शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

पालकांच्या वैवाहिक कलहात सर्वाधिक कुचंबणा मुलांचीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 06:24 IST

सुप्रीम कोर्टाचे मत : पालकांना सबुरीचा सल्ला; घटस्फोटाने वेगळे झालात तरी अपत्यांची जबाबदारी संपत नाही

नवी दिल्ली : घटस्फोट घेणाऱ्या दाम्पत्यांमध्ये मुलांच्या ताब्यावरून दीर्घकाळ चालणाºया कोर्टकज्ज्यांचा वाईट परिणाम त्यांच्या मुलांवर होतो. न्यायालय मुलाच्या हिताचा विचार करून योग्य वाटेल त्या पालकाकडे त्याचा ताबा देते खरे; पण तो आयुष्यात पुढे त्या मुलाच्या दृष्टीने किती योग्य ठरेल याचीही शाश्वती नसते, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

दिल्लीतील एका दाम्पत्याचा घटस्फोटाचा दावा १० वर्षे प्रलंबित आहे व ते वेगळे राहतात. मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा यावरून त्यांचा वादही सुरू होता. या वादावर पडदा टाकताना न्या. अजय खानविलकर व न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने वरील उद्वेग व्यक्त केला. घटस्फोट घेऊन वेगळे झालात तरी अपत्यांच्या पालकत्वाची जबाबदारी संपत नाही. त्यामुळे भांडण आणि कोर्टकज्जे करताना मुलांचे आणि त्यांच्या भवितव्याचेही भान ठेवा. टोकाला न जाता संयम बाळगा, असा सल्लाही न्यायालयाने काडीमोड घेणाºया सर्वच दाम्पत्यांना उद्देशून दिला. न्यायालयाने असेही म्हटले की, लहान मुलांच्या निकोप वाढीसाठी एकत्र कुटुंब पद्धती खरी तर आदर्श असते. आजी-आजोबा आणि नातवंडांचे एकत्र राहणे परस्परांच्या फायद्याचे व पूरक असते; पण सर्वाच्याच नशिबात असे आदर्श आयुष्य, म्हातारपण, बालपण असते असे नाही. विभक्त कुटुंब पद्धतीत राहणाºया दाम्पत्याच्या सहजीवनात जेव्हा बिव्बा पडतो व मजल घटस्फोटापर्यंत जाते, तेव्हा अजाण मुलांची जास्तच ओढाताण होते.पालकांचे सहचर्य आवश्यकमुलांच्या निकोप वाढीसाठी त्यांना दोन्ही पालकांचे साहचर्य आवश्यक असते. घटस्फोटासोबत जेव्हा मुलांच्या ताब्याचा प्रश्न येतो तेव्हा मुलांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे प्रस्थापित न्यायतत्त्व आहे. त्यानुसार समोर आलेल्या तथ्यांचा विचार करून न्यायालय आपल्या विवेकानुसार दोनपैकी एका पालकाकडे मुलाचा ताबा देते; पण न्यायसंमत ताटातुटीने मुलांचे भावनिक विश्व मात्र पार उद््ध्वस्त होते.-न्या. खानविलकर व न्या. रस्तोगी, सर्वोच्च न्यायालय

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयmarriageलग्न