शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातच कैद, दिल्ली पोलिसांवर आपचा गंभीर आरोप 

By महेश गलांडे | Updated: December 8, 2020 11:44 IST

हरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं.

ठळक मुद्देहरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं.

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्याचं आंदोलन सोमवारी सुरू आहे. आज (मंगळवारी) या आंदोलनाचा 12 वा दिवस असून देशभरात बंद पुकारण्यात आला आहे. कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत शेतकरी दिल्लीत आणि दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त करत, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी सकाळी सिंघु सीमेवर दाखल झाले होते. त्यामुळे, आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरातच नरजकैद केलं आहे.

हरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरातच स्थानबद्द केलं आहे. त्यांच्या घरी कोणालाही जाऊ दिलं जात नाही, तसेच त्यांनाही घरातून बाहेर पडू दिलं जात नाही. केजरीवाल यांच्यासमवेत ज्या आमदारांनी सोमवारी बैठक घेतली, त्या आमदारांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे कार्यकर्तेच केजरीवाल यांच्या घराबाहेर नजर ठेऊन बसल्याचे आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटलंय. 

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मदतीने भाजपाने दिल्लीत तिन्ही महापालिकांच्या महापौरांना अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आंदोलनास बसवले आहे. या आंदोलनाच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांना तैनात करण्यात आले असून दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या घराबाहेर बॅरिकेट्स लावले आहेत. एकप्रकारे केजरीवाल यांना घरातच स्थानबद्ध करण्याचं काम भाजपाने दिल्ली पोलिसांच्या मदतीने केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. 

दिल्ली पोलिसांनी फेटाळले आरोप

दरम्यान, दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी अंटो अल्फोस यांनी आम आदमी पक्षाचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच, दिल्ली पोलिसांवर केलेला आरोप बिनबुडाचा असून अरविंद केजरीवाल हे सोमवारी रात्रीही घराबाहेर पडले होते. विशेष म्हणजे ते रात्री 10 वाजता घरी परतले आहेत, असेही अल्फोस यांनी सांगितले.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीPoliceपोलिसBJPभाजपाBharat Bandhभारत बंदFarmerशेतकरी