शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

बालविवाहांमुळे लव्ह जिहादला आळा बसेल- भाजप आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 09:03 IST

भाजप आमदाराचं अजब तर्कट

भोपाळ: उशिरा होणाऱ्या विवाहांमुळेच लव्ह जिहादला बळ मिळत असल्याचा अजब दावा भाजपच्या आमदारानं केला आहे. इतकंच नव्हे, तर बालविवाहांमुळे लव्ह जिहादला आळा बसेल, असंही या आमदारानं म्हटलंय. पूर्वी बालविवाहाची प्रथा होती. वर आणि वधू यांनी एकमेकांना पाहिलेलं नसतानाही ज्येष्ठ मंडळींकडून त्यांचं लग्न करुन दिलं जायचं. या प्रथेचं आपण समर्थन करत असल्याचं मध्य प्रदेशचे भाजप आमदार गोपाल परमार यांनी म्हटलं.'पूर्वी मुलींचं वय 18 वर्षे होण्याआधीच त्यांचं लग्न करुन दिलं जायचं. मुलांचा विवाहदेखील 21 वर्षे पूर्ण होण्याआधीच केला जायचा. पूर्वी कमी वयातच मुलामुलांची लग्न ठरवली जायची. लवकर लग्न ठरवल्यामुळे मुलं चुकीच्या मार्गावर जाण्याचं प्रमाण कमी होतं. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याआधीच मुलांचं लग्न ठरवलं जायचं. मात्र आता मुलं कोचिंग क्लासला जातात. तिकडे ते लव्ह जिहादसारख्या सापळ्यांमध्ये अडकतात,' असं गोपाल परमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं. परमार मध्यप्रदेशमधील अगर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. उशिरा होणारे विवाह लव्ह जिहादला जबाबदार असल्याचं अजब तर्कट परमार यांनी मांडलं. 'मुली अतिशय संवेदनशील असतात. त्यांना कोणी मदत करत असेल, तर त्या सहज फसतात. मग त्या त्यांचं नाव आणि त्यांची ओळख बदलण्यासाठी तयार होतात,' असं परमार म्हणाले. आपण स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींचे विवाह बालपणीच ठरवले असल्याचंही त्यांनी सांगितलं. 'माझा बालविवाह झालाय आणि माझ्या मुलांची लग्नदेखील मी त्यांच्या लहानपणीच ठरवली आहेत. मी माझ्या दोन मुली आणि एका मुलाचं लग्न सज्ञान होण्याआधीच ठरवलंय,' असं परमार म्हणाले. यामुळे माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य आनंदात असल्याचंही त्यांना सांगितलं.  

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशLove Jihadलव्ह जिहाद