शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सावधान! व्हॉट्सअपवरील एक चुकीचा संदेश ठरू शकतो जीवघेणा; अनेक लोकांचे गेले जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 12:19 IST

व्हॉट्सअप मॅसेजच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात अफवा पसरवून हिंसाचाराचे प्रकार घडविले जात आहेत. 

नवी दिल्ली - व्हॉट्सअपवर येणारे संदेश कोणतीही खातरजमा न करता पुढे फॉरवर्ड करून दिले जातात. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांना खतपाणी मिळतं. संपूर्ण देशात मुलं चोरी होण्याची अफवा पसरल्यापासून सामुहिक हिंसाचारातून अनेक निर्दोष लोकांचे जीव गेले आहेत. मागील 3 वर्षात 50 पेक्षा अधिक लोकांचे जीव सामुहिक हिंसाचारात गेले आहेत. 

गृह मंत्रालयाने याआधीच सर्व राज्याच्या पोलील प्रमुखांना अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तरीही अशा घटनांच्या संख्येत कमी होताना दिसत नाही. सुरक्षा यंत्रणांच्यानुसार उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, झारखंडपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक हत्यांच्या मागे एकच कारण समजलं आहे ते म्हणजे व्हॉट्सअपवरून पसरणारी अफवा. व्हॉट्सअप मॅसेजच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात अफवा पसरवून हिंसाचाराचे प्रकार घडविले जात आहेत. 

व्हायरल केला जातो मॅसेजलहान मुलं चोरी करण्याच्या नावावर हे मॅसेज फिरवले जातात. एखाद्या परिसरातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मुलं चोरी करणारी टोळी परिसरात सक्रीय झाली आहे. त्यातून एखाद्यावर संशयावर बळावला तर सामुहिक हिंसाचारातून त्याची हत्या केली जाते. 

या मॅसेजमधील खोटी अफवा सत्य दाखविण्यासाठी एक व्हिडीओ पसरविला जातो. यामध्ये पाकिस्तानात मुलं चोरी होण्यापासून रोखण्यासाठी बनविलेल्या डॉक्युमेंट्रीचा भाग असतो. तर दुसरा व्हिडीओ बांग्लादेशचा आहे. या व्हिडीओंना एडिट करून पसरविणारी अफवा सत्य असल्याचा भास निर्माण केला जातो. अशा मॅसेजमुळे मानसिक रुग्ण, महिला यांना मुलं चोरी करणारी टोळी समजून लोकांकडून मार दिला जातो. 

मुलं चोरी करण्याची अफवा पसरवून निर्दोष लोकांचे जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच यूपीमध्ये असा 18 घटना समोर आल्या. यात 50 हून अधिक लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरूवारी मुलं चोरी करणारा समजून एका साधूला मारहाण केल्याची घटना यूपीच्या गाजियाबाद येथे घडली. त्यामुळे व्हॉट्सअपवर येणारे संदेश फॉरवर्ड करण्याआधी त्याची खातरजमा करून घ्या, कारण तुमच्या एका चुकीच्या संदेशामुळे निर्दोष लोकांचे जीव जाण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपPoliceपोलिसMurderखून