शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कर्ज फेडण्यासाठी मुलांना ठेवावे लागले गहाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 11:12 IST

मानवाधिकार आयोगाने २ राज्यांच्या मुख्य सचिवांना मागितले उत्तर

भुवनेश्वर : कर्जाची परतफेड करण्यासाठी विधवा महिलांना त्यांच्या मुलांना गहाण ठेवण्याचा धक्कादायक प्रकार ओडिशात समोर आला आहे. याबाबत करण्यात आलेल्या याचिकेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने ओडिशा आणि तेलंगणाच्या मुख्य सचिवांकडून चार आठवड्यांत कारवाईचा अहवाल मागवला आहे.

गरीब विधवांच्या मुलांना मजूर म्हणून काम करण्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल आयोगाने केला आहे. कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या महिलांच्या मुलांना मजूर म्हणून काम करण्यास भाग पाडले जात असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये आढळून आले आहे. स्वातंत्र्यानंतर आपण समाजाचे वर्णन सुशिक्षित आणि जागरूक असे करतो. अशा काळात गरीब वर्गाला अशा प्रकारे जबरदस्तीने गुलामगिरीने वागवले जात आहे.

मानवाधिकार कार्यकर्ते राधाकांत त्रिपाठी यांनी गरीब विधवा महिला व त्यांच्या मुलांची हेळसांड याबाबत याचिका दाखल केली आहे. कर्जाची परतफेड न केल्यामुळे काही मुलांना इतर लोकांची गुरे चारावी लागतात तर काहींना वीटभट्टीवर काम करावे लागले, असे या याचिकेत म्हटले आहे.

प्रकरण पहिले...

ओडिशातील बलांगीर जिल्ह्यातील शुकदेव परभुये हे हैदराबादजवळील वीटभट्टीवर काम करायचे. आजारी पडल्याने ८ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. शुकदेव यांनी भट्टीमालकाकडून ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले असल्याने त्यांच्या पत्नीला त्यांची १२ वर्षांची मुलगी गहाण ठेवण्यास भाग पाडण्यात आले.

प्रकरण दुसरे...

ओडिशातील क्योंझर जिल्ह्याच्या गढुली गावातील सावित्री नायक या आदिवासी महिलेने २६ जानेवारी २०१६ रोजी आपल्या पतीच्या अंत्यसंस्कारासाठी शेजाऱ्याकडून ५ हजार रुपये उसने घेतले होते. त्याची परतफेड करण्यात अपयश आल्याने ३ मुलांची आई १३ आणि ११ वर्षांच्या दोन मुलांना गहाण ठेवण्यास भाग पाडण्यात आले. कर्ज फेडून घेण्यासाठी त्यांच्याकडून महिनाभराहून अधिक काळ शेजाऱ्याची गुरे चारणे तसेच इतर कामे करून घेण्यात आली.

टॅग्स :OdishaओदिशाTelanganaतेलंगणा