शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

छत्तीसगडच्या तरुणी एकदम ‘टनाटन’, भाजपा खासदाराचं बेताल वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 12:44 IST

एका कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात बोलताना बन्सीलाल महतो यांनी छत्तीसगडच्या तरुणी एकदम ‘टनाटन’ होऊ लागल्या आहेत असं वक्तव्य केलं

रायपूर - छत्तीसगडच्या तरुणी एकदम ‘टनाटन’ होऊ लागल्या आहेत...हे वक्तव्य दुसरं तिसरं कोणी नाही तर भारतीय जनता पक्षाच्या खासदाराने केलं आहे.  छत्तीसगडमधील कोरबा लोकसभा मतदारसंघातील खासदार बन्सीलाल महतो यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सोमवारी एका कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात बोलताना बन्सीलाल महतो यांनी छत्तीसगडच्या तरुणी एकदम ‘टनाटन’ होऊ लागल्या आहेत असं वक्तव्य केलं. बन्सीलाल महतो यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेत सार्वजनिकपणे माफी मागावी अशी मागणी केली आहे.  

गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बन्सीलाल महतो यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना 77 वर्षीय बन्सीलाल महतो बोलले आहेत की, 'राज्य क्रिडामंत्री भैय्यालाल रजवाडे मला नेहमी सांगत असतात की, आता मुंबई आणि कोलकातामधील तरुणींची गरज राहिलेली नाही. कोरबा आणि छत्तीसगडमधील तरुणी एकदम टनाटन होऊ लागल्या आहेत'. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भैय्यालाल रजवाडे यांना जेव्हा पत्रकारांनी तुम्ही असं कधी बोलला होतात का विचारलं असता, त्यांनी यामधून पुर्णपणे अंग काढून घेतलं. 

भैय्यालाल रजवाडे यांनी सांगितलं की, 'खासदार साहेबांनी माझं एक वाक्य उचललं आणि वेगळा संदर्भ लावत सर्वांसमोर मांडलं'. भैय्यालाल रजवाडे यांच्या प्रवक्त्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, 'मंत्रीसाहेब एकदा बोलले होते की मुंबई आणि दिल्लीच्या कलाकारांना आणण्याची काही गरज नाही. कारण छत्तीसगडमधील तरुणींमध्येही तितकीच प्रतिभा आहे'. प्रवक्त्याने सांगितल्यानुसार, बन्सीलाल महतो यांच्या वक्तव्याशी भैय्यालाल रजवाडे यांचा काहीही संबंध नाही. 

बन्सीलाल महतो यांच्या वक्तव्यानंतर, विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडलं असून त्यांनी टिकेला सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचा मुलगा अजित जोगीदेखील कार्यक्रमाला उपस्थित होता. बन्सीलाल महतो यांचं वक्तव्य दुर्देवी असल्याचं ते बोलले आहेत. 'एका खासदाराला असं वक्तव्य करणं शोभत नाही. यावरुन भाजपाला महिलांप्रती असलेला दृष्टीकोन समोर येतो', असं अजित जोगी बोलले आहेत. 

 

टॅग्स :BJPभाजपा