शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातच कैद, दिल्ली पोलिसांवर आपचा गंभीर आरोप 

By महेश गलांडे | Updated: December 8, 2020 11:44 IST

हरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं.

ठळक मुद्देहरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं.

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्याचं आंदोलन सोमवारी सुरू आहे. आज (मंगळवारी) या आंदोलनाचा 12 वा दिवस असून देशभरात बंद पुकारण्यात आला आहे. कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत शेतकरी दिल्लीत आणि दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त करत, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी सकाळी सिंघु सीमेवर दाखल झाले होते. त्यामुळे, आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरातच नरजकैद केलं आहे.

हरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरातच स्थानबद्द केलं आहे. त्यांच्या घरी कोणालाही जाऊ दिलं जात नाही, तसेच त्यांनाही घरातून बाहेर पडू दिलं जात नाही. केजरीवाल यांच्यासमवेत ज्या आमदारांनी सोमवारी बैठक घेतली, त्या आमदारांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे कार्यकर्तेच केजरीवाल यांच्या घराबाहेर नजर ठेऊन बसल्याचे आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटलंय. 

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मदतीने भाजपाने दिल्लीत तिन्ही महापालिकांच्या महापौरांना अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आंदोलनास बसवले आहे. या आंदोलनाच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांना तैनात करण्यात आले असून दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या घराबाहेर बॅरिकेट्स लावले आहेत. एकप्रकारे केजरीवाल यांना घरातच स्थानबद्ध करण्याचं काम भाजपाने दिल्ली पोलिसांच्या मदतीने केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. 

दिल्ली पोलिसांनी फेटाळले आरोप

दरम्यान, दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी अंटो अल्फोस यांनी आम आदमी पक्षाचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच, दिल्ली पोलिसांवर केलेला आरोप बिनबुडाचा असून अरविंद केजरीवाल हे सोमवारी रात्रीही घराबाहेर पडले होते. विशेष म्हणजे ते रात्री 10 वाजता घरी परतले आहेत, असेही अल्फोस यांनी सांगितले.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीPoliceपोलिसBJPभाजपाBharat Bandhभारत बंदFarmerशेतकरी