शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सरन्यायाधीशांनी लिहिलं पंतप्रधानांना पत्र; न्यायाधीशांचे निवृत्ती वय वाढविण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 10:27 IST

आता सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या कमी प्रमाणात असल्याने संविधानिक प्रकरणात सुनावणीसाठी 5 न्यायाधीशांची आणखी एक खंडपीठ बनवलं जावं.

नवी दिल्ली - देशातील न्यायालयांमधील खटले दिवसेंदिवस वाढत चालले असून त्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात रंजन गोगोई यांनी न्यायालयातील खटल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. वर्षोनुवर्षे न्यायालयात खटले प्रलंबित राहतात. या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढविणे गरजेचे आहे असं पत्रात लिहिलं आहे. 

रंजन गोगोई यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे की, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय 62 आहे. खटल्यांची वाढती संख्या लक्षात घेता उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय 65 करावे. न्यायाधीशांचे निवृत्ती वय आणि न्यायाधीशांची संख्या वाढविण्याबाबत रंजन गोगोई यांनी पंतप्रधानांना सल्ला दिला आहे. या दोन्ही मागण्यांसाठी सरकारला संविधानात संशोधन करावं लागणार आहे.    

तसेच आता सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या कमी प्रमाणात असल्याने सैविधानिक प्रकरणात सुनावणीसाठी 5 न्यायाधीशांची अनेक खंडपीठ बनवलं जावं. सध्या सुप्रीम कोर्टात 31 न्यायाधीश संख्या आहे. तर सरकारी आकडेवारीनुसार उच्च न्यायालयात जवळपास 44 लाख आणि सुप्रीम कोर्टात 58 हजार 700 खटले प्रलंबित आहेत.

प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची निर्धारित कार्यकाळासाठी नियुक्ती करण्याची व्यवस्था केली जाऊ शकते असंही रंजन गोगोई यांनी सुचवलं आहे. तर सुप्रीम कोर्टाचा सध्याचा रेकॉर्ड आहे की, 26 खटले 25 वर्षाहून अधिक, 100 खटले 20 वर्षाहून अधिक, 600 खटले 15 वर्षाहून अधिक आणि 4 हजार 980 खटले मागील दहा वर्षापासून प्रलंबित आहेत असं सांगण्यात आलं आहे.  

सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून न्या. बी. आर गवई, न्या. सूर्यकांत, न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. ए.एस बोपन्ना यांनी शपथ घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टातील न्यायधीशांचे संख्याबळ पूर्ण झालं आहे. सुप्रीम कोर्टात 31 न्यायाधीश जागा पूर्ण झाल्याने आता कोणतीही जागा शिल्लक नाही. 2008 नंतर पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या मंजूर पदाच्या बरोबरीने झाली होती. 2008 मध्ये न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 26 वरुन वाढवून 31 पर्यंत करण्यात आली होती. त्यामुळे आता ही संख्या 31 वरुन 37 न्यायाधीश करावी अशी मागणी मुख्य सरन्यायाधीशांनी पत्रात केली आहे. 

टॅग्स :Ranjan Gogoiरंजन गोगोईNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय