शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Chandipura Virus : चिंताजनक! गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा कहर; आतापर्यंत ४८ मुलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 11:16 IST

Chandipura Virus : गुजरातमध्ये चांदीपुराच्या व्हायरसमुळे आतापर्यंत ४८ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर १२७ नवीन प्रकरणं दाखल झाली आहेत. अनेकांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मान्सूनमुळे चांदीपुरा व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये चांदीपुराच्या व्हायरसमुळे आतापर्यंत ४८ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर १२७ नवीन प्रकरणं दाखल झाली आहेत. अनेकांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा धोकादायक व्हायरस गुजरात आणि राजस्थानमधील लोकांना लक्ष्य करत आहे. केंद्रीय पथकाने अरावली येथे परिस्थितीचा आढावा घेतला. 

अरावली जिल्ह्यातील चांदीपुरम प्रकरणासंदर्भात केंद्र सरकारचे पथक पुण्याहून पोहोचले. ज्यांनी बाधित भागांत भेट दिली. या पथकाने जिल्ह्यातील भिलोडा आणि मेघराज तालुक्यातील विविध भागातून रक्ताचे नमुने गोळा केले. हे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

डॉ. अर्पित ओबेरॉय यांच्या मते, चांदीपुरा व्हायरस अतिशय धोकादायक आहे. याची सुरुवात सर्वप्रथम नागपुरातील चांदीपूर येथून झाली. चांदीपुरा व्हायरस हा विशेषतः १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आढळतो. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, उलट्या आणि फ्लू ही त्याची लक्षणं आहेत. यामुळे गंभीर एन्सेफलायटीस देखील होतो. ही एक स्थिती आहे ज्यामुळे मेंदूला सूज येते.

लहान मुलांवर अटॅक करतो चांदीपुरा व्हायरस

चांदीपुरा व्हायरस हा एक प्रकारचा आरएनए व्हायरस आहे, जो घरांमध्ये आढळतो. लहान मुलांवर तो अटॅक करतो. यासाठी लहान मुलांना पूर्ण कपडे घाला. शरीर पूर्णपणे झाकून ठेवा. जास्त ताप आल्यासारखं जाणवत असेल किंवा तशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. हे टाळण्यासाठी स्वच्छतेकडे योग्य लक्ष द्या.

चांदीपुरा व्हायरस असं नाव का ठेवलं?

१९६५ मध्ये नागपूर शहरातील चांदीपुरा येथे एका नवीन व्हायरस प्रादुर्भाव दिसून आला. १२ ते १५ वर्षे वयोगटातील अनेक मुलांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. कारण हा व्हायरस देशात पहिल्यांदा नागपूरच्या चांदीपुरा गावातून आला होता, म्हणूनच या व्हायरसला चांदीपुरा व्हायरस म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 

टॅग्स :Healthआरोग्य