शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Hathras case: "सर्व नमुन्यांची होतेय पोलखोल, हाथरसमध्ये कुठल्याही प्रकारचे कारस्थान यशस्वी होणार नाही"

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 7, 2020 16:53 IST

योगी म्हणाले, सरकार विकासाच्या कामात गुंतले आहे. तर हे लोक कट-कारस्थान करण्यात व्यस्त आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत यांपैकी एकही चेहरा जनतेत दिसला नाही. (yogi adityanath)

ठळक मुद्देउत्तर प्रदेशात दंगल घडवण्यासाठी मॉरिशसमधून फंडिंग'एक्सप्रेस वे ते एअरपोर्टपर्यंत होतोय यूपीचा विकास'समाजोपयोगी योजना चांगल्या वाटत नाहीत, म्हणून कट-कारस्थान

लखनौ - हाथरसप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधक हाथरस प्रकरणावरून राजकारण करत आहेत. कट-कारस्थान केले जात आहेत. कट-कारस्थानासाठी परदेशातून फंडिंग करण्यात आली. मात्र, हे कट-कारस्थान कोणत्याही स्थितीत यशस्वी होऊ दिले जाणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

योगी म्हणाले, सरकार विकासाच्या कामात गुंतले आहे. तर हे लोक कट-कारस्थान करण्यात व्यस्त आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत यांपैकी एकही चेहरा जनतेत दिसला नाही.

विरोधक राज्यात दंगलीची स्वप्न बघतायत, आंतरराष्ट्रीय फंडिंगने कट-कारस्थान; योगींचा विरोधकांवर हल्लाबोल

उत्तर प्रदेशात दंगल घडवण्यासाठी मॉरिशसमधून फंडिंग -हाथरस प्रकरणासंदर्भात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठा दावा केला आहे. उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवून आणण्यासाठी फंडिंग करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर ही फंडिंग मॉरिशसमधून झाली असल्याचे ईडीने म्हटले आहे. यावर बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, जनतेच्या विश्वासाशी खेळ खेळण्याची मुभा कुणालाही दिली जाणार नाही. 

'एक्सप्रेस वे ते एअरपोर्टपर्यंत होतोय यूपीचा विकास' -योगी आदित्यनाथ म्हणाले, समाजात द्वेष भावना निर्माण करून विकासात अडचणी निर्माण करण्याची काही लोकांची इच्छा आहे. विकासाच्या बाबतीत उत्तर प्रदेश वेगाने पुढे जात आहे. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात केवळ दोनच एक्सप्रेस वे होते. आमचे सरकार आल्यापासून तीन वर्षात तीन नवे एक्सप्रेस वे तयार होत आहेत. 2014पर्यंत उत्तर प्रदेशात केवळ दोनच विमानतळं कार्यरत होती. आता 7 विमानतळं कार्यरत आहेत. तर 12 नव्या एयरपोर्टवरील काम सुरू झाले आहे.

Hathras Gangrape: आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही, यूपी पोलीस अन् सरकारवरही विश्वास नाही; पीडितेच्या आईची प्रतिक्रिया

समाजोपयोगी योजना चांगल्या वाटत नाहीत, म्हणून कट-कारस्थान -योगी म्हणाले, या लोकांना हितकारक, समाजोपयोगी योजना चांगल्या वाटत नाहीत. विकासाच्या मुद्द्यांवर सरकारविरोधात प्रश्न उपस्थित करू शकत नाहीत, म्हणून आता, अशा प्रकारचे कट-कारस्थान आखत आहेत. मात्र, आता या नमुन्यांची पोलखोल होत आहे. यांचे कारस्थान जनतेसमोर येत आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस