शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

कर्ज फेडण्यासाठी मुलांना ठेवावे लागले गहाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 11:12 IST

मानवाधिकार आयोगाने २ राज्यांच्या मुख्य सचिवांना मागितले उत्तर

भुवनेश्वर : कर्जाची परतफेड करण्यासाठी विधवा महिलांना त्यांच्या मुलांना गहाण ठेवण्याचा धक्कादायक प्रकार ओडिशात समोर आला आहे. याबाबत करण्यात आलेल्या याचिकेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने ओडिशा आणि तेलंगणाच्या मुख्य सचिवांकडून चार आठवड्यांत कारवाईचा अहवाल मागवला आहे.

गरीब विधवांच्या मुलांना मजूर म्हणून काम करण्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल आयोगाने केला आहे. कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या महिलांच्या मुलांना मजूर म्हणून काम करण्यास भाग पाडले जात असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये आढळून आले आहे. स्वातंत्र्यानंतर आपण समाजाचे वर्णन सुशिक्षित आणि जागरूक असे करतो. अशा काळात गरीब वर्गाला अशा प्रकारे जबरदस्तीने गुलामगिरीने वागवले जात आहे.

मानवाधिकार कार्यकर्ते राधाकांत त्रिपाठी यांनी गरीब विधवा महिला व त्यांच्या मुलांची हेळसांड याबाबत याचिका दाखल केली आहे. कर्जाची परतफेड न केल्यामुळे काही मुलांना इतर लोकांची गुरे चारावी लागतात तर काहींना वीटभट्टीवर काम करावे लागले, असे या याचिकेत म्हटले आहे.

प्रकरण पहिले...

ओडिशातील बलांगीर जिल्ह्यातील शुकदेव परभुये हे हैदराबादजवळील वीटभट्टीवर काम करायचे. आजारी पडल्याने ८ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. शुकदेव यांनी भट्टीमालकाकडून ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले असल्याने त्यांच्या पत्नीला त्यांची १२ वर्षांची मुलगी गहाण ठेवण्यास भाग पाडण्यात आले.

प्रकरण दुसरे...

ओडिशातील क्योंझर जिल्ह्याच्या गढुली गावातील सावित्री नायक या आदिवासी महिलेने २६ जानेवारी २०१६ रोजी आपल्या पतीच्या अंत्यसंस्कारासाठी शेजाऱ्याकडून ५ हजार रुपये उसने घेतले होते. त्याची परतफेड करण्यात अपयश आल्याने ३ मुलांची आई १३ आणि ११ वर्षांच्या दोन मुलांना गहाण ठेवण्यास भाग पाडण्यात आले. कर्ज फेडून घेण्यासाठी त्यांच्याकडून महिनाभराहून अधिक काळ शेजाऱ्याची गुरे चारणे तसेच इतर कामे करून घेण्यात आली.

टॅग्स :OdishaओदिशाTelanganaतेलंगणा