शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

चंदन गुप्ता हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक, दोघांचा शोध सुरू; तणाव कायम, सुरक्षेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 02:00 IST

कासगंजमध्ये झालेल्या चंदन गुप्ता (२२) या महाविद्यालयीन युवकाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम याला बुधवारी अटक करण्यात आली. सलीमचे वय ३० च्या आत असून त्याचे दोन भाऊ नसीम आणि वसीम हेदेखील या खून प्रकरणात आरोपी आहेत. ते दोघेही फरार आहेत. गुप्ताच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता.

लखनौ : कासगंजमध्ये झालेल्या चंदन गुप्ता (२२) या महाविद्यालयीन युवकाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम याला बुधवारी अटक करण्यात आली. सलीमचे वय ३० च्या आत असून त्याचे दोन भाऊ नसीम आणि वसीम हेदेखील या खून प्रकरणात आरोपी आहेत. ते दोघेही फरार आहेत. गुप्ताच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता.गुप्ता याच्यावर गोळी झाडल्याची कबुली सलीमने दिल्याचा दावा पोलिसांनी केला. कासगंजच्या काही भागांत अजूनही तणाव आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या हेतुने युवकांनी मोटारसायकल फेरी काढली होती. या फेरीवर झालेल्या दगडफेकीनंतर दोन गटांत चकमक उडाली. यात बंदुकीची गोळी लागून चंदन गुप्ता याचा मृत्यू झाला. तीन दुकाने, दोन बसगाड्या व कार पेटवून दिली गेली. हिंसाचार प्रकरणी १५० जणांना अटक करण्यात आली. कासगंजच्या संवदेनशील भागांत सुरक्षा कर्मचाºयांची गस्त वाढवण्यात आली आहे. कासगंजमध्ये मंगळवारी हिंसाचाराचे तुरळक प्रकार घडले तरी बुधवारी एकूण परिस्थिती शांततेची आहे. घडलेला हिंसाचार आणि त्याला आवर घालण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांबद्दल केंद्र सरकारने मागवलेला अहवाल राज्य सरकार तयार करीत आहे. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचा तपशीलही केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला जाईल, असे अधिकारी म्हणाला.पहिला गोळीबार रॅलीतून?त्या रॅलीत सहभागी झालेल्या काही युवकांनी मुस्लीम वस्तीत येताच गोळ्या झाडल्याचे चित्रिकरण समोर आले असून, पोलीस ते तपासत आहेत. तहसील कार्यालयावरून हे चित्रिकरण केले गेले आहे. त्या रॅलीत सहभागी झालेल्या काही तरुणांच्या हातात लाठ्या व दंडुके असल्याचेही चित्रित झाले आहे. (वृत्तसंस्था)काँग्रेसच्या शिष्टमंडळाला अडविलेआरोपींच्या घरांवर मालमत्ता जप्त करण्याच्या चिकटवण्यात आल्या आहेत. कासगंज जिल्ह्याच्या सीमेवरील इटा जिल्ह्याच्यामधील मिरहाची भागात प्रवेश करण्यापासून काँग्रेसच्या शिष्टमंडळाला अडवण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून तणावग्रस्त भागांत जाण्यापासून शिष्टमंडळाला रोखल्याचे सूत्रांनी सांगितले. कासगंजचे जिल्हादंडाधिकारी आर. पी. सिंह यांनी या शिष्टमंडळाला ते तणावग्रस्त भागात गेल्यास आणखी प्रश्न निर्माण होतील, या कारणास्तव परवानगी नाकारली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश