शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सरन्यायाधीश उदय लळीत यांची नवी सिस्टिम मान्य होईना; न्यायमूर्तींनी थेट आदेशातच लिहिले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 12:23 IST

गेल्या आठवड्यापासूनच न्यायमूर्तींमध्ये धुसफूस सुरु झाली. रमणा यांनी बोलून दाखवलेले शल्य.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी खटले वेगाने संपविण्यासाठी दाव्यांच्या लिस्टिंगची नवीन व्यवस्था लागू केली आहे. यावर न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यायाधीशांना यामुळे पुरेसा वेळ मिळत नसल्याची टिप्पणी या न्यायाधीशांनी केली आहे. 

न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि अभय ओका यांच्या बेंचने एका खटल्याच्या आदेशात ही टिप्पणी केली आहे. न्यायाधीशांना खटले पाहण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. याचे खापर त्यांनी नवीन प्रणालीवर फोडले आहे. नागेश चौधरी विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या प्रकरणात या दोन्ही न्यायमूर्तींनी ही विचित्र टिप्पणी केली आहे. तसेच या खटल्याची सुनावणी १५ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले. 

दुपारच्या सत्रात अनेक खटले लिस्ट करण्यात येत आहेत. यामुळे नवीन सूची प्रणालीनुसार आम्हाला विचार करण्यास वेळही मिळत नाहीय. "नवीन सूची प्रणाली सध्याच्या प्रकरणात सुनावणीसाठी निश्चित केलेल्या प्रकरणांचा विचार करण्यासाठी पुरेसा वेळ देत नाही." याचे कारण म्हणजे 'दुपार'च्या सत्रात समोर येणाऱ्या प्रकरणांची संख्या, असे कौल यांनी आपल्य़ा आदेशात अधिकृतपणे म्हटले आहे. ओका यांची ही टिप्पणी लळीत यांना संभ्रमात टाकणारी आहे. लळीत यांच्यापूर्वी जे सरन्यायाधीश होते त्या रमणा यांनी निवृत्तीनंतर वकील आपल्या याचिका लवकर लिस्ट होत नाहीत, अशा तक्रारी केल्या होत्या असे म्हटले होते. माझ्या कार्यकाळात मी याकडे लक्ष देऊ शकलो नाही, याचे शल्य वाटत असल्याचे रमणा यांनी म्हटले होते. यावर विचार करून लळीत यांनी नवीन लिस्टिंग प्रणाली लागू केली होती. मात्र, त्याला जज उघडपणे विरोध करू लागले आहेत. 

गेल्या आठवड्यापासूनच न्यायमूर्तींमध्ये धुसफूस सुरु झाली होती. शुक्रवारी दोन जजनी सुनावणी टाळण्यास विरोध केला. दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी मात्र टाळली होती. फाईल उशिराने मिळाल्याचे कारण देत वेळ मिळाला नसल्याचे ते म्हणाले होते. तर आणखी एका प्रकरणात सुनावणी पुढे ढकलणे शक्य नसल्याचे जजनी म्हटले होते. 

काय आहे नवीन सिस्टीम...नवीन प्रणालीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व 30 न्यायाधीशांसाठी दोन शिफ्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये सोमवार ते शुक्रवार पर्यंत नव नवीन प्रकरणांवर सुनावणीसाठी १५ वेगवेगळी खंडपीठे नियुक्त केली आहेत. या खंडपीठांना दर दिवशी ६० प्रकरणावर सुनावणी घ्यायची आहे. तीन तीन जजच्या या बेंचनी मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी सकाळी साडे दहा ते दुपारी १ वाजेपर्यंतच्या पहिल्या शिफ्टमध्ये जुन्या प्रकरणांवर सुनावणी घेतली होती. दुपारच्या शिफ्टमध्ये दोन जजच्या बेंचना ३० केस देण्यात आल्या, या केसची सुनावणी त्यांना दोन तासांत करायची होती. म्हणजे एका केससाठी सरासरी ४ मिनिटे देण्यात आली. आता सीजेआयनी ही संख्या ३० वरून २० वर आणली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUday Lalitउदय लळीत