शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

पराभवानंतर राजकीय पक्षांकडून EVM ला बळीचा बकरा बनवलं जातंय - मुख्य निवडणूक आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 11:42 IST

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या निवडणुकीत मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या इव्हीएम मशीनबाबत गेल्या काही काळापासून सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्तांनी...

नवी दिल्ली -  लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या निवडणुकीत मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या इव्हीएम मशीनबाबत गेल्या काही काळापासून सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणुकीत पराभूत होणारे पक्ष  आणि उमेदवार इव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप सर्रास करतात.  त्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी राजकीय पक्षांकडून पराभवानंतर इव्हीएमला बळीचा बकरा बनवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. आगामी निवडणुकांमध्ये मतपत्रिका वापरण्याची शक्यता फेटाळून लावताना रावत म्हणाले. पराभव सहन करू न शकणाऱ्या राजकीय पक्षांना पराभवाचे खापर फोडण्यासाठी कुणाची तरी गरज असते. अशाच राजकीय पक्षांकडून इव्हीएमला बळीचा बकरा बनवले जात आहे.  कुणावर तरी पराभवाचे खापर फोडत असतात.इव्हीएममधील गडबडीबाबत विचारले असता रावत म्हणाले, " जेव्हा जेव्हा असे आरोप करण्यात आले तेव्हा प्रत्येक वेळी निवडणूक आयोगाने आपले मत मांडले आहे. आगामी काळात सर्व निवडणुका इव्हीएमने होतील आणि सर्व इव्हीएमला  व्हीव्हीपँटची सुविधा असेल, त्यामुळे आपण आपण दिलेले मत योग्य उमेदवाराला मिळाले आहे की नाही हे मतदाराला समजू शकेल,  असा निर्णय गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला होता." मात्र लोकसभा निवडणूक लवकर घेण्याविषयी सरकारकडून कोणत्याही प्रकारचे संकेत मिळाले नसल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.  नियमानुसार निवडणूक आयोग कुठल्याही सभागृहाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी सहा महिने आधीच निवडणुकीची अधिसूचना  काढू शकतो. ही निवडणूक आयोगावर असलेली कायदेशीर मर्यादा आहे. त्याचा पलिकडे जाऊन आम्ही काम करू शकत नाही." " 2015 साली केंद्र सरकाने राज्य आणि केंद्राची निवडणूक एकत्र घेण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यासाठी घटनेमध्ये बदल आणि कायद्यांमध्ये काही फेरबदल करण्याची गरज आहे. त्यामुळे यासंदर्भात आम्ही सरकारला काही सल्ले दिले होते. पण त्यानंतर आम्हाला अधिक माहिती मिळालेली नाही." असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी पुढे सांगितले.  

टॅग्स :ElectionनिवडणूकIndiaभारतPoliticsराजकारण