शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

चीनवर भरवसा नाय! डोकलाममध्ये अजूनही चीनचे एक हजार सैनिक तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 12:38 IST

डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला संघर्ष संपला असला तरी, अजूनही भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे.

ठळक मुद्देसिक्कीम सीमेजवळच्या डोकलाम भागात चीनने रस्ता बांधणीचे काम हाती घेतल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारत आणि चीनने परस्पर सहमतीने सैन्य मागे घेतल्याने या वादावर तोडगा निघाला.

नवी दिल्ली - डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला संघर्ष संपला असला तरी, अजूनही भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे. डोकलामचा वाद मिटल्याचे चित्र दिसत असले तरी, चीनने अजूनही या भागातून आपले सैन्य पूर्णपणे मागे घेतलेले नाही. त्यामुळे भारतीय सैन्य पूर्णपणे सर्तक आणि सज्ज आहे. डोकलामच्या ज्या भागात भारत आणि चीनचे सैनिक परस्परासमोर उभे ठाकले होते. त्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर चीनचे एकहजार सैनिक तैनात आहेत. 

इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे. सिक्कीम सीमेजवळच्या डोकलाम भागात चीनने रस्ता बांधणीचे काम हाती घेतल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अडीच महिने हा संघर्ष सुरु होता. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारत आणि चीनने परस्पर सहमतीने सैन्य मागे घेतल्याने या वादावर तोडगा निघाला. पण चीननं पुन्हा एकदा डोकलाम परिसरात रस्ता बनवण्यास सुरुवात केली आहे. तिथे चिनी सैनिकांच्या सुरक्षेमध्ये काम सुरु आहे. 

चुंबी खो-यात अजूनही चिनी सैनिक तैनात आहेत. हवाई दल प्रमुख बी.एस.धानोआ यांनी काल गुरुवारी वार्षिक पत्रकारपरिषदेत चुंबी खो-यात चिनी सैनिक असल्याची माहिती दिली. डोकलामवरुन संघर्ष सुरु असताना चीनची 12 हजार सैनिकांची तुकडी, 150 रणगाडे आणि दारुगोळा चुंबी व्हॅलीच्या फारी ड्झाँग भागाच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. येणा-या दिवसात चिनी सैनिकांची ही संख्या कमी होईल असे सूत्रांनी सांगितले. 

दोन्ही देशांमध्ये तडजोडीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर 28 ऑगस्टला भारत आणि चीनचे सैनिक डोकलाममध्ये संघर्षाचा जो केंद्रबिंदू होता त्या ठिकाणापासून 150 मीटर मागे गेले. जून महिन्यामध्ये भारतीय जवानांनी सिक्कीममध्ये सीमा ओलांडून चीनच्या रस्ते निर्माण करण्याच्या काम थांबवलं होतं. या रस्त्याची निर्मिती चिकन नेक नावानं ओळखल्या जाणा-या भारतीय जमिनीजवळ केली होती. दरम्यान हा परिसर भारतासाठी भौगोलिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असा आहे. दरम्यान डोकलाम विवादावर जवळपास 70 दिवस भारत-चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यानंतर उपाय योजना काढत हा वाद मिटवण्यात आला होता आणि दोन्ही देशांनी आपआपल्या सैनिकांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. 

टॅग्स :Doklamडोकलामchinaचीन