शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार; तारीखही ठरली, आमदारांना निर्देश, हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 08:19 IST

जदयू व राजदच्या सर्व आमदारांना सोमवारपर्यंत पाटण्यात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

- शरद गुप्तानवी दिल्ली: बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. जदयूचे माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने हा एक संकेत समजला जात आहे.मुख्यमंत्री नितीशकुमार पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलू शकतात. जदयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार व राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यात नव्या सरकारच्या गठनाबाबत चर्चाही झालेली आहे.

मुख्यमंत्री लवकरच राज्यपालांना पत्र पाठवून भाजपशी असलेले संबंध संपुष्टात आणतील. त्यानंतर राज्यात राजदच्या सहकाऱ्याने सरकारचे स्थापन करण्यात येईल. या सर्व घडामोडी कधीपर्यंत होतील, असे विचारले असता जदयूच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, बिहारमधील श्रावण संपण्यापूर्वी म्हणजे ११ ऑगस्टपूर्वी हे होऊ शकेल. राज्यात भाद्रपद महिन्यात शुभ कार्य केले जात नाहीत. जदयू व राजदच्या सर्व आमदारांना सोमवारपर्यंत पाटण्यात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

मागील काही दिवसांत राजद नेते तेजस्वी यादव व त्यांची बहीण मिसा यांच्या १७ ठिकाणांवर रेल्वे भरती घोटाळ्याबाबत सीबीआयने छापे टाकले होते. राजदचे म्हणणे आहे की, आता यानंतर केंद्र सरकारकडे राजद नेत्यांच्या विरोधात कोणतेही नवीन प्रकरण उरलेले नाही. त्यामुळे आता ईडी, सीबीआय किंवा आयकर खात्याची कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही.

असे आहे समीकरण

मागील विधानसभा निवडणुकीत २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत भाजपने ७४, राजदने ७५ व जदयूने ४३ जागा जिंकल्या होत्या. एक पोटनिवडणूक जिंकल्याने व एआयएमआयएमचे ४ आमदार बरोबर आल्यानंतर राजदच्या सदस्यांची संख्या ८० झाली. त्याचप्रमाणे विकासशील इन्सान पार्टीच्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या पक्षाच्या सदस्यांची संख्या ७७ झाली. जदयूचेही आता ४५ सदस्य आहेत. डाव्यांचे १६ आमदार आहेत.

जदयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही

जदयूचा कोणीही सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, अशी माहिती जदयू नेते व बिहारचे शिक्षणमंत्री विजयकुमार चौधरी यांनी दिली. याबाबत नितीशकुमार यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे. आरसीपी सिंह यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जदयूकडून कोण सहभागी होणार, याची चर्चा सुरू झाली होती; परंतु शिक्षणमंत्री म्हणाले की, भाजपशी संबंध बिघडल्याचा मुद्दा नाही. २०२४ च्या लोकसभा व २०२५ मधील विधानसभा निवडणुका भाजपबरोबर मिळून लढणार का, असे विचारले असता, ते म्हणाले की, आता आम्ही बरोबर आहोत. 

जदयू, राजदने आमदारांना पाटण्यात बोलावलेजदयू व राजदने आपापल्या आमदारांना तत्काळ पाटण्यात बोलावले आहे. यावरून राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची चर्चा सुरू झाली आहे. हम पक्षानेही आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार व तेजस्वी यादव यांनी फोनवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

तेजस्वी घेणार निर्णयस्वत:बाबत सुरू असलेल्या प्रकरणांच्या  पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनाच निर्णय घ्यायचा आहे की, सरकारमध्ये सहभागी व्हायचे आहे की नाही. जदयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार हे लालूंचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यांना मंत्रिमंडळात सहभागी करू इच्छित नाहीत.

नाराजीचे हे आहे कारणविधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या राष्ट्रीय लोकशक्ती पार्टीने भाजप नव्हे, तर केवळ जदयू उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढली होती. यामुळे जदयूची ताकद मागील निवडणुकीच्या ७१वरून ४३ आमदारांवर आली. त्याचबरोबर भाजपची ताकद ५३ वरून ७४ झाली. चिराग यांनी भाजपच्या सांगण्यावरून हे काम केले, असे नितीशकुमार मानतात. त्यामुळे आता ते भाजपला धडा शिकवू इच्छित आहेत.

बिहार मध्यावधी निवडणुकीकडे?

बिहारमधील सत्तारूढ जदयूमध्ये अंतर्गत धुमशान वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मध्यावधी निवडणुकीकडे जात आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी जदयूला रामराम केल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर प्रखर टीका केली आहे. नितीशकुमार हे सातजन्मात पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. जदयू म्हणजे बुडणारे जहाज आहे, असेही ते म्हणाले. आरसीपी सिंह यांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षात बंडखोरीचा बिगुल वाजू शकतो. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा