शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चंदन गुप्ता हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक, दोघांचा शोध सुरू; तणाव कायम, सुरक्षेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 02:00 IST

कासगंजमध्ये झालेल्या चंदन गुप्ता (२२) या महाविद्यालयीन युवकाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम याला बुधवारी अटक करण्यात आली. सलीमचे वय ३० च्या आत असून त्याचे दोन भाऊ नसीम आणि वसीम हेदेखील या खून प्रकरणात आरोपी आहेत. ते दोघेही फरार आहेत. गुप्ताच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता.

लखनौ : कासगंजमध्ये झालेल्या चंदन गुप्ता (२२) या महाविद्यालयीन युवकाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम याला बुधवारी अटक करण्यात आली. सलीमचे वय ३० च्या आत असून त्याचे दोन भाऊ नसीम आणि वसीम हेदेखील या खून प्रकरणात आरोपी आहेत. ते दोघेही फरार आहेत. गुप्ताच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता.गुप्ता याच्यावर गोळी झाडल्याची कबुली सलीमने दिल्याचा दावा पोलिसांनी केला. कासगंजच्या काही भागांत अजूनही तणाव आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या हेतुने युवकांनी मोटारसायकल फेरी काढली होती. या फेरीवर झालेल्या दगडफेकीनंतर दोन गटांत चकमक उडाली. यात बंदुकीची गोळी लागून चंदन गुप्ता याचा मृत्यू झाला. तीन दुकाने, दोन बसगाड्या व कार पेटवून दिली गेली. हिंसाचार प्रकरणी १५० जणांना अटक करण्यात आली. कासगंजच्या संवदेनशील भागांत सुरक्षा कर्मचाºयांची गस्त वाढवण्यात आली आहे. कासगंजमध्ये मंगळवारी हिंसाचाराचे तुरळक प्रकार घडले तरी बुधवारी एकूण परिस्थिती शांततेची आहे. घडलेला हिंसाचार आणि त्याला आवर घालण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांबद्दल केंद्र सरकारने मागवलेला अहवाल राज्य सरकार तयार करीत आहे. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचा तपशीलही केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला जाईल, असे अधिकारी म्हणाला.पहिला गोळीबार रॅलीतून?त्या रॅलीत सहभागी झालेल्या काही युवकांनी मुस्लीम वस्तीत येताच गोळ्या झाडल्याचे चित्रिकरण समोर आले असून, पोलीस ते तपासत आहेत. तहसील कार्यालयावरून हे चित्रिकरण केले गेले आहे. त्या रॅलीत सहभागी झालेल्या काही तरुणांच्या हातात लाठ्या व दंडुके असल्याचेही चित्रित झाले आहे. (वृत्तसंस्था)काँग्रेसच्या शिष्टमंडळाला अडविलेआरोपींच्या घरांवर मालमत्ता जप्त करण्याच्या चिकटवण्यात आल्या आहेत. कासगंज जिल्ह्याच्या सीमेवरील इटा जिल्ह्याच्यामधील मिरहाची भागात प्रवेश करण्यापासून काँग्रेसच्या शिष्टमंडळाला अडवण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून तणावग्रस्त भागांत जाण्यापासून शिष्टमंडळाला रोखल्याचे सूत्रांनी सांगितले. कासगंजचे जिल्हादंडाधिकारी आर. पी. सिंह यांनी या शिष्टमंडळाला ते तणावग्रस्त भागात गेल्यास आणखी प्रश्न निर्माण होतील, या कारणास्तव परवानगी नाकारली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश