शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

चिनी सैन्याच्या माघारीला लडाखमधून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 02:10 IST

भारताने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.

बीजिंग : गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेला भारत-चीन यांच्यातील लष्करी तणाव निवळायला सुरुवात झाली आहे. लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरातून उभय देशांच्या सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केली असल्याचे चिनी परराष्ट्र मंत्रालयातर्फे बुधवारी सांगण्यात आले. मात्र, भारताने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.गेल्या वर्षी मे महिन्यात लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या पँगाँग सरोवरानजीक भारत आणि चीन यांच्यात लष्करी तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासून उभय देशात लष्करी पातळीवरील चर्चेच्या विविध फेऱ्या झाल्या. २४ जानेवारी रोजी कॉर्प्स कमांडर पातळीवरील अधिकाऱ्यांत चर्चेची नववी फेरी झाली होती. त्यात उभय देशांनी पँगाँग सरोवर परिसरातून आपल्या सीमारेषेपर्यंत माघार घेण्याच्या मुद्द्यावर एकमत झाले. त्यातच मॉस्कोमध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी एक निवेदन जारी केले. तर, चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वु किआन यांनी त्यास दुजोरा दिला. भारताने मात्र यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. (वृत्तसंस्था)

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख