शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

मुख्यमंत्र्यांच्या मोबाइलचे नेटवर्क गायब झाले! पोलिसांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांना मध्यरात्री उचलून नेले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 11:05 IST

अत्यंत महत्त्वाचं काम असताना मोबाइल नेटवर्क गायब झाल्याचा अनुभव तुम्हालाही अनेकदा आला असेल.

ठळक मुद्देराजभवनातील जन चौपाल कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांनी मोबाइलला नेटवर्क येत नसल्याची तक्रार केली होती.त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.दरम्यान, सीएमओने या घटनेला दुजोरा दिलेला नाही. मात्र विरोधी पक्ष नेत्यांनी अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कृतीचा निषेध केला आहे.

रांची - अत्यंत महत्त्वाचं काम असताना मोबाइल नेटवर्क गायब झाल्याचा अनुभव तुम्हालाही अनेकदा आला असेल. असाच अनुभव झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांना आला. राजभवनातील जन चौपाल कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांनी मोबाइलला नेटवर्क येत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास हे सोमवारी रात्री राजभवनातील जन चौपाल कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्या, मुख्यमंत्र्यांनी मोबाइलला नेटवर्क येत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर तातडीने कार्यरत झालेल्या पोलिसांनी बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. अखेरीस पहाटे तीन वाजता या अधिकाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. राजभवनात थांबलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मोबाइलला नेटवर्क न आल्याने दुमका येथील टेलिकॉम जिल्हा व्यवस्थापक पी. के. सिंह आणि सहाय्यक ज्युनिअर टेलिकॉम अधिकारी यांना शिक्षा म्हणून तीन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. या दोन्ही अधिकाऱ्यांना मध्यरात्री उशिरा अटक करण्यात आली होती. दरम्यान, सीएमओने या घटनेला दुजोरा दिलेला नाही. मात्र विरोधी पक्ष नेत्यांनी अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कृतीचा निषेध केला आहे. तसेच ही कारवाई म्हणजे मुख्यमंत्र्यांचे फॅरिस्ट विचार आहेत, ''असे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. केवळ मुख्यमंत्र्यांच्या मोबइलला नेटवर्क आले नाही म्हणून या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. ही बाब मुख्यमंत्र्यांती फॅसिस्ट विचारसरणी अधोरेखित करते.'' असे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे बीएसएनएल कर्मचारी संतप्त झाले आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलGovernmentसरकार