शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

सवर्णांचे आरक्षणही न्यायालयात टिकविणे आव्हानात्मक, ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 05:25 IST

खडतर पायंडा : गुजरातचा असाच कायदा झाला होता रद्द; केवळ घटनादुरुस्तीने कायदेशीर मार्ग निर्वेध होईल, याची खात्री नाही

नवी दिल्ली : सवर्णांमधील आर्थिक दुर्बलांनाही नोकऱ्या व शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यासाठी करावी लागणारी घटनादुरुस्ती मंजूर करून घेणे मोदी सरकारला जसे जिकिरीचे आहे, तसेच हे आरक्षण कोर्टात टिकविणेही आव्हानात्मक ठरू शकते. ही दोन्ही अग्निदिव्ये यशस्वीपणे पार केली, तरच या आरक्षणाचा लाक्ष पुढारलेल्या समाजांतील गरिबांना मिळू शकेल. अन्यथा ते मतांसाठी दाखविलेले केवळ गाजर ठरेल.

आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची ही पहिली वेळ नाही. दोन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये पाटीदार (पटेल) समाजाने आरक्षणासाठी केलेले आंदोलन डोईजड झाल्याने १ मे २०१६ मध्ये तेथील भाजपा सरकारने अशा आरक्षणाचा वटहुकूम काढला होता. तसा कायदाही केला गेला. पण तीनच महिन्यांत आॅगस्ट २०१६मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने तो घटनाबाह््य ठरवून रद्द केला. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे.

गुजरात सरकारने घटनादुरुस्ती न करता राज्यापुरता तो कायदा केला होता. तसाच कायदा केंद्रीय पातळीवर केला तर तो राज्यघटनेच्या चौकटीत टिकणार नाही हे स्पष्ट असल्यानेच मोदी सरकारला घटनादुरुस्ती करावी लागत आहे. पण केवळ घटनादुरुस्तीने कायदेशीर मार्ग निर्वेध होईल, याची खात्री नाही. याचे कारण, मंडल आयोगावरून उपस्थित झालेल्या इंदिरा साहनी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठांनी नोव्हेंबर १९९२ व एप्रिल २००८ मध्ये जे निकाल दिले, त्यांत स्पष्टपणे नमूद केले गेले की, सर्व नागरिकांना भेदभाव न करता समान वागणूक व समान संधी हे राज्यघटनेचे मूलभूत तत्त्व आहे. त्याला अपवाद म्हणून महिला, मुले व मागासलेल्या समाजवर्गांसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार सरकारला आहे. आरक्षण हा त्याचाच भाग आहे. मात्र राज्यघटनेस हे आरक्षण सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या निकषांवर देणे अपेक्षित आहे. आर्थिक स्थिती हा आरक्षणाचा निकष होऊ शकत नाही.५० टक्के मर्यादेचे उल्लंघनच्हे आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेबाहेर जाऊन दिले जायचे आहे. कायद्याच्या दृष्टीने टिकाव धरण्यासाठी हे दुसरे आव्हान आहे. इंदिरा साहनी प्रकरणात आरक्षणाला ५० टक्क्यांची कमाल मर्यादा घालताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, समानता व समान संधीच्या नियमाला आरक्षण हा अपवाद आहे व अपवाद हा नियमाहून वरचढ असू शकत नाही.च्महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी केलेल्या कायद्यास कोर्टाने स्थगिती दिली होती, त्याचे हेही एक कारण होते. अनेक राज्यांनी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली व त्यांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. अपवाद फक्त तमिळनाडूचा आहे.च्तेथील ६८ टक्के आरक्षणाच्या कायद्याला राज्यघटनेच्या नवव्या परिशिष्टाची कवचकुंडले मिळाल्याने तो न्यायालयीन आव्हानांपासून मुक्त राहिला आहे.

टॅग्स :reservationआरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक