शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

लग्न न करता झालेल्या मुलांचाही पालकांच्या संपत्तीवर हक्क, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 12:14 IST

विवाह न करता जन्मलेल्या मुलांना हिंदू कायद्यानुसार त्यांच्या पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळविण्याचा अधिकार आहे का, या २०११ च्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. 

नवी दिल्ली : मान्यताप्राप्त नसलेल्या विवाहातून जन्मलेली मुले कायद्याच्या दृष्टीने वैध आहेत, तसेच हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत ते पालकांच्या मालमत्तेवर दावा करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. 

हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, मान्यताप्राप्त नसलेल्या विवाहात पुरुष आणि स्त्री यांना पती- पत्नीचा दर्जा मिळत नाही. मान्यता नसलेले विवाह रद्द करण्यासाठी आदेशाची गरज नाही, तर कोणत्याही एका बाजूच्या विनंतीवरून रद्द केला जाऊ शकतो, त्याला अमान्य करण्यायोग्य विवाह, असे संबोधले जाते.

विवाह न करता जन्मलेल्या मुलांना हिंदू कायद्यानुसार त्यांच्या पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळविण्याचा अधिकार आहे का, या २०११ च्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. 

मुलींनाही समान अधिकारसरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एका निकालात म्हटले आहे की, आम्ही असा निष्कर्ष काढला आहे की, मान्यता नसलेल्या विवाहातून जन्मलेल्या मुलांना घटनात्मक वैधता दिली जाऊ शकते, तसेच हिंदू विवाह कायद्याच्या कलम १६ (२)च्या संदर्भात अमान्य करण्यायोग्य विवाह रद्द करण्यापूर्वी जन्मलेले मूल कायदेशीर आहे. त्याचप्रमाणे मुलींनाही समान अधिकार देण्यात आले आहेत.

कोर्ट म्हणाले... सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने २०११ च्या या प्रकरणात स्पष्ट केले की, भलेही ही संपत्ती स्वअर्जित असो वा वडिलोपार्जित अशा संपत्तीवर या मुलांना अधिकार आहे. दोन न्यायाधीशांच्या पीठाने ३१ मार्च २०११ रोजी हे प्रकरण एका मोठ्या खंडपीठाकडे पाठविले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय