शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:26 IST

Rahul Gandhi PC: २०१८ च्या निवडणुकीत १० पैकी ८ बूथवर काँग्रेस पुढे होती. त्या ८ बुथवरील ६ हजार नावे डिलिट करण्यात आली असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. 

नवी दिल्ली - आज हायड्रोजन बॉम्ब नाही, तो लवकरच येणार आहे. हे आणखी एक मतचोरीचं उदाहरण आहे. पुराव्यासह मतदार यादीतून कशारितीने नावे काढली गेली हे सांगत आहोत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मतचोरांचे संरक्षण करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत आमच्याकडे मतदार वगळले जात आहेत असा रिपोर्ट येत होता. काँग्रेसचे, विरोधकांचे मतदार यादीतून काढले जात होते. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक मतदार यादीतून काढले जातात. जी नावे यादीतून वगळली जातात ती विरोधकांची असतात असा आरोप करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. 

राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...

राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, कर्नाटकात आळंद मतदारसंघात ही मतचोरी योगायोगाने पकडली गेली. त्याठिकाणचे BLO होते त्यांच्या नातेवाईकाचे नाव मतदार यादीतून काढले होते. माझ्या नातेवाईकाचं नाव मतदार यादीतून कुणी वगळले याचा तपास बीएलओने केला, तेव्हा शेजाऱ्याने हे नाव डिलिट केले असं समजले. त्यानंतर BLO ने जाऊन शेजाऱ्याला विचारले. त्याने मला काही माहिती नाही असं सांगितले. त्यानंतर संशय बळावला. त्यानंतर तपासाची प्रक्रिया सुरू केली. त्यात कुणी ना कुणी आळंदमधून मतदार यादीतून नियोजितपणे ही नावे काढत होते. ६ हजार मते यादीतून काढली, हा आकडा जास्तही असू शकतो परंतु ६ हजार नावे पकडली गेली आणि त्यावर तपास सुरू झाला असं त्यांनी सांगितले.

या तपासात ऑटोमॅटिकली मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी अर्ज दिले जात होते. मोबाईल नंबर कर्नाटकऐवजी दुसऱ्या राज्यांतील वापरले गेले. दुसऱ्या राज्यात बसून कर्नाटकतील मतदार यादीतून वगळली. टार्गेट करून काँग्रेस मतदारांची नावे काढली गेली. गोदाबाई यांच्या नावाने १२ मतदार यादीतून काढले गेले. त्यांना कल्पनाही नाही. यासाठी वापरलेले नंबर वेगवेगळ्या राज्यातील आहेत. या नंबरवर फोन केल्यानंतर रिप्लाय येत नाही. मग हे नंबर कुणाचे आहेत, कुणी चालवले, आयपी एड्रेस कोणता होता, ओटीपी जनरेट झाला, कुठे गेला हा प्रश्न कायम आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं. 

त्याशिवाय सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने १४ मिनिटांत १२ नावे मतदार यादीतून वगळले. या सूर्यकांत यांना आम्ही विचारले असता, त्यांनी मी हे केलेच नाही. मी या लोकांना ओळखत नाही असं सांगितले. बबिता चौधरी यांचं नाव मतदार यादीतून काढले गेले. सूर्यकांत आणि बबिता यांना राहुल गांधी यांनी स्टेजवर बोलवले. काही नावे पहाटे ४ वाजता अर्ज करून डिलिट केले. निवडणूक आयोग झोपलंय का असा प्रश्न होता, पण नाही ते झोपले नव्हते. जे कुणी नावे डिलिट करत आहे त्यांचे मतदार यादीत क्रमांक नंबर वनला आहे. २०१८ च्या निवडणुकीत १० पैकी ८ बूथवर काँग्रेस पुढे होती. त्या ८ बुथवरील ६ हजार नावे डिलिट करण्यात आली असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. 

CID च्या १८ पत्राला एकदाही प्रतिसाद नाही

ज्ञानेश कुमार हे मतचोरांचे रक्षण करत आहे. मी जे काही बोलत आहे, ते पुराव्यासह बोलत आहे. कर्नाटक सीआयडीने गुन्हा दाखल केला. हे मतदार कोण आहेत, आयपी एड्रेस काय आहे, ओटीपी कुठे गेला याचा तपास सुरू होतो. कर्नाटक सीआयडीने केंद्रीय निवडणूक आयोगाला १८ पत्रे दिली. आम्हाला ही माहिती द्या. मोबाईल नंबर द्या, त्यांचे लोकेशन सांगा पण १८ पत्राला एकही उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले नाही असंही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग