शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

'पोराबाळांची बँकेत खाती उघडली, भाजपने देशाला फसवले; इंडियाची सभा लालू प्रसाद यादवांनी गाजवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 18:28 IST

आज विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत बोलताना लालू प्रसाद यादव यांनी मोदी सरकारवर टीका केली.

देशात काही महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. सर्वपक्षीयांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली असून आज इंडियाची बैठक मुंबईत झाली. यावेळी विरोधी पक्षांनी मोदी सरकावर टीका केली. बिहारचे नेते माजी मंत्री लालू यादव यांनी पंतपधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

महायुतीच्या सभेत अजित पवार कडाडले; संजय राऊत-जितेंद्र आव्हाडांना जोरदार फटकारले

लालू प्रसाद यादव म्हणाले, जर देशात विरोधी पक्ष एकवटला नाही आणि एकही उमेदवार उभा राहिला नाही तर त्याचा फटका देशाला सहन करावा लागेल. याचाच फायदा आतापर्यंत मोदींना झाला. देशातील महागाईवरुनही केंद्रावर टीका केली. देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे, टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. देशात गरिबी वाढत आहे. यांच्या राज्यात टोमॅटोला चव राहिलीच नाही. या देशात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. भाजपच्या १५ लाखाच्या त्याच जुन्या घोषणेवर टीका केली.

लालू प्रसाद यादव म्हणाले, 'हे लोक म्हणजे भाजप खोटे बोलून आणि अफवा पसरवून सत्तेत आले आहेत. माझे आणि इतर अनेकांचे नाव घेत त्यांनी त्यांचे पैसे स्विस बँकेत असल्याचे सांगितले होते. आम्ही हे पैसे आणून प्रत्येकाच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा करू, असे मोदींनी सांगितले होते.''भाजपच्या या आश्वासनाने आमचीही फसवणूक झाली आहे. आणि आम्ही आमचे खाते देखील उघडले, असा टोलाही लालू प्रसाद यादव यांनी लगावला. 

लालू प्रसाद यादव यांनी ईडी आणि सीबीआयच्या कारवाईचाही उल्लेख केला. त्याचबरोबर आपल्यावर अनेक ऑपरेशन्स झाल्या आहेत, आपली किडनी ट्रान्सप्लांट झाली आहे आणि आपली हिंमत अजून बुलंद आहे आणि मोदी आणि भाजपला हटवूनच आपण थांबणार असल्याचे यादव म्हणाले.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा