शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कामगार कायद्यांतील बदलांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 02:53 IST

अधिसूचना आणि अध्यादेशांद्वारे राज्यांनी देशाच्या कामगार कायद्याच्या चौकटीत मूलभूत बदल केले आहेत, असे केरळस्थित कायद्याची विद्यार्थिनी नंदिनी प्रवीण यांनी दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणू महामारीच्या उद्रेकानंतर काही राज्य सरकारांनी काढलेले अध्यादेश आणि अधिसूचनांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, त्यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.या अधिसूचना आणि अध्यादेशांद्वारे राज्यांनी देशाच्या कामगार कायद्याच्या चौकटीत मूलभूत बदल केले आहेत, असे केरळस्थित कायद्याची विद्यार्थिनी नंदिनी प्रवीण यांनी दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे. हे अध्यादेश व अधिसूचना या कामगार कायद्यांत सुधारणा म्हणून काढले गेले असले व आर्थिक व्यवहारांना गती मिळण्यासाठी व बाजारच्या सुधारणांचा हेतू असला तरी त्यातून कामगारांचे शोषण होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.नंदिनी प्रवीणच्या वतीने वकील निशे राजन शोनकर यांनी याचिका दाखल केली. केंद्र सरकारशिवाय उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, राजस्थान, पंजाब, हरयाणा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला प्रतिवादी करण्यात आले आहे.उत्तर प्रदेशच्या अध्यादेशात म्हटले आहे की, ‘उत्पादन प्रक्रियेत सक्रिय असलेले सर्व कारखाने आणि आस्थापनांना कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीतून काही अटींना अधीन राहून तीन वर्षांसाठी सूट दिली गेली आहे.’ वेतन कायदा रद्द झाला आणि वेतन संहिता निलंबित केली गेल्यामुळे कारखाने आणि आस्थापनांवर त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन राहिले नाही. त्यामुळे अध्यादेशामुळे या आस्थापनांमधील मजुरांना किमान वेतनच न मिळण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे उत्तर प्रदेशच्या संदर्भात याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या