शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार; तारीखही ठरली, आमदारांना निर्देश, हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 08:19 IST

जदयू व राजदच्या सर्व आमदारांना सोमवारपर्यंत पाटण्यात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

- शरद गुप्तानवी दिल्ली: बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. जदयूचे माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने हा एक संकेत समजला जात आहे.मुख्यमंत्री नितीशकुमार पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलू शकतात. जदयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार व राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यात नव्या सरकारच्या गठनाबाबत चर्चाही झालेली आहे.

मुख्यमंत्री लवकरच राज्यपालांना पत्र पाठवून भाजपशी असलेले संबंध संपुष्टात आणतील. त्यानंतर राज्यात राजदच्या सहकाऱ्याने सरकारचे स्थापन करण्यात येईल. या सर्व घडामोडी कधीपर्यंत होतील, असे विचारले असता जदयूच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, बिहारमधील श्रावण संपण्यापूर्वी म्हणजे ११ ऑगस्टपूर्वी हे होऊ शकेल. राज्यात भाद्रपद महिन्यात शुभ कार्य केले जात नाहीत. जदयू व राजदच्या सर्व आमदारांना सोमवारपर्यंत पाटण्यात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

मागील काही दिवसांत राजद नेते तेजस्वी यादव व त्यांची बहीण मिसा यांच्या १७ ठिकाणांवर रेल्वे भरती घोटाळ्याबाबत सीबीआयने छापे टाकले होते. राजदचे म्हणणे आहे की, आता यानंतर केंद्र सरकारकडे राजद नेत्यांच्या विरोधात कोणतेही नवीन प्रकरण उरलेले नाही. त्यामुळे आता ईडी, सीबीआय किंवा आयकर खात्याची कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही.

असे आहे समीकरण

मागील विधानसभा निवडणुकीत २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत भाजपने ७४, राजदने ७५ व जदयूने ४३ जागा जिंकल्या होत्या. एक पोटनिवडणूक जिंकल्याने व एआयएमआयएमचे ४ आमदार बरोबर आल्यानंतर राजदच्या सदस्यांची संख्या ८० झाली. त्याचप्रमाणे विकासशील इन्सान पार्टीच्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या पक्षाच्या सदस्यांची संख्या ७७ झाली. जदयूचेही आता ४५ सदस्य आहेत. डाव्यांचे १६ आमदार आहेत.

जदयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही

जदयूचा कोणीही सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, अशी माहिती जदयू नेते व बिहारचे शिक्षणमंत्री विजयकुमार चौधरी यांनी दिली. याबाबत नितीशकुमार यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे. आरसीपी सिंह यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जदयूकडून कोण सहभागी होणार, याची चर्चा सुरू झाली होती; परंतु शिक्षणमंत्री म्हणाले की, भाजपशी संबंध बिघडल्याचा मुद्दा नाही. २०२४ च्या लोकसभा व २०२५ मधील विधानसभा निवडणुका भाजपबरोबर मिळून लढणार का, असे विचारले असता, ते म्हणाले की, आता आम्ही बरोबर आहोत. 

जदयू, राजदने आमदारांना पाटण्यात बोलावलेजदयू व राजदने आपापल्या आमदारांना तत्काळ पाटण्यात बोलावले आहे. यावरून राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची चर्चा सुरू झाली आहे. हम पक्षानेही आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार व तेजस्वी यादव यांनी फोनवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

तेजस्वी घेणार निर्णयस्वत:बाबत सुरू असलेल्या प्रकरणांच्या  पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनाच निर्णय घ्यायचा आहे की, सरकारमध्ये सहभागी व्हायचे आहे की नाही. जदयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार हे लालूंचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यांना मंत्रिमंडळात सहभागी करू इच्छित नाहीत.

नाराजीचे हे आहे कारणविधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या राष्ट्रीय लोकशक्ती पार्टीने भाजप नव्हे, तर केवळ जदयू उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढली होती. यामुळे जदयूची ताकद मागील निवडणुकीच्या ७१वरून ४३ आमदारांवर आली. त्याचबरोबर भाजपची ताकद ५३ वरून ७४ झाली. चिराग यांनी भाजपच्या सांगण्यावरून हे काम केले, असे नितीशकुमार मानतात. त्यामुळे आता ते भाजपला धडा शिकवू इच्छित आहेत.

बिहार मध्यावधी निवडणुकीकडे?

बिहारमधील सत्तारूढ जदयूमध्ये अंतर्गत धुमशान वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मध्यावधी निवडणुकीकडे जात आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी जदयूला रामराम केल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर प्रखर टीका केली आहे. नितीशकुमार हे सातजन्मात पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. जदयू म्हणजे बुडणारे जहाज आहे, असेही ते म्हणाले. आरसीपी सिंह यांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षात बंडखोरीचा बिगुल वाजू शकतो. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा