शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

मुख्य सरन्यायाधीशांनी लिहिलं पंतप्रधानांना पत्र; न्यायाधीशांचे निवृत्ती वय वाढविण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 10:27 IST

आता सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या कमी प्रमाणात असल्याने संविधानिक प्रकरणात सुनावणीसाठी 5 न्यायाधीशांची आणखी एक खंडपीठ बनवलं जावं.

नवी दिल्ली - देशातील न्यायालयांमधील खटले दिवसेंदिवस वाढत चालले असून त्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात रंजन गोगोई यांनी न्यायालयातील खटल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. वर्षोनुवर्षे न्यायालयात खटले प्रलंबित राहतात. या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढविणे गरजेचे आहे असं पत्रात लिहिलं आहे. 

रंजन गोगोई यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे की, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय 62 आहे. खटल्यांची वाढती संख्या लक्षात घेता उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय 65 करावे. न्यायाधीशांचे निवृत्ती वय आणि न्यायाधीशांची संख्या वाढविण्याबाबत रंजन गोगोई यांनी पंतप्रधानांना सल्ला दिला आहे. या दोन्ही मागण्यांसाठी सरकारला संविधानात संशोधन करावं लागणार आहे.    

तसेच आता सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या कमी प्रमाणात असल्याने सैविधानिक प्रकरणात सुनावणीसाठी 5 न्यायाधीशांची अनेक खंडपीठ बनवलं जावं. सध्या सुप्रीम कोर्टात 31 न्यायाधीश संख्या आहे. तर सरकारी आकडेवारीनुसार उच्च न्यायालयात जवळपास 44 लाख आणि सुप्रीम कोर्टात 58 हजार 700 खटले प्रलंबित आहेत.

प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची निर्धारित कार्यकाळासाठी नियुक्ती करण्याची व्यवस्था केली जाऊ शकते असंही रंजन गोगोई यांनी सुचवलं आहे. तर सुप्रीम कोर्टाचा सध्याचा रेकॉर्ड आहे की, 26 खटले 25 वर्षाहून अधिक, 100 खटले 20 वर्षाहून अधिक, 600 खटले 15 वर्षाहून अधिक आणि 4 हजार 980 खटले मागील दहा वर्षापासून प्रलंबित आहेत असं सांगण्यात आलं आहे.  

सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून न्या. बी. आर गवई, न्या. सूर्यकांत, न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. ए.एस बोपन्ना यांनी शपथ घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टातील न्यायधीशांचे संख्याबळ पूर्ण झालं आहे. सुप्रीम कोर्टात 31 न्यायाधीश जागा पूर्ण झाल्याने आता कोणतीही जागा शिल्लक नाही. 2008 नंतर पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या मंजूर पदाच्या बरोबरीने झाली होती. 2008 मध्ये न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 26 वरुन वाढवून 31 पर्यंत करण्यात आली होती. त्यामुळे आता ही संख्या 31 वरुन 37 न्यायाधीश करावी अशी मागणी मुख्य सरन्यायाधीशांनी पत्रात केली आहे. 

टॅग्स :Ranjan Gogoiरंजन गोगोईNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय