शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बालवयातील गुन्हा चारित्र्यावर कलंक नव्हे - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 06:14 IST

रमेश बिश्नोई या राजस्थानमधील तरुणाच्या प्रकरणात हा निकाल दिला गेला.

नवी दिल्ली : अल्पवयीन असताना केलेल्या फौैजदारी गुन्ह्याबद्दल एखाद्यास शिक्षा झाली असली तरी तो त्याच्या चारित्र्यावर कलंक ठरत नाही. बालगुन्हेगार म्हणून झालेल्या शिक्षेमुळे ती व्यक्ती सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरत नाही, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.न्या. उदय उमेश लळीत आणि न्या. विनीत सरन यांनी म्हटले की, नैतिक अध:पतन म्हणावे, अशा गुन्ह्याचा आरोप असणे व त्यासाठीची शिक्षा ही सरकारी नोकरीसाठी अपात्रता असते. मात्र, बालगुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्यास ही अपात्रता लागू होत नाही. बालगुन्हेगार म्हणून एखाद्यास शिक्षा झाली तरी त्याचे पूर्वचारित्र्य पूर्णपणे पुसून टाकण्याची स्पष्ट तरतूद बालगुन्हेगारी कायद्यात आहे.न्यायालय म्हणते की, बालगुन्हेगारांना पूर्वचारित्र्य पुसून कोऱ्या पाटीने नवे आयुष्य जगता यावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून जबाबदार नागरिक म्हणून जगता यावे हा बालगुन्हेगारी कायद्याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे बालवयातील गुन्हेगारी ही सरकारी नोकरीसाठी अपात्रता मानणे हे कायद्याच्या उद्देशाला हरताळ फासण्यासारखे आहे.रमेश बिश्नोई या राजस्थानमधील तरुणाच्या प्रकरणात हा निकाल दिला गेला. रमेश यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआरपीएफ) एक महिन्यात उपनिरीक्षकपदी नियुक्ती करावी, असा आदेशही दिला गेला. सीआरपीएफने २०१५ मध्ये उपनिरीक्षक पदांसाठी जाहिरात दिली. लेखी परीक्षा, मुलाखत व शारीरिक क्षमता चाचणीच्या आधारे रमेश यांची निवड झाली. त्यांना नियुक्तीपत्रही दिले. नेमणुकीवर रुजू होण्याआधी त्यांनी एक फॉर्म भरून दिला. त्यात त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी मुलीची छेड काढणे व तिचा हात पकडणे याबद्दल गुन्हा नोंदवून आपल्यावर खटला दाखल केला गेला होता, असे प्रामाणिकपणे नमूद केले.मुलीने व तिच्या पालकांनी आपल्याला माफ करायचे ठरवून कोर्टात साक्ष दिली नाही. परिणामी, आपली निर्दोष मुक्तता केली. असेही त्याने नमूद केले; पण ते निर्दोष ठरले असले तरी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता, या मुद्यावर रमेश यांना नोकरीसाठी अपात्र ठरविले.हायकोर्टाचा निकालही रमेशच्या बाजूनेयाविरुद्ध दाद मागितली असता, राजस्थान उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. त्याविरुद्ध केंद्र सरकारचे अपील द्विसदस्यीय खंडपीठाने फेटाळले. त्यामुळे सरकार सर्वोच्च न्यायालयात आले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय