शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सरन्यायाधीश उदय लळीत यांची नवी सिस्टिम मान्य होईना; न्यायमूर्तींनी थेट आदेशातच लिहिले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 12:23 IST

गेल्या आठवड्यापासूनच न्यायमूर्तींमध्ये धुसफूस सुरु झाली. रमणा यांनी बोलून दाखवलेले शल्य.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी खटले वेगाने संपविण्यासाठी दाव्यांच्या लिस्टिंगची नवीन व्यवस्था लागू केली आहे. यावर न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यायाधीशांना यामुळे पुरेसा वेळ मिळत नसल्याची टिप्पणी या न्यायाधीशांनी केली आहे. 

न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि अभय ओका यांच्या बेंचने एका खटल्याच्या आदेशात ही टिप्पणी केली आहे. न्यायाधीशांना खटले पाहण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. याचे खापर त्यांनी नवीन प्रणालीवर फोडले आहे. नागेश चौधरी विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या प्रकरणात या दोन्ही न्यायमूर्तींनी ही विचित्र टिप्पणी केली आहे. तसेच या खटल्याची सुनावणी १५ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले. 

दुपारच्या सत्रात अनेक खटले लिस्ट करण्यात येत आहेत. यामुळे नवीन सूची प्रणालीनुसार आम्हाला विचार करण्यास वेळही मिळत नाहीय. "नवीन सूची प्रणाली सध्याच्या प्रकरणात सुनावणीसाठी निश्चित केलेल्या प्रकरणांचा विचार करण्यासाठी पुरेसा वेळ देत नाही." याचे कारण म्हणजे 'दुपार'च्या सत्रात समोर येणाऱ्या प्रकरणांची संख्या, असे कौल यांनी आपल्य़ा आदेशात अधिकृतपणे म्हटले आहे. ओका यांची ही टिप्पणी लळीत यांना संभ्रमात टाकणारी आहे. लळीत यांच्यापूर्वी जे सरन्यायाधीश होते त्या रमणा यांनी निवृत्तीनंतर वकील आपल्या याचिका लवकर लिस्ट होत नाहीत, अशा तक्रारी केल्या होत्या असे म्हटले होते. माझ्या कार्यकाळात मी याकडे लक्ष देऊ शकलो नाही, याचे शल्य वाटत असल्याचे रमणा यांनी म्हटले होते. यावर विचार करून लळीत यांनी नवीन लिस्टिंग प्रणाली लागू केली होती. मात्र, त्याला जज उघडपणे विरोध करू लागले आहेत. 

गेल्या आठवड्यापासूनच न्यायमूर्तींमध्ये धुसफूस सुरु झाली होती. शुक्रवारी दोन जजनी सुनावणी टाळण्यास विरोध केला. दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी मात्र टाळली होती. फाईल उशिराने मिळाल्याचे कारण देत वेळ मिळाला नसल्याचे ते म्हणाले होते. तर आणखी एका प्रकरणात सुनावणी पुढे ढकलणे शक्य नसल्याचे जजनी म्हटले होते. 

काय आहे नवीन सिस्टीम...नवीन प्रणालीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व 30 न्यायाधीशांसाठी दोन शिफ्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये सोमवार ते शुक्रवार पर्यंत नव नवीन प्रकरणांवर सुनावणीसाठी १५ वेगवेगळी खंडपीठे नियुक्त केली आहेत. या खंडपीठांना दर दिवशी ६० प्रकरणावर सुनावणी घ्यायची आहे. तीन तीन जजच्या या बेंचनी मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी सकाळी साडे दहा ते दुपारी १ वाजेपर्यंतच्या पहिल्या शिफ्टमध्ये जुन्या प्रकरणांवर सुनावणी घेतली होती. दुपारच्या शिफ्टमध्ये दोन जजच्या बेंचना ३० केस देण्यात आल्या, या केसची सुनावणी त्यांना दोन तासांत करायची होती. म्हणजे एका केससाठी सरासरी ४ मिनिटे देण्यात आली. आता सीजेआयनी ही संख्या ३० वरून २० वर आणली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUday Lalitउदय लळीत