शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

"मोदींना श्रीरामाचा आशीर्वाद, जे देवाचं अस्तित्व नाकारतात ते..", संजय राऊतांना सणसणीत चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 15:45 IST

राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी घेतला खरपूस समाचार

Ram Mandir PM Modi Sanjay Raut : राम जन्मभूमीचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत होता. काही महिन्यांपूर्वी या मंदिराचे भूमिपुजन झाले आणि आता २२ जानेवारी २०२४ ला रामलल्ला अयोध्येच्या राममंदिरात विराजमान होणार आहेत. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. राम जन्मभूमी न्यासाकडून त्यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, त्यांना निमंत्रण देण्याची काहीच गरज नव्हती. ते स्वत:हून आले असते. यावर आता थेट राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.  

राम जन्मभूमी न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, "प्रत्येक जण आपापल्या वैचारिक पात्रतेनुसार बोलतो. संजय राऊत यांना नेहमी निवडणुकाच दिसतात. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा हा विश्वास, श्रद्धा आणि आस्थेचा प्रश्न आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिराची पायाभरणी आणि भूमिपुजनासाठीही पंतप्रधान मोदी आले होते. यावेळच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रणही मोदींनी स्वीकारले आहे."

"राम मंदिराची नव्याने उभारणी ही बाब बलिदानाशी जोडू नका. हा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. राजकारण आणि निवडणुका या गोष्टी येत-जात राहतात, त्याबद्दल फारसा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. सर्व राजकीय पक्षांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पंतप्रधान मोदींना खुद्द प्रभूश्रीरामाचा आशीर्वाद आहे. म्हणूनच ते सत्तेत आहेत आणि यापुढेही राहतील. जे लोक श्रीरामाचे अस्तित्व आणि देवत्व नाकारतात ते रस्त्यावरच फिरत बसतात आणि त्यांना यापुढेही तेच करत बसावं लागेल."

संजय राऊत काय म्हणाले होते?

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावर बोलताना राऊतांना पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले होते. "पंतप्रधान मोदी यांना अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्याची काहीच गरज नव्हती. ते स्वत:हूनच आले असते. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे ते नक्कीच हजर राहिले असते. राम मंदिराबद्दलचा इतका मोठा कार्यक्रम कोणी का सोडेल? राम मंदिर बांधणीसाठी हजारो कारसेवकांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले. सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्ष यात सहभागी होते. शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद सारेच यात सहभागी होते. लालकृष्ण अडवाणी यांनी रथ यात्रा काढली होती. या साऱ्या गोष्टींचा एकत्रित निकाल म्हणजे राम मंदिराची उभारणी आहे. त्यामुळे मोदीजी नक्कीच जातील. पण मला असं वाटतं की आता निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे राम मंदिर हा मुद्दा निवडणुकांसाठी वापरला जाणार आहे," असा आरोप राऊतांनी केला.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSanjay Rautसंजय राऊतprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी