शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

"आता मुख्यमंत्री चन्नी हे फक्त नाईट वॉचमन अन्..."; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 10:43 IST

Captain Amarinder Singh And Charanjit Singh Channi : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्याला चरणजीत सिंग चन्नी यांच्याबद्दल वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - पंजाबमध्येराजकारण तापलं आहे. काँग्रेसकडून नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची काँग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्याला चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्याबद्दल वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे. तसेच "मला त्यांच्याबद्दल अत्यंत वाईट वाटतं. जबरदस्त क्षमता असूनही त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासमोर दुय्यम वागणूक दिली जात आहे. चन्नी आता फक्त नाईट वॉचमन बनूनच राहतील" असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. 

अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना प्रदेशाध्यक्षांपेक्षाही दुय्यम दर्जा मिळण्याचा प्रकार याआधी कधीच घडला नाही असं म्हटलं आहे. तसेच "कोणत्याही स्वाभिमानी नेत्याने अशी मानहानी सहन करता कामा नये" असा देखील सल्ला दिला आहे. "चरणजीत सिंग चन्नी हे फक्त अनुसूचित जातीची मतं मिळवण्यासाठी शोपीस होते का?" असा सवाल देखील सिंग यांनी उपस्थित केला आहे. "कुणीतरी बालिश मुलाप्रमाणे वागतंय आणि दिवसरात्र नवनव्या मागण्या करतंय, म्हणून तुम्ही त्याच्या सर्व मागण्या मान्य करताय आणि असं करताना चांगलं काम करणाऱ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांची मानहानी करत आहात."

"काँग्रेस आता आणखी गाळात जात आहे" असं देखील अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. पंजाबकाँग्रेसचे प्रवक्ते प्रितपाल सिंग बलियावाल (Congress Pratipal Singh Baliawal) यांनी पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना पक्षाची पंजाब युनिटची कमांड चुकीच्या हातात असल्याचं कारण त्यांनी दिलं. तसेच बलियावाल हे हरयाणा, हिमाचल प्रदेश काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक आणि पंजाब काँग्रेसचे वरिष्ठ मीडिया विश्लेषक देखील होते. सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला असून त्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत काम करणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे. 

"पक्ष चुकीच्या हातात; सिद्धू यांच्या मुर्खपणाच्या, सरकारविरोधी वक्तव्यांचं समर्थन करणं कठीण"

बलियावाल यांनी राजीनामा पत्रात "प्रवक्ता म्हणून पाकिस्तानशी संबंधांबद्दल मूर्खपणाची, पक्षविरोधी आणि सरकारविरोधी वक्तव्ये आणि विधाने यांचे समर्थन करणे माझ्यासाठी खूप कठीण झाले आहे" असं म्हटलं आहे. तसेच "पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी विविध व्यासपीठांवर दिलेल्या जबाबदाऱ्यांचा मी सन्मान केला आहे. मात्र, आता पक्षाने पंजाबची कमान चुकीच्या हातात दिली आहेत" असं देखील प्रितपाल सिंग बलियावाल यांनी म्हटलं आहे. 

"नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानशी संबंधांसह मूर्खपणाची, पक्षविरोधी, सरकारविरोधी केलेल्या वक्तव्याचा प्रवक्ता म्हणून बचाव करणे खूप कठीण झाले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सुनील कुमार जाखड यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याची आपल्या पक्षाची क्षमता होती. मुख्यमंत्री चरनजीत सिंग चन्नी पक्षाची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तुम्ही सिद्धूची प्रवक्तेपदासाठी निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र रोज सिद्धू नवनवीन ट्वीट करून मुख्यमंत्र्यांचं महत्त्व कमी करत आहेत." 

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPoliticsराजकारण