शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातच कैद, दिल्ली पोलिसांवर आपचा गंभीर आरोप 

By महेश गलांडे | Updated: December 8, 2020 11:44 IST

हरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं.

ठळक मुद्देहरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं.

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्याचं आंदोलन सोमवारी सुरू आहे. आज (मंगळवारी) या आंदोलनाचा 12 वा दिवस असून देशभरात बंद पुकारण्यात आला आहे. कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत शेतकरी दिल्लीत आणि दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त करत, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी सकाळी सिंघु सीमेवर दाखल झाले होते. त्यामुळे, आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरातच नरजकैद केलं आहे.

हरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरातच स्थानबद्द केलं आहे. त्यांच्या घरी कोणालाही जाऊ दिलं जात नाही, तसेच त्यांनाही घरातून बाहेर पडू दिलं जात नाही. केजरीवाल यांच्यासमवेत ज्या आमदारांनी सोमवारी बैठक घेतली, त्या आमदारांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे कार्यकर्तेच केजरीवाल यांच्या घराबाहेर नजर ठेऊन बसल्याचे आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटलंय. 

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मदतीने भाजपाने दिल्लीत तिन्ही महापालिकांच्या महापौरांना अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आंदोलनास बसवले आहे. या आंदोलनाच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांना तैनात करण्यात आले असून दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या घराबाहेर बॅरिकेट्स लावले आहेत. एकप्रकारे केजरीवाल यांना घरातच स्थानबद्ध करण्याचं काम भाजपाने दिल्ली पोलिसांच्या मदतीने केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. 

दिल्ली पोलिसांनी फेटाळले आरोप

दरम्यान, दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी अंटो अल्फोस यांनी आम आदमी पक्षाचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच, दिल्ली पोलिसांवर केलेला आरोप बिनबुडाचा असून अरविंद केजरीवाल हे सोमवारी रात्रीही घराबाहेर पडले होते. विशेष म्हणजे ते रात्री 10 वाजता घरी परतले आहेत, असेही अल्फोस यांनी सांगितले.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीPoliceपोलिसBJPभाजपाBharat Bandhभारत बंदFarmerशेतकरी