शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

"आता मुख्यमंत्री चन्नी हे फक्त नाईट वॉचमन अन्..."; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 10:43 IST

Captain Amarinder Singh And Charanjit Singh Channi : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्याला चरणजीत सिंग चन्नी यांच्याबद्दल वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - पंजाबमध्येराजकारण तापलं आहे. काँग्रेसकडून नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची काँग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्याला चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्याबद्दल वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे. तसेच "मला त्यांच्याबद्दल अत्यंत वाईट वाटतं. जबरदस्त क्षमता असूनही त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासमोर दुय्यम वागणूक दिली जात आहे. चन्नी आता फक्त नाईट वॉचमन बनूनच राहतील" असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. 

अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना प्रदेशाध्यक्षांपेक्षाही दुय्यम दर्जा मिळण्याचा प्रकार याआधी कधीच घडला नाही असं म्हटलं आहे. तसेच "कोणत्याही स्वाभिमानी नेत्याने अशी मानहानी सहन करता कामा नये" असा देखील सल्ला दिला आहे. "चरणजीत सिंग चन्नी हे फक्त अनुसूचित जातीची मतं मिळवण्यासाठी शोपीस होते का?" असा सवाल देखील सिंग यांनी उपस्थित केला आहे. "कुणीतरी बालिश मुलाप्रमाणे वागतंय आणि दिवसरात्र नवनव्या मागण्या करतंय, म्हणून तुम्ही त्याच्या सर्व मागण्या मान्य करताय आणि असं करताना चांगलं काम करणाऱ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांची मानहानी करत आहात."

"काँग्रेस आता आणखी गाळात जात आहे" असं देखील अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. पंजाबकाँग्रेसचे प्रवक्ते प्रितपाल सिंग बलियावाल (Congress Pratipal Singh Baliawal) यांनी पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना पक्षाची पंजाब युनिटची कमांड चुकीच्या हातात असल्याचं कारण त्यांनी दिलं. तसेच बलियावाल हे हरयाणा, हिमाचल प्रदेश काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक आणि पंजाब काँग्रेसचे वरिष्ठ मीडिया विश्लेषक देखील होते. सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला असून त्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत काम करणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे. 

"पक्ष चुकीच्या हातात; सिद्धू यांच्या मुर्खपणाच्या, सरकारविरोधी वक्तव्यांचं समर्थन करणं कठीण"

बलियावाल यांनी राजीनामा पत्रात "प्रवक्ता म्हणून पाकिस्तानशी संबंधांबद्दल मूर्खपणाची, पक्षविरोधी आणि सरकारविरोधी वक्तव्ये आणि विधाने यांचे समर्थन करणे माझ्यासाठी खूप कठीण झाले आहे" असं म्हटलं आहे. तसेच "पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी विविध व्यासपीठांवर दिलेल्या जबाबदाऱ्यांचा मी सन्मान केला आहे. मात्र, आता पक्षाने पंजाबची कमान चुकीच्या हातात दिली आहेत" असं देखील प्रितपाल सिंग बलियावाल यांनी म्हटलं आहे. 

"नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानशी संबंधांसह मूर्खपणाची, पक्षविरोधी, सरकारविरोधी केलेल्या वक्तव्याचा प्रवक्ता म्हणून बचाव करणे खूप कठीण झाले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सुनील कुमार जाखड यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याची आपल्या पक्षाची क्षमता होती. मुख्यमंत्री चरनजीत सिंग चन्नी पक्षाची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तुम्ही सिद्धूची प्रवक्तेपदासाठी निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र रोज सिद्धू नवनवीन ट्वीट करून मुख्यमंत्र्यांचं महत्त्व कमी करत आहेत." 

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPoliticsराजकारण