शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

चेन्नईत पाणीटंचाईचा आयटी कंपन्यांना फटका; कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 13:02 IST

मागील अनेक दिवसांपासून चेन्नईमध्ये पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागत आहे. यंदाही समाधानकारक पाऊस झाला नाही तर चेन्नईवर पाणीटंचाईचं संकट उभं राहणार आहे

 चेन्नई - पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने चेन्नई येथील आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑफिसमध्ये पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांनी ऑफिसला न येता त्यांना शक्य होईल अशा ठिकाणाहून काम करावं असं सांगण्यात आलं आहे. 

सध्या चेन्नई शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे. अनेक भागात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पैसे देऊनही पाणी मिळेल याची खात्री नाही. चेन्नई शहराची लोकसंख्या कोट्यावधीच्या घरात आहे. मागील अनेक दिवसांपासून चेन्नईमध्ये पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागत आहे. यंदाही समाधानकारक पाऊस झाला नाही तर चेन्नईवर पाणीटंचाईचं संकट उभं राहणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 12 कंपन्यातील 5 हजार कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. चार वर्षापूर्वी खाजगी टँकरने संप पुकारला होता त्यावेळी आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले होते. चेन्नईच्या ओएमआरमध्ये अनेक आयटी कंपन्या आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग काम करतात. त्यामुळे पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. जवळपास 55 टक्के पाण्याचा वापर आयटी कंपन्यातील कर्मचारी वर्ग करतात. साधारणपणे 3 कोटी लीटर पाणी खर्च केले जाते.   

चेन्नईला मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र पावसाचे पाणी साठवण्याबाबत राज्य सरकार उदासीन आहे. चेन्नईत उपलब्ध असलेल्या स्त्रोतांपेक्षा शेकडो पटींनी लोकसंख्या वाढली. इमारती उभ्या राहिला. आयटी कंपन्या आल्या. चेन्नईची भौगोलिक अवस्था पाहिली तर साऊथ वेस्ट मान्सून आणि नॉर्थ ईस्ट मान्सून अशा दोन मोसमात पाऊस पडतो.  पण गेल्यावर्षी पावसाने चेन्नई आणि एकूणच तामिळनाडूला दगा दिला. एप्रिल-मे महिन्यात परिस्थिती इतकी कठीण झाली की टँकरशिवाय पर्याय उरला नाही.

पाणी जपून वापरण्यासाठी अनेक संदेश आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिले जातात. पाण्याची जितकी गरज असेल तितकाच उपयोग करावा. आयटी कंपन्यांना पाण्याचे पुरवठा करणारे टॅँकरही उपलब्ध होताना अडचण होत आहे त्यामुळे पाणीटंचाईचा फटका चेन्नईमधील अनेक कंपन्यांना बसला आहे.  

टॅग्स :Chennaiचेन्नईwater scarcityपाणी टंचाई