शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:26 IST

Rahul Gandhi PC: २०१८ च्या निवडणुकीत १० पैकी ८ बूथवर काँग्रेस पुढे होती. त्या ८ बुथवरील ६ हजार नावे डिलिट करण्यात आली असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. 

नवी दिल्ली - आज हायड्रोजन बॉम्ब नाही, तो लवकरच येणार आहे. हे आणखी एक मतचोरीचं उदाहरण आहे. पुराव्यासह मतदार यादीतून कशारितीने नावे काढली गेली हे सांगत आहोत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मतचोरांचे संरक्षण करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत आमच्याकडे मतदार वगळले जात आहेत असा रिपोर्ट येत होता. काँग्रेसचे, विरोधकांचे मतदार यादीतून काढले जात होते. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक मतदार यादीतून काढले जातात. जी नावे यादीतून वगळली जातात ती विरोधकांची असतात असा आरोप करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. 

राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...

राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, कर्नाटकात आळंद मतदारसंघात ही मतचोरी योगायोगाने पकडली गेली. त्याठिकाणचे BLO होते त्यांच्या नातेवाईकाचे नाव मतदार यादीतून काढले होते. माझ्या नातेवाईकाचं नाव मतदार यादीतून कुणी वगळले याचा तपास बीएलओने केला, तेव्हा शेजाऱ्याने हे नाव डिलिट केले असं समजले. त्यानंतर BLO ने जाऊन शेजाऱ्याला विचारले. त्याने मला काही माहिती नाही असं सांगितले. त्यानंतर संशय बळावला. त्यानंतर तपासाची प्रक्रिया सुरू केली. त्यात कुणी ना कुणी आळंदमधून मतदार यादीतून नियोजितपणे ही नावे काढत होते. ६ हजार मते यादीतून काढली, हा आकडा जास्तही असू शकतो परंतु ६ हजार नावे पकडली गेली आणि त्यावर तपास सुरू झाला असं त्यांनी सांगितले.

या तपासात ऑटोमॅटिकली मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी अर्ज दिले जात होते. मोबाईल नंबर कर्नाटकऐवजी दुसऱ्या राज्यांतील वापरले गेले. दुसऱ्या राज्यात बसून कर्नाटकतील मतदार यादीतून वगळली. टार्गेट करून काँग्रेस मतदारांची नावे काढली गेली. गोदाबाई यांच्या नावाने १२ मतदार यादीतून काढले गेले. त्यांना कल्पनाही नाही. यासाठी वापरलेले नंबर वेगवेगळ्या राज्यातील आहेत. या नंबरवर फोन केल्यानंतर रिप्लाय येत नाही. मग हे नंबर कुणाचे आहेत, कुणी चालवले, आयपी एड्रेस कोणता होता, ओटीपी जनरेट झाला, कुठे गेला हा प्रश्न कायम आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं. 

त्याशिवाय सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने १४ मिनिटांत १२ नावे मतदार यादीतून वगळले. या सूर्यकांत यांना आम्ही विचारले असता, त्यांनी मी हे केलेच नाही. मी या लोकांना ओळखत नाही असं सांगितले. बबिता चौधरी यांचं नाव मतदार यादीतून काढले गेले. सूर्यकांत आणि बबिता यांना राहुल गांधी यांनी स्टेजवर बोलवले. काही नावे पहाटे ४ वाजता अर्ज करून डिलिट केले. निवडणूक आयोग झोपलंय का असा प्रश्न होता, पण नाही ते झोपले नव्हते. जे कुणी नावे डिलिट करत आहे त्यांचे मतदार यादीत क्रमांक नंबर वनला आहे. २०१८ च्या निवडणुकीत १० पैकी ८ बूथवर काँग्रेस पुढे होती. त्या ८ बुथवरील ६ हजार नावे डिलिट करण्यात आली असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. 

CID च्या १८ पत्राला एकदाही प्रतिसाद नाही

ज्ञानेश कुमार हे मतचोरांचे रक्षण करत आहे. मी जे काही बोलत आहे, ते पुराव्यासह बोलत आहे. कर्नाटक सीआयडीने गुन्हा दाखल केला. हे मतदार कोण आहेत, आयपी एड्रेस काय आहे, ओटीपी कुठे गेला याचा तपास सुरू होतो. कर्नाटक सीआयडीने केंद्रीय निवडणूक आयोगाला १८ पत्रे दिली. आम्हाला ही माहिती द्या. मोबाईल नंबर द्या, त्यांचे लोकेशन सांगा पण १८ पत्राला एकही उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले नाही असंही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग