शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

"मोदींना श्रीरामाचा आशीर्वाद, जे देवाचं अस्तित्व नाकारतात ते..", संजय राऊतांना सणसणीत चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 15:45 IST

राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी घेतला खरपूस समाचार

Ram Mandir PM Modi Sanjay Raut : राम जन्मभूमीचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत होता. काही महिन्यांपूर्वी या मंदिराचे भूमिपुजन झाले आणि आता २२ जानेवारी २०२४ ला रामलल्ला अयोध्येच्या राममंदिरात विराजमान होणार आहेत. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. राम जन्मभूमी न्यासाकडून त्यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, त्यांना निमंत्रण देण्याची काहीच गरज नव्हती. ते स्वत:हून आले असते. यावर आता थेट राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.  

राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, "प्रत्येक जण आपापल्या वैचारिक पात्रतेनुसार बोलतो. संजय राऊत यांना नेहमी निवडणुकाच दिसतात. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा हा विश्वास, श्रद्धा आणि आस्थेचा प्रश्न आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिराची पायाभरणी आणि भूमिपुजनासाठीही पंतप्रधान मोदी आले होते. यावेळच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रणही मोदींनी स्वीकारले आहे."

"राम मंदिराची नव्याने उभारणी ही बाब बलिदानाशी जोडू नका. हा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. राजकारण आणि निवडणुका या गोष्टी येत-जात राहतात, त्याबद्दल फारसा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. सर्व राजकीय पक्षांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पंतप्रधान मोदींना खुद्द प्रभूश्रीरामाचा आशीर्वाद आहे. म्हणूनच ते सत्तेत आहेत आणि यापुढेही राहतील. जे लोक श्रीरामाचे अस्तित्व आणि देवत्व नाकारतात ते रस्त्यावरच फिरत बसतात आणि त्यांना यापुढेही तेच करत बसावं लागेल."

संजय राऊत काय म्हणाले होते?

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावर बोलताना राऊतांना पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले होते. "पंतप्रधान मोदी यांना अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्याची काहीच गरज नव्हती. ते स्वत:हूनच आले असते. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे ते नक्कीच हजर राहिले असते. राम मंदिराबद्दलचा इतका मोठा कार्यक्रम कोणी का सोडेल? राम मंदिर बांधणीसाठी हजारो कारसेवकांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले. सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्ष यात सहभागी होते. शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद सारेच यात सहभागी होते. लालकृष्ण अडवाणी यांनी रथ यात्रा काढली होती. या साऱ्या गोष्टींचा एकत्रित निकाल म्हणजे राम मंदिराची उभारणी आहे. त्यामुळे मोदीजी नक्कीच जातील. पण मला असं वाटतं की आता निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे राम मंदिर हा मुद्दा निवडणुकांसाठी वापरला जाणार आहे," असा आरोप राऊतांनी केला.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSanjay Rautसंजय राऊतprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी