शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

केवळ ३८ हजार मतांमुळे हिमाचलमध्ये झाले सत्तांतर; १ उमेदवार ६० मतांनी विजयी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 07:15 IST

किरकोळ मतांनी अधिक विजय : काँग्रेस ४३.९० तर, भाजपला ४३ टक्के मते

चंडीगड : हिमाचल प्रदेशमध्येकाँग्रेसला भाजपच्या तुलनेत केवळ ०.९० टक्के  म्हणजेच ३७ हजार ९७४ अधिकची मते मिळाल्याने सत्तांतर घडले. एवढ्या कमी फरकाने सत्ताबदल होण्याची १९५१ नंतर पहिलीच वेळ आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४३.९० टक्के, तर भाजपला ४३ टक्के मते मिळाली आहेत. एक टक्क्यापेक्षा कमी मतांच्या फरकातूनही काँग्रेस हा भाजपपेक्षा १५ जागांनी पुढे गेला. ६८ सदस्यीय विधानसभेत काँग्रेसला ४०, तर भाजपला २५ जागा मिळाल्या. काँग्रेसच्या एका उमेदवाराने तर ६० मते अधिक घेत विजय मिळवला आहे.  

आठ  जागांवरील लढतीत विजयाचे मार्जिन केवळ १ हजारापर्यंत होते. भाजपचे भलेही दहा मंत्री हरले असतील; पण, राज्यात सर्वाधिक मते घेऊन विजयी झालेल्यांमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे आहेत. त्यांनी सिराजमधून ८४.१० टक्के मते घेत काँग्रेसचे उमेदवार चेतराम यांचा ३८ हजार मतांनी पराभव केला. 

विधानसभेत पोहोचले १९ नवे आमदारहिमाचल प्रदेशात यंदा १९ नवीन आमदार निवडून आले आहेत. प्रथमच विधानसभेत दाखल झालेल्या या आमदारांपैकी ११ आमदार काँग्रेसचे आहेत. तर, ७ भाजपचे आणि एक अपक्ष आहे. काँग्रेसच्या तिकिटावर प्रथमच विजयी झालेल्या आमदारांमध्ये सुदर्शन सिंह बबलू, चंद्रशेखर, चैतन्य शर्मा, मलेंद्र राजन, विनोद सुल्तानपुरी, देवेंद्र कुमार, भुवनेश्वर गौड, रघुवीर सिंह बाली, केवल सिंह पठानिया, हरीशग जनारथा व कुलदीप सिंह राठौड यांचा समावेश आहे.

आश्वासने पूर्ण करण्याचे आव्हान काँग्रेसने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देत कर्मचाऱ्यांची मने जिंकली. याचा जवळपास चार लाख कर्मचारी आणि निवृत्तिधारकांना लाभ मिळणार आहे. जुनी योजना लागू करणे, महिलांना १५०० रुपये देणे, ३०० युनिट मोफत वीज आणि एक लाख तरुणांना रोजगार ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी हजारो कोटी रुपये लागणार आहेत. ही रक्कम उभी करणे सोपे काम नाही.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा