शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

"आम्ही हत्या करू शकतो, पण देशाचा अपमान नाही"; शेतकरी नेत्याचे वादग्रस्त विधान

By देवेश फडके | Updated: January 29, 2021 20:59 IST

आम्ही लाठ्या चालवू शकतो, ट्रॅक्टरचा वेग वाढवू शकतो, हत्या करू शकतो; मात्र, देशाचा अपमान करू शकत नाही, असे वादग्रस्त विधान भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष चौधरी नरेश टिकैत यांनी केले आहे.

ठळक मुद्देशेतकरी नेत्याचे वादग्रस्त विधानमहापंचायतमध्ये केली सरकारवर टीकाशेतकऱ्यांनी लढा सुरू ठेवण्याचे आवाहन

मुजफ्फरनगर : आम्ही लाठ्या चालवू शकतो, ट्रॅक्टरचा वेग वाढवू शकतो, हत्या करू शकतो; मात्र, देशाचा अपमान करू शकत नाही, असे वादग्रस्त विधान भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष चौधरी नरेश टिकैत यांनी केले आहे. शेतकरीआंदोलनादरम्यान घेण्यात आलेल्या महापंचायतमध्ये ते बोलत होते. 

चौधरी अजित सिंग यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, ती आमची चूक होती. आम्ही खोटे बोलत नाही, आम्ही दोषी आहोत. या कुटुंबाने नेहमी शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी लढा दिला आहे. आता ही चूक पुन्हा करू नका, असे आवाहन चौधरी नरेश टिकैत यांनी यावेळी केले. 

सरकारशी टक्कर घेण्याची हिंमत केवळ भारतीय किसान युनियनमध्येच आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांना गाडीवर झेंडे लावण्याचीही आता लाज वाटू लागली आहे, अशी टीका टिकैत यांनी केली. गाझीपूर येथील आंदोलन सुरू राहील. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 

शेतकऱ्यांना लाल किल्ल्यावर कोणी जाऊ दिलं? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

गेल्या ७० दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. या कालावधीत शेतकऱ्यांवर नाना प्रकारचे आरोप करण्यात आले. मात्र, ते सर्व खोटे असल्याचे सिद्ध झाले. आमचे कोणीही काहीच बिघडवू शकत नाही. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असेही टिकैत म्हणाले. २६ जानेवारी रोजी काही शेतकरी संघटनांनी माघार घेतली. मात्र, आम्ही शेतकऱ्यांना असे सोडू शकत नाही. आम्ही आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, महापंचायत बोलावून चूक केली, असे त्यांनी सांगितले. 

आम्ही इतिहासात आमचे नाव काळ्या अक्षरात कोरू देणार नाही. शेतकरी आंदोलकांनी शिस्तीचे पालन करावे. गेल्या ३३ वर्षांपासून ही संघटना शिस्तीवरच सुरू आहे. सरकार नापास झाले आहे, असा दावा टिकैत यांनी यावेळी बोलतना केला.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीagitationआंदोलन