शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

सावधान! व्हॉट्सअपवरील एक चुकीचा संदेश ठरू शकतो जीवघेणा; अनेक लोकांचे गेले जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 12:19 IST

व्हॉट्सअप मॅसेजच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात अफवा पसरवून हिंसाचाराचे प्रकार घडविले जात आहेत. 

नवी दिल्ली - व्हॉट्सअपवर येणारे संदेश कोणतीही खातरजमा न करता पुढे फॉरवर्ड करून दिले जातात. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांना खतपाणी मिळतं. संपूर्ण देशात मुलं चोरी होण्याची अफवा पसरल्यापासून सामुहिक हिंसाचारातून अनेक निर्दोष लोकांचे जीव गेले आहेत. मागील 3 वर्षात 50 पेक्षा अधिक लोकांचे जीव सामुहिक हिंसाचारात गेले आहेत. 

गृह मंत्रालयाने याआधीच सर्व राज्याच्या पोलील प्रमुखांना अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तरीही अशा घटनांच्या संख्येत कमी होताना दिसत नाही. सुरक्षा यंत्रणांच्यानुसार उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, झारखंडपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक हत्यांच्या मागे एकच कारण समजलं आहे ते म्हणजे व्हॉट्सअपवरून पसरणारी अफवा. व्हॉट्सअप मॅसेजच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात अफवा पसरवून हिंसाचाराचे प्रकार घडविले जात आहेत. 

व्हायरल केला जातो मॅसेजलहान मुलं चोरी करण्याच्या नावावर हे मॅसेज फिरवले जातात. एखाद्या परिसरातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मुलं चोरी करणारी टोळी परिसरात सक्रीय झाली आहे. त्यातून एखाद्यावर संशयावर बळावला तर सामुहिक हिंसाचारातून त्याची हत्या केली जाते. 

या मॅसेजमधील खोटी अफवा सत्य दाखविण्यासाठी एक व्हिडीओ पसरविला जातो. यामध्ये पाकिस्तानात मुलं चोरी होण्यापासून रोखण्यासाठी बनविलेल्या डॉक्युमेंट्रीचा भाग असतो. तर दुसरा व्हिडीओ बांग्लादेशचा आहे. या व्हिडीओंना एडिट करून पसरविणारी अफवा सत्य असल्याचा भास निर्माण केला जातो. अशा मॅसेजमुळे मानसिक रुग्ण, महिला यांना मुलं चोरी करणारी टोळी समजून लोकांकडून मार दिला जातो. 

मुलं चोरी करण्याची अफवा पसरवून निर्दोष लोकांचे जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच यूपीमध्ये असा 18 घटना समोर आल्या. यात 50 हून अधिक लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरूवारी मुलं चोरी करणारा समजून एका साधूला मारहाण केल्याची घटना यूपीच्या गाजियाबाद येथे घडली. त्यामुळे व्हॉट्सअपवर येणारे संदेश फॉरवर्ड करण्याआधी त्याची खातरजमा करून घ्या, कारण तुमच्या एका चुकीच्या संदेशामुळे निर्दोष लोकांचे जीव जाण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपPoliceपोलिसMurderखून