शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

मालदीव प्रश्नी भारताच्या कणखर भूमिकेमुळे चीन अस्वस्थ, मात्र मालदीवने आणीबाणीचा अवधी वाढवला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 20:32 IST

मालदीवमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाप्रकरणी भारताने कणखर भूमिका घेत तेथील आणीबाणी हटवण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली -  मालदीवमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाप्रकरणी भारताने कणखर भूमिका घेत तेथील आणीबाणी हटवण्याचे आवाहन केले.  भारताच्या या भूमिकेमुळे चीनच्या अस्वस्थतेत वाढ झाली असून, चिनी युद्धनौकांनी हिंदी महासागरामधील आपली उपस्थिती वाढवली आहे. मालदीवमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला 15 दिवसांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या आणीबाणीचा अवधी आज संपुष्टात आला. भारताने मालदीव प्रकरणी जरी कणखर भूमिका घेतली असली तरी लष्करी हस्तक्षेप करण्याबाबत संकेत दिलेले नाहीत. मात्र भारताने केलेले आवाहन धुडकावून लावत मालदीवने देशातील आणीबाणी अजून 30 दिवसांनी वाढवली आहे. मालदीवचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी सोमवारी संसदेत सांगितले होते की, ते देशातील आणीबाणी अजून 30 दिवसांसाठी वाढवू इच्छित आहेत. त्यानंतर यावर होणाऱ्या चर्चेसाठी प्रोग्रेसिव्ह पार्टीचे 39 खासदार एकत्र आले. मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांनी या निर्णयाचा विरोध केला. त्यामुळे राष्ट्रपतींनी ठेवलेल्या प्रस्तावाबाबत निर्माण झालेला तिढा कायम आहे. दरम्यान, मालदीव सरकार आणीबाणीचा कालावधी अजून वाढवणार नाही अशी आशा भारताने व्यक्त केली आहे. ज्यामुळे राजकीय प्रक्रिया त्वरित सुरू करता येईल. आणीबाणी हटवल्यानंतर न्यायपालिकेसह सर्व लोकशाही संस्थानां स्वायत्तपणे कार्य करण्याचे स्वातंत्र देण्यात येईल, अशी अपेक्षा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे.   दरम्यान चीनने हिंदी महासागरात हालचाली वाढवून, भारताने या प्रकरणी हस्तक्षेप करू नये असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मालदीवमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटामुळे आशियातील दोन महाशक्ती असलेले भारत आणि चीन हे देश आमने-सामने आल्याचे चित्र निर्माण झाले आहेत. मात्र मालदीवमध्ये उद्भवलेल्या राजकीय संकटातून मार्ग काढण्यासाठी आपण भारताच्या संपर्कात असल्याचे चीनने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. मालदीवप्रश्नी भारतासोबत वाद निर्माण करण्याची आमची इच्छा नाही. हा मालदीवचा देशांतर्गत प्रश्न असून, तो हाताळण्यासाठी तो देश सक्षम आहे. त्यामुळे या प्रश्नी कुठल्या बाहेरील शक्तीने हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे मत चीनने मांडले होते. 

राजकीय कैद्यांची सुटका करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन मालदीवमध्ये राजकीय संकट निर्माण झाले होते. त्यानंतर मालदीवमध्ये 15 दिवसांसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली होती. यामुळे सरकारला कोणालाही अटक करण्याचे, छापा मारण्याचे आणि संपत्ती जप्त करण्याचे अधिकार मिळाले होते.

टॅग्स :MaldivesमालदीवIndiaभारतchinaचीन