शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

Hathras case: "सर्व नमुन्यांची होतेय पोलखोल, हाथरसमध्ये कुठल्याही प्रकारचे कारस्थान यशस्वी होणार नाही"

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 7, 2020 16:53 IST

योगी म्हणाले, सरकार विकासाच्या कामात गुंतले आहे. तर हे लोक कट-कारस्थान करण्यात व्यस्त आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत यांपैकी एकही चेहरा जनतेत दिसला नाही. (yogi adityanath)

ठळक मुद्देउत्तर प्रदेशात दंगल घडवण्यासाठी मॉरिशसमधून फंडिंग'एक्सप्रेस वे ते एअरपोर्टपर्यंत होतोय यूपीचा विकास'समाजोपयोगी योजना चांगल्या वाटत नाहीत, म्हणून कट-कारस्थान

लखनौ - हाथरसप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधक हाथरस प्रकरणावरून राजकारण करत आहेत. कट-कारस्थान केले जात आहेत. कट-कारस्थानासाठी परदेशातून फंडिंग करण्यात आली. मात्र, हे कट-कारस्थान कोणत्याही स्थितीत यशस्वी होऊ दिले जाणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

योगी म्हणाले, सरकार विकासाच्या कामात गुंतले आहे. तर हे लोक कट-कारस्थान करण्यात व्यस्त आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत यांपैकी एकही चेहरा जनतेत दिसला नाही.

विरोधक राज्यात दंगलीची स्वप्न बघतायत, आंतरराष्ट्रीय फंडिंगने कट-कारस्थान; योगींचा विरोधकांवर हल्लाबोल

उत्तर प्रदेशात दंगल घडवण्यासाठी मॉरिशसमधून फंडिंग -हाथरस प्रकरणासंदर्भात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठा दावा केला आहे. उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवून आणण्यासाठी फंडिंग करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर ही फंडिंग मॉरिशसमधून झाली असल्याचे ईडीने म्हटले आहे. यावर बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, जनतेच्या विश्वासाशी खेळ खेळण्याची मुभा कुणालाही दिली जाणार नाही. 

'एक्सप्रेस वे ते एअरपोर्टपर्यंत होतोय यूपीचा विकास' -योगी आदित्यनाथ म्हणाले, समाजात द्वेष भावना निर्माण करून विकासात अडचणी निर्माण करण्याची काही लोकांची इच्छा आहे. विकासाच्या बाबतीत उत्तर प्रदेश वेगाने पुढे जात आहे. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात केवळ दोनच एक्सप्रेस वे होते. आमचे सरकार आल्यापासून तीन वर्षात तीन नवे एक्सप्रेस वे तयार होत आहेत. 2014पर्यंत उत्तर प्रदेशात केवळ दोनच विमानतळं कार्यरत होती. आता 7 विमानतळं कार्यरत आहेत. तर 12 नव्या एयरपोर्टवरील काम सुरू झाले आहे.

Hathras Gangrape: आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही, यूपी पोलीस अन् सरकारवरही विश्वास नाही; पीडितेच्या आईची प्रतिक्रिया

समाजोपयोगी योजना चांगल्या वाटत नाहीत, म्हणून कट-कारस्थान -योगी म्हणाले, या लोकांना हितकारक, समाजोपयोगी योजना चांगल्या वाटत नाहीत. विकासाच्या मुद्द्यांवर सरकारविरोधात प्रश्न उपस्थित करू शकत नाहीत, म्हणून आता, अशा प्रकारचे कट-कारस्थान आखत आहेत. मात्र, आता या नमुन्यांची पोलखोल होत आहे. यांचे कारस्थान जनतेसमोर येत आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस