शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लग्न न करता झालेल्या मुलांचाही पालकांच्या संपत्तीवर हक्क, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 12:14 IST

विवाह न करता जन्मलेल्या मुलांना हिंदू कायद्यानुसार त्यांच्या पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळविण्याचा अधिकार आहे का, या २०११ च्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. 

नवी दिल्ली : मान्यताप्राप्त नसलेल्या विवाहातून जन्मलेली मुले कायद्याच्या दृष्टीने वैध आहेत, तसेच हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत ते पालकांच्या मालमत्तेवर दावा करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. 

हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, मान्यताप्राप्त नसलेल्या विवाहात पुरुष आणि स्त्री यांना पती- पत्नीचा दर्जा मिळत नाही. मान्यता नसलेले विवाह रद्द करण्यासाठी आदेशाची गरज नाही, तर कोणत्याही एका बाजूच्या विनंतीवरून रद्द केला जाऊ शकतो, त्याला अमान्य करण्यायोग्य विवाह, असे संबोधले जाते.

विवाह न करता जन्मलेल्या मुलांना हिंदू कायद्यानुसार त्यांच्या पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळविण्याचा अधिकार आहे का, या २०११ च्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. 

मुलींनाही समान अधिकारसरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एका निकालात म्हटले आहे की, आम्ही असा निष्कर्ष काढला आहे की, मान्यता नसलेल्या विवाहातून जन्मलेल्या मुलांना घटनात्मक वैधता दिली जाऊ शकते, तसेच हिंदू विवाह कायद्याच्या कलम १६ (२)च्या संदर्भात अमान्य करण्यायोग्य विवाह रद्द करण्यापूर्वी जन्मलेले मूल कायदेशीर आहे. त्याचप्रमाणे मुलींनाही समान अधिकार देण्यात आले आहेत.

कोर्ट म्हणाले... सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने २०११ च्या या प्रकरणात स्पष्ट केले की, भलेही ही संपत्ती स्वअर्जित असो वा वडिलोपार्जित अशा संपत्तीवर या मुलांना अधिकार आहे. दोन न्यायाधीशांच्या पीठाने ३१ मार्च २०११ रोजी हे प्रकरण एका मोठ्या खंडपीठाकडे पाठविले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय