शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'पोराबाळांची बँकेत खाती उघडली, भाजपने देशाला फसवले; इंडियाची सभा लालू प्रसाद यादवांनी गाजवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 18:28 IST

आज विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत बोलताना लालू प्रसाद यादव यांनी मोदी सरकारवर टीका केली.

देशात काही महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. सर्वपक्षीयांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली असून आज इंडियाची बैठक मुंबईत झाली. यावेळी विरोधी पक्षांनी मोदी सरकावर टीका केली. बिहारचे नेते माजी मंत्री लालू यादव यांनी पंतपधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

महायुतीच्या सभेत अजित पवार कडाडले; संजय राऊत-जितेंद्र आव्हाडांना जोरदार फटकारले

लालू प्रसाद यादव म्हणाले, जर देशात विरोधी पक्ष एकवटला नाही आणि एकही उमेदवार उभा राहिला नाही तर त्याचा फटका देशाला सहन करावा लागेल. याचाच फायदा आतापर्यंत मोदींना झाला. देशातील महागाईवरुनही केंद्रावर टीका केली. देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे, टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. देशात गरिबी वाढत आहे. यांच्या राज्यात टोमॅटोला चव राहिलीच नाही. या देशात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. भाजपच्या १५ लाखाच्या त्याच जुन्या घोषणेवर टीका केली.

लालू प्रसाद यादव म्हणाले, 'हे लोक म्हणजे भाजप खोटे बोलून आणि अफवा पसरवून सत्तेत आले आहेत. माझे आणि इतर अनेकांचे नाव घेत त्यांनी त्यांचे पैसे स्विस बँकेत असल्याचे सांगितले होते. आम्ही हे पैसे आणून प्रत्येकाच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा करू, असे मोदींनी सांगितले होते.''भाजपच्या या आश्वासनाने आमचीही फसवणूक झाली आहे. आणि आम्ही आमचे खाते देखील उघडले, असा टोलाही लालू प्रसाद यादव यांनी लगावला. 

लालू प्रसाद यादव यांनी ईडी आणि सीबीआयच्या कारवाईचाही उल्लेख केला. त्याचबरोबर आपल्यावर अनेक ऑपरेशन्स झाल्या आहेत, आपली किडनी ट्रान्सप्लांट झाली आहे आणि आपली हिंमत अजून बुलंद आहे आणि मोदी आणि भाजपला हटवूनच आपण थांबणार असल्याचे यादव म्हणाले.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा