खून खटल्याचा अवघ्या १५ मिनिटात निकाल प्रमुख जिल्हा न्यायाधीश : सहा जण निदार्ेष

By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30

सोलापूर : ८ जानेवारी २०१४ रोजी घडलेल्या घटनेत अजय रामसिंग काटेवाले (वय २५, रा. सतनाम चौक, सोलापूर) याचा खून झाला. गुरुवारी खटल्याची सुनावणी सुरू झाली. त्याचवेळी चार नेत्रसाक्षीदारांची झालेली साक्ष आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्रा‘ धरून प्रमुख जिल्हा न्यायाधीश अश्विनीकुमार देवरे यांनी सहा आरोपींची निदार्ेष मुक्तता केली. केवळ १५ मिनिटांमध्ये खटल्याचा निकाल लागला.

The Chief District Judge: Six persons, in just 15 minutes of murder case | खून खटल्याचा अवघ्या १५ मिनिटात निकाल प्रमुख जिल्हा न्यायाधीश : सहा जण निदार्ेष

खून खटल्याचा अवघ्या १५ मिनिटात निकाल प्रमुख जिल्हा न्यायाधीश : सहा जण निदार्ेष

लापूर : ८ जानेवारी २०१४ रोजी घडलेल्या घटनेत अजय रामसिंग काटेवाले (वय २५, रा. सतनाम चौक, सोलापूर) याचा खून झाला. गुरुवारी खटल्याची सुनावणी सुरू झाली. त्याचवेळी चार नेत्रसाक्षीदारांची झालेली साक्ष आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्रा‘ धरून प्रमुख जिल्हा न्यायाधीश अश्विनीकुमार देवरे यांनी सहा आरोपींची निदार्ेष मुक्तता केली. केवळ १५ मिनिटांमध्ये खटल्याचा निकाल लागला.
विष्णू चंद्रकांत सगर, राजेंद्र चंद्रकांत सगर, पांडुरंग चंद्रकांत सगर, राम सूर्यकांत सगर यांच्यासह अन्य दोन महिला असे सहा जण निदार्ेष सुटलेल्या आरोपींची नावे आहेत. ८ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता मयत अजय आणि राहुल रजपूत हे दोेघे मोटरसायकलवरून येताना विष्णू सगर याच्या मोटरसायकलला त्यांचा धक्का बसला. त्यावेळी आरोपींनी केलेल्या मारहाणीत अजय काटेवाले याचा मृत्यू झाला. सदर बझार पोलीस ठाण्याचे फौजदार जी. एन. कदम यांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. रितेश थोबडे, ॲड. विनोद सूर्यवंशी, ॲड. दत्ता गुंड, ॲड. रेवण पाटील तर सरकारतर्फे ॲड. आनंद गोरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: The Chief District Judge: Six persons, in just 15 minutes of murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.