शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:26 IST

Rahul Gandhi PC: २०१८ च्या निवडणुकीत १० पैकी ८ बूथवर काँग्रेस पुढे होती. त्या ८ बुथवरील ६ हजार नावे डिलिट करण्यात आली असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. 

नवी दिल्ली - आज हायड्रोजन बॉम्ब नाही, तो लवकरच येणार आहे. हे आणखी एक मतचोरीचं उदाहरण आहे. पुराव्यासह मतदार यादीतून कशारितीने नावे काढली गेली हे सांगत आहोत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मतचोरांचे संरक्षण करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत आमच्याकडे मतदार वगळले जात आहेत असा रिपोर्ट येत होता. काँग्रेसचे, विरोधकांचे मतदार यादीतून काढले जात होते. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक मतदार यादीतून काढले जातात. जी नावे यादीतून वगळली जातात ती विरोधकांची असतात असा आरोप करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. 

राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...

राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, कर्नाटकात आळंद मतदारसंघात ही मतचोरी योगायोगाने पकडली गेली. त्याठिकाणचे BLO होते त्यांच्या नातेवाईकाचे नाव मतदार यादीतून काढले होते. माझ्या नातेवाईकाचं नाव मतदार यादीतून कुणी वगळले याचा तपास बीएलओने केला, तेव्हा शेजाऱ्याने हे नाव डिलिट केले असं समजले. त्यानंतर BLO ने जाऊन शेजाऱ्याला विचारले. त्याने मला काही माहिती नाही असं सांगितले. त्यानंतर संशय बळावला. त्यानंतर तपासाची प्रक्रिया सुरू केली. त्यात कुणी ना कुणी आळंदमधून मतदार यादीतून नियोजितपणे ही नावे काढत होते. ६ हजार मते यादीतून काढली, हा आकडा जास्तही असू शकतो परंतु ६ हजार नावे पकडली गेली आणि त्यावर तपास सुरू झाला असं त्यांनी सांगितले.

या तपासात ऑटोमॅटिकली मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी अर्ज दिले जात होते. मोबाईल नंबर कर्नाटकऐवजी दुसऱ्या राज्यांतील वापरले गेले. दुसऱ्या राज्यात बसून कर्नाटकतील मतदार यादीतून वगळली. टार्गेट करून काँग्रेस मतदारांची नावे काढली गेली. गोदाबाई यांच्या नावाने १२ मतदार यादीतून काढले गेले. त्यांना कल्पनाही नाही. यासाठी वापरलेले नंबर वेगवेगळ्या राज्यातील आहेत. या नंबरवर फोन केल्यानंतर रिप्लाय येत नाही. मग हे नंबर कुणाचे आहेत, कुणी चालवले, आयपी एड्रेस कोणता होता, ओटीपी जनरेट झाला, कुठे गेला हा प्रश्न कायम आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं. 

त्याशिवाय सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने १४ मिनिटांत १२ नावे मतदार यादीतून वगळले. या सूर्यकांत यांना आम्ही विचारले असता, त्यांनी मी हे केलेच नाही. मी या लोकांना ओळखत नाही असं सांगितले. बबिता चौधरी यांचं नाव मतदार यादीतून काढले गेले. सूर्यकांत आणि बबिता यांना राहुल गांधी यांनी स्टेजवर बोलवले. काही नावे पहाटे ४ वाजता अर्ज करून डिलिट केले. निवडणूक आयोग झोपलंय का असा प्रश्न होता, पण नाही ते झोपले नव्हते. जे कुणी नावे डिलिट करत आहे त्यांचे मतदार यादीत क्रमांक नंबर वनला आहे. २०१८ च्या निवडणुकीत १० पैकी ८ बूथवर काँग्रेस पुढे होती. त्या ८ बुथवरील ६ हजार नावे डिलिट करण्यात आली असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. 

CID च्या १८ पत्राला एकदाही प्रतिसाद नाही

ज्ञानेश कुमार हे मतचोरांचे रक्षण करत आहे. मी जे काही बोलत आहे, ते पुराव्यासह बोलत आहे. कर्नाटक सीआयडीने गुन्हा दाखल केला. हे मतदार कोण आहेत, आयपी एड्रेस काय आहे, ओटीपी कुठे गेला याचा तपास सुरू होतो. कर्नाटक सीआयडीने केंद्रीय निवडणूक आयोगाला १८ पत्रे दिली. आम्हाला ही माहिती द्या. मोबाईल नंबर द्या, त्यांचे लोकेशन सांगा पण १८ पत्राला एकही उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले नाही असंही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग