी खो-यात चिनी सैनिक असल्याची माहिती दिली. डोकलामवरुन संघर्ष सुरु असताना चीनची 12 हजार सैनिकांची तुकडी, 150 रणगाडे आणि दारुगोळा चुंबी व्हॅलीच्या फारी ड्झाँग भागाच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. येणा-या दिवसात चिनी सैनिकांची ही संख्या कमी होईल असे सूत्रांनी सांगितले. 

दोन्ही देशांमध्ये तडजोडीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर 28 ऑगस्टला भारत आणि चीनचे सैनिक डोकलाममध्ये संघर्षाचा जो केंद्रबिंदू होता त्या ठिकाणापासून 150 मीटर मागे गेले. जून महिन्यामध्ये भारतीय जवानांनी सिक्कीममध्ये सीमा ओलांडून चीनच्या रस्ते निर्माण करण्याच्या काम थांबवलं होतं. या रस्त्याची निर्मिती चिकन नेक नावानं ओळखल्या जाणा-या भारतीय जमिनीजवळ केली होती. दरम्यान हा परिसर भारतासाठी भौगोलिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असा आहे. दरम्यान डोकलाम विवादावर जवळपास 70 दिवस भारत-चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यानंतर उपाय योजना काढत हा वाद मिटवण्यात आला होता आणि दोन्ही देशांनी आपआपल्या सैनिकांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. 

टॅग्स :Doklamडोकलामchinaचीन