शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बापरे! 535 कोटींची कॅश घेऊन जाणारा ट्रक रस्त्यातच बंद पडला; लोकांची मोठी गर्दी अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 09:37 IST

535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारे वाहन विल्लुपुरमच्या दिशेने जाताना खराब झाल्याने बंद पडले होते. यासाठी पोलीस संरक्षण आवश्यक आहे.

चेन्नईमध्ये 535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारा ट्रक रस्त्यात खराब झाला. बुधवारी या प्रकरणाची माहिती क्रोमपेट पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना मिळालेल्या कॉलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की 535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारे वाहन विल्लुपुरमच्या दिशेने जाताना खराब झाल्याने बंद पडले होते. यासाठी पोलीस संरक्षण आवश्यक आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच क्रोमपेट पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी एक ट्रक उभा असल्याचे पोलिसांना दिसले. यावेळी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करत वाहनातील घटनास्थळी उपस्थित लोकांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. ट्रकच्या आसपास पोलीस पोहोचल्यावर लोकांनीही आपापले अंदाज बांधायला सुरुवात केली. रस्त्यावर लोकांची गर्दी होऊ लागली.

तांबारामचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवासन यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. दोन्ही ट्रक चेन्नईहून रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) रोकड घेऊन जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले. याच दरम्यान रस्त्यात ट्रकचे इंजिन बिघडले. हे समजताच आजूबाजूला लोकांची मोठी गर्दी झाली. रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. ट्रकमधून धूर निघू लागला, तपासणी केल्यानंतर इंजिन खराब झाल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.

पैसे घेऊन जाणाऱ्या दोन्ही ट्रकच्या भोवती मोठा जमाव जमलेला पाहून पोलिसांनी तातडीने दोन्ही ट्रक जवळच्या कॅम्पसमध्ये नेले. दरम्यान, ट्रकचे इंजिन दुरुस्त करण्याचे यांत्रिक काम करण्यात आले, मात्र ट्रकची दुरुस्ती होऊ शकली नाही. अखेर दुसऱ्या वाहनाच्या साहाय्याने दोन्ही ट्रक आरबीआयकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :MONEYपैसाPoliceपोलिस