शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीशपदी, शपथविधी हाेताच न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे राष्ट्रध्वजाला वंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 06:18 IST

राष्ट्रपती भवनातील समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांना शपथ दिली. त्यांनी इंग्रजीत देवाच्या नावाने शपथ घेतली.

नवी दिल्ली :

अयोध्या जमीन विवाद प्रकरणासह अनेक ऐतिहासिक निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा भाग असलेले न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी बुधवारी भारताचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांना शपथ दिली. त्यांनी इंग्रजीत देवाच्या नावाने शपथ घेतली.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्याकडून सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.  न्यायमूर्ती  चंद्रचूड वयाच्या ६५ वर्षापर्यंत अर्थात १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत या पदावर असतील. पदग्रहण समारंभात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, किरेन रिजिजू व मावळते सरन्यायाधीश लळित उपस्थित होते. ११ ऑक्टोबर रोजी लळित यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली. १७ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड यांची ५०वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. १३ मे २०१६ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली होती. 

माझ्यासाठी मोठी संधी आणि जबाबदारीही सामान्य लोकांची सेवा करणे यालाच माझे प्राधान्य आहे. मी देशातील सर्व नागरिकांसाठी काम करीन, मग ते तंत्रज्ञानातील असो किंवा नोंदणी क्षेत्रातील; मी प्रत्येक बाबतीत नागरिकांची काळजी घेईन. न्यायपालिकेचे नेतृत्व करणे, ही एक मोठी संधी आणि जबाबदारी आहे. मी केवळ शब्दांतून नव्हे तर माझ्या कामातून नागरिकांचा विश्वास संपादन करीन.     - धनंजय यशवंत चंद्रचूड,     सरन्यायाधीश

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय