शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

चंदन गुप्ता हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक, दोघांचा शोध सुरू; तणाव कायम, सुरक्षेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 02:00 IST

कासगंजमध्ये झालेल्या चंदन गुप्ता (२२) या महाविद्यालयीन युवकाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम याला बुधवारी अटक करण्यात आली. सलीमचे वय ३० च्या आत असून त्याचे दोन भाऊ नसीम आणि वसीम हेदेखील या खून प्रकरणात आरोपी आहेत. ते दोघेही फरार आहेत. गुप्ताच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता.

लखनौ : कासगंजमध्ये झालेल्या चंदन गुप्ता (२२) या महाविद्यालयीन युवकाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम याला बुधवारी अटक करण्यात आली. सलीमचे वय ३० च्या आत असून त्याचे दोन भाऊ नसीम आणि वसीम हेदेखील या खून प्रकरणात आरोपी आहेत. ते दोघेही फरार आहेत. गुप्ताच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता.गुप्ता याच्यावर गोळी झाडल्याची कबुली सलीमने दिल्याचा दावा पोलिसांनी केला. कासगंजच्या काही भागांत अजूनही तणाव आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या हेतुने युवकांनी मोटारसायकल फेरी काढली होती. या फेरीवर झालेल्या दगडफेकीनंतर दोन गटांत चकमक उडाली. यात बंदुकीची गोळी लागून चंदन गुप्ता याचा मृत्यू झाला. तीन दुकाने, दोन बसगाड्या व कार पेटवून दिली गेली. हिंसाचार प्रकरणी १५० जणांना अटक करण्यात आली. कासगंजच्या संवदेनशील भागांत सुरक्षा कर्मचाºयांची गस्त वाढवण्यात आली आहे. कासगंजमध्ये मंगळवारी हिंसाचाराचे तुरळक प्रकार घडले तरी बुधवारी एकूण परिस्थिती शांततेची आहे. घडलेला हिंसाचार आणि त्याला आवर घालण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांबद्दल केंद्र सरकारने मागवलेला अहवाल राज्य सरकार तयार करीत आहे. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांचा तपशीलही केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला जाईल, असे अधिकारी म्हणाला.पहिला गोळीबार रॅलीतून?त्या रॅलीत सहभागी झालेल्या काही युवकांनी मुस्लीम वस्तीत येताच गोळ्या झाडल्याचे चित्रिकरण समोर आले असून, पोलीस ते तपासत आहेत. तहसील कार्यालयावरून हे चित्रिकरण केले गेले आहे. त्या रॅलीत सहभागी झालेल्या काही तरुणांच्या हातात लाठ्या व दंडुके असल्याचेही चित्रित झाले आहे. (वृत्तसंस्था)काँग्रेसच्या शिष्टमंडळाला अडविलेआरोपींच्या घरांवर मालमत्ता जप्त करण्याच्या चिकटवण्यात आल्या आहेत. कासगंज जिल्ह्याच्या सीमेवरील इटा जिल्ह्याच्यामधील मिरहाची भागात प्रवेश करण्यापासून काँग्रेसच्या शिष्टमंडळाला अडवण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून तणावग्रस्त भागांत जाण्यापासून शिष्टमंडळाला रोखल्याचे सूत्रांनी सांगितले. कासगंजचे जिल्हादंडाधिकारी आर. पी. सिंह यांनी या शिष्टमंडळाला ते तणावग्रस्त भागात गेल्यास आणखी प्रश्न निर्माण होतील, या कारणास्तव परवानगी नाकारली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश