शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार; तारीखही ठरली, आमदारांना निर्देश, हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 08:19 IST

जदयू व राजदच्या सर्व आमदारांना सोमवारपर्यंत पाटण्यात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

- शरद गुप्तानवी दिल्ली: बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. जदयूचे माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने हा एक संकेत समजला जात आहे.मुख्यमंत्री नितीशकुमार पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलू शकतात. जदयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार व राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यात नव्या सरकारच्या गठनाबाबत चर्चाही झालेली आहे.

मुख्यमंत्री लवकरच राज्यपालांना पत्र पाठवून भाजपशी असलेले संबंध संपुष्टात आणतील. त्यानंतर राज्यात राजदच्या सहकाऱ्याने सरकारचे स्थापन करण्यात येईल. या सर्व घडामोडी कधीपर्यंत होतील, असे विचारले असता जदयूच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, बिहारमधील श्रावण संपण्यापूर्वी म्हणजे ११ ऑगस्टपूर्वी हे होऊ शकेल. राज्यात भाद्रपद महिन्यात शुभ कार्य केले जात नाहीत. जदयू व राजदच्या सर्व आमदारांना सोमवारपर्यंत पाटण्यात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

मागील काही दिवसांत राजद नेते तेजस्वी यादव व त्यांची बहीण मिसा यांच्या १७ ठिकाणांवर रेल्वे भरती घोटाळ्याबाबत सीबीआयने छापे टाकले होते. राजदचे म्हणणे आहे की, आता यानंतर केंद्र सरकारकडे राजद नेत्यांच्या विरोधात कोणतेही नवीन प्रकरण उरलेले नाही. त्यामुळे आता ईडी, सीबीआय किंवा आयकर खात्याची कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही.

असे आहे समीकरण

मागील विधानसभा निवडणुकीत २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत भाजपने ७४, राजदने ७५ व जदयूने ४३ जागा जिंकल्या होत्या. एक पोटनिवडणूक जिंकल्याने व एआयएमआयएमचे ४ आमदार बरोबर आल्यानंतर राजदच्या सदस्यांची संख्या ८० झाली. त्याचप्रमाणे विकासशील इन्सान पार्टीच्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या पक्षाच्या सदस्यांची संख्या ७७ झाली. जदयूचेही आता ४५ सदस्य आहेत. डाव्यांचे १६ आमदार आहेत.

जदयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही

जदयूचा कोणीही सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, अशी माहिती जदयू नेते व बिहारचे शिक्षणमंत्री विजयकुमार चौधरी यांनी दिली. याबाबत नितीशकुमार यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे. आरसीपी सिंह यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जदयूकडून कोण सहभागी होणार, याची चर्चा सुरू झाली होती; परंतु शिक्षणमंत्री म्हणाले की, भाजपशी संबंध बिघडल्याचा मुद्दा नाही. २०२४ च्या लोकसभा व २०२५ मधील विधानसभा निवडणुका भाजपबरोबर मिळून लढणार का, असे विचारले असता, ते म्हणाले की, आता आम्ही बरोबर आहोत. 

जदयू, राजदने आमदारांना पाटण्यात बोलावलेजदयू व राजदने आपापल्या आमदारांना तत्काळ पाटण्यात बोलावले आहे. यावरून राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची चर्चा सुरू झाली आहे. हम पक्षानेही आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार व तेजस्वी यादव यांनी फोनवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

तेजस्वी घेणार निर्णयस्वत:बाबत सुरू असलेल्या प्रकरणांच्या  पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनाच निर्णय घ्यायचा आहे की, सरकारमध्ये सहभागी व्हायचे आहे की नाही. जदयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार हे लालूंचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यांना मंत्रिमंडळात सहभागी करू इच्छित नाहीत.

नाराजीचे हे आहे कारणविधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या राष्ट्रीय लोकशक्ती पार्टीने भाजप नव्हे, तर केवळ जदयू उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढली होती. यामुळे जदयूची ताकद मागील निवडणुकीच्या ७१वरून ४३ आमदारांवर आली. त्याचबरोबर भाजपची ताकद ५३ वरून ७४ झाली. चिराग यांनी भाजपच्या सांगण्यावरून हे काम केले, असे नितीशकुमार मानतात. त्यामुळे आता ते भाजपला धडा शिकवू इच्छित आहेत.

बिहार मध्यावधी निवडणुकीकडे?

बिहारमधील सत्तारूढ जदयूमध्ये अंतर्गत धुमशान वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मध्यावधी निवडणुकीकडे जात आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी जदयूला रामराम केल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर प्रखर टीका केली आहे. नितीशकुमार हे सातजन्मात पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. जदयू म्हणजे बुडणारे जहाज आहे, असेही ते म्हणाले. आरसीपी सिंह यांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षात बंडखोरीचा बिगुल वाजू शकतो. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा