शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

कामगार कायद्यांतील बदलांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 02:53 IST

अधिसूचना आणि अध्यादेशांद्वारे राज्यांनी देशाच्या कामगार कायद्याच्या चौकटीत मूलभूत बदल केले आहेत, असे केरळस्थित कायद्याची विद्यार्थिनी नंदिनी प्रवीण यांनी दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणू महामारीच्या उद्रेकानंतर काही राज्य सरकारांनी काढलेले अध्यादेश आणि अधिसूचनांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, त्यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.या अधिसूचना आणि अध्यादेशांद्वारे राज्यांनी देशाच्या कामगार कायद्याच्या चौकटीत मूलभूत बदल केले आहेत, असे केरळस्थित कायद्याची विद्यार्थिनी नंदिनी प्रवीण यांनी दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे. हे अध्यादेश व अधिसूचना या कामगार कायद्यांत सुधारणा म्हणून काढले गेले असले व आर्थिक व्यवहारांना गती मिळण्यासाठी व बाजारच्या सुधारणांचा हेतू असला तरी त्यातून कामगारांचे शोषण होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.नंदिनी प्रवीणच्या वतीने वकील निशे राजन शोनकर यांनी याचिका दाखल केली. केंद्र सरकारशिवाय उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, राजस्थान, पंजाब, हरयाणा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला प्रतिवादी करण्यात आले आहे.उत्तर प्रदेशच्या अध्यादेशात म्हटले आहे की, ‘उत्पादन प्रक्रियेत सक्रिय असलेले सर्व कारखाने आणि आस्थापनांना कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीतून काही अटींना अधीन राहून तीन वर्षांसाठी सूट दिली गेली आहे.’ वेतन कायदा रद्द झाला आणि वेतन संहिता निलंबित केली गेल्यामुळे कारखाने आणि आस्थापनांवर त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन राहिले नाही. त्यामुळे अध्यादेशामुळे या आस्थापनांमधील मजुरांना किमान वेतनच न मिळण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे उत्तर प्रदेशच्या संदर्भात याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या