शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात भाजपापुढे आव्हान, कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 05:19 IST

राजस्थानातून गेल्या लोकसभा निवडणुकीत २५ पैकी २५ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाने लोकसभेसाठी भाजपातील इच्छुकांची धाकधूक वाढवली आहे.

 - राजेश भिसेराजस्थानातून गेल्या लोकसभा निवडणुकीत २५ पैकी २५ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाने लोकसभेसाठी भाजपातील इच्छुकांची धाकधूक वाढवली आहे. विधानसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती लोकसभेत होऊ नये, यादृष्टीने भाजपाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकांत राजस्थानच्या मतदारांनी भाजला भरभरुन मतदान केले. राजस्थानमध्ये २५ जागांपैकी १८ खुल्या प्रवर्गासाठी, ४ अनुसूचित जाती, तर ३ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. या सर्व जागांवर पक्षाला निर्भेळ यश मिळविले होते. मात्र, २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची स्थिती बदलली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी ही बाब स्पष्ट केली आहे.डिसेंबर २०१८ मध्ये १९९ जागांसाठी झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाला ७२, काँग्रेसला १००, तर अपक्ष व इतरांना २६ जागांवर विजय मिळाला. विधानसभेत काँग्रेसने सत्ता स्थापन करून, अशोक गेहलोत मुख्यमंत्री, तर उपमुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांनी पदभार घेतला आहे. भाजपाने २०१३ च्या विधानसभा निवडणुकांत तब्बल १६३ जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसचे केवळ२१ जागांवर उमेदवार निवडून आले होते.पण २0१८ साली चित्र पूर्ण पालटले. मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंदिया यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेली नाराजी मतदानयंत्रांतून उमटली आणि भाजपाच्या हातातून हे राज्य गेले. अर्थात प्रशासनाकडे दुर्लक्ष, अनेक प्रश्न व समस्या रेंगाळत पडून राहणे, मंत्री व आमदारांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनीच न ऐकणे यामुळे लोकांत मोठी नाराजी होती. मध्यम जातींच्या आरक्षणाचा मुद्दा, शेतकऱ्यांची आंदोलने याकडेही वसुंधरा राजे यांनी गांभीर्याने पाहिले नाही, अशी तक्रार होती. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकांत दिसला.बदलत्या राजकीय समीकरणांमुळे २०१४ प्रमाणे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपासाठी सध्या तरी अवघड दिसत आहे. कदाचित विधानसभा निकालांचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक. विधानसभा निवडणूक स्थानिक तर लोकसभा राष्ट्रीय मुद्द्यांवर लढली जाते. असे असले तरी मतदारांची मानसिकता व राजस्थानमधील राजकीय स्थिती यांवरच राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. त्यामुळेच भाजपाने बुथनिहाय तयारी सुरू केली आहे. पारंपरिक माध्यमांसह सोशल मीडियाचाहीवापर भाजपाकडून प्राधान्याने केला जाईल.विधानसभा निवडणुकीत अध्यक्ष राहुल गांधी यांच्या परिश्रमांमुळेच काँग्रेसला यश मिळू शकले. या यशानंतर काँग्रेस पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे अनेक मतदारांच्या प्रतिक्रियांतून दिसून आले आहे. नाराजी होती ती मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबद्दल. ती व्यक्त करून झाली. या पार्श्वभूमीवर मोदींची लोकप्रियता महत्त्वाचा मुद्द ठरणार की लोकसभेतही लोकांना बदल हवा, हे निवडणुकांतून समजेल.

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliticsराजकारण